शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
2
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
3
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
4
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
5
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
6
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
7
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
8
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
9
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
10
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
11
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
12
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
13
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
14
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
15
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
16
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
17
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
18
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
19
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
20
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
Daily Top 2Weekly Top 5

इकोफ्रेंडली गणेशमूर्ती निर्मितीचे आव्हान; पीओपी मूर्ती साकारण्यास केंद्राची बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 02:54 IST

पेणमधील १२०० कारखान्यांतील कामगारांचा प्रश्न 

दत्ता म्हात्रेपेण : महाराष्ट्राच्या लाडक्या आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा करणाऱ्या गणेशभक्तांची संख्या महाराष्ट्र राज्यासह देश-विदेशात फार मोठी आहे. पेणमध्ये १,२०० गणेशमूर्ती निर्माण करणाऱ्या कारखान्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती निर्माण करणे शक्य होते. आता पीओपीच्या गणेशमूर्ती निर्माण करण्यावर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने बंदी घालण्यात आल्याने इकोफ्रेंडली गणेशमूर्ती निर्माण करणे व ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याचे आव्हान कसे पेलवणार, ही मोठी समस्या मूर्तिकारांसमोर नव्या वर्षांत उभी राहणार आहे. यावर कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, या विवंचनेत सध्या मूर्तिकार आहेत.

मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्रीय नियम आहे. शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याचे काम मोठे अवघड असते. मूर्ती साच्यातून काढल्यावर दोन दिवसांनंतर ती कोरकाम करून पाण्यानें फिनिशिंग करून गणपतीचे अलंकार, हात, सोंड व इतर सजावट हे अत्यंत जिकिरीचे काम कारागीराला हाताने करावे लागते. मूर्ती तयार झाल्यावर ती सुखरूप ठिकाणी ठेवून उन्हात सुकवून अलगदपणे स्टोअर्स ​करावी लागते. शाडू माती ठिसूळ असल्याने मूर्ती इकडे तिकडे न हलवता ठेवावी लागते. त्यानंतर, रंगकाम करुन पुन्हा सुखरूप ठिकाणी ठेवावी लागते.

अशा प्रकारे महिन्याकाठी २०,००० ते २२,००० गणेशमूर्ती बनविता येतील, असे जाणकार तज्ज्ञ मूर्तिकारांचे म्हणणे आहे. त्यानुसार, १,२०० कारखान्यात एका महिन्यांत २०,००० ते २२,००० हजार इकोफ्रेंडली गणेशमूर्तींची निर्मिती करता येईल. मूर्ती निर्माण करण्यासाठी अवघे नऊ महिने काम करायला मिळते. मे महिन्यानंतर जूनपासून सप्टेंबर महिन्यापर्यंत मातीकाम पावसामुळे बंद ठेवण्यात येते. अवघ्या नऊ महिन्यांत प्रति महिना २२ हजार, याप्रमाणे १ लाख ९८ हजार दोन फूट उंचीच्या व त्यापेक्षा लहान साइजच्या मूर्ती निर्माण करता येतील. बाजारपेठेतील मागणी फार मोठी आहे. दरवर्षी अडीच ते तीन लाख इकोफ्रेंडली गणेशमूर्ती पेण शहर व हमरापूर, जोहे या मूर्ती निर्माण करणाऱ्या कला केंद्रात​ तयार होतात. अनेक संकटांचा सामना करीत ही मूर्तिकला पेणच्या गणेशमूर्तिकारांनी जिवंत ठेवली आहे, पण आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालण्यात आल्याने २० ते २५ लाख मूर्तींची डिमांड कशी पूर्ण करता येणार, यामुळे इकोफ्रेंडली गणेशमूर्ती निर्माण करण्याचे मोठे आव्हान मूर्तिकारांसमोर उभे राहिले आहे.

इकोफ्रेंडली त्या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याचे काम संयमाने हळुवारपणे करावे लागते. शाडू माती ठिसूळ असल्याने मूर्ती सुकल्यावर काळजीपूर्वक​ स्टोअर्स करावी लागते. मूर्ती उचलताना काळजी घेऊन ठेवली जाते. गोल्ड सोनेरी कलर ठरावीक वेळेत लावावे लागते, नाहीतर गोल्डन कलरला काळपटपणा​ येतो. मातीकाम कुशलतेने करावे लागते, तरीही बाजाराची इकोफ्रेंडली मूर्तीची जी मागणी आहे, ती पन्नास ते साठ टक्के पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - दीपक समेळ, मूर्तिकार, पेण