शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पनवेलसह नवी मुंबईत मंत्रिपदाचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 01:46 IST

तीनही आमदार स्पर्धेत । पक्षश्रेष्ठी कोणावर विश्वास दाखविणार याकडे शहरवासीयांचे लक्ष

नामदेव मोरे 

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये भाजपने एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. पक्षाचे तीन अधिकृत व एक बंडखोर उमेदवार विजयी झाला आहे. निवडून आलेले तीनही आमदार मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये असल्याचे बोलले जात असून, पक्षश्रेष्ठी नक्की कोणाला व किती जणांना संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात सत्तास्थापनेचा पेच असताना नवी मुंबईमध्ये मात्र मंत्रिपदाचीच चर्चा सुरू आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये चार विधानसभेचे मतदारसंघ आहेत. देशातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र म्हणून या परिसराची ओळख आहे. जेएनपीटी, ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, तळोजा व रसायनी औद्योगिक वसाहतीसह अनेक मोठे उद्योग या परिसरामध्ये आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचेही काम सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी भाजपचे अस्तित्वही या परिसरामध्ये नव्हते. २०१४ च्या निवडणुकीमध्ये बेलापूर व पनवेलमध्ये भाजपने विजय मिळविला. २०१९ च्या निवडणुकीमध्ये ऐरोलीमधील गणेश नाईक, बेलापूरमधून मंदा म्हात्रे, पनवेलमधून प्रशांत ठाकूर भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. उरणमध्ये बंडखोर उमेदवार महेश बालदी विजयी झाले असून, त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.पनवेल महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. नवी मुंबई महानगरपालिकेवरही आता त्यांनी वर्चस्व मिळविले आहे. यापूर्वी राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष व काँगे्रसचे वर्चस्व असलेल्या परिसरामधील सर्व प्रमुख सत्तास्थाने भाजपने ताब्यात घेतली आहेत. मागील पाच वर्षांमध्ये या परिसरातील कोणालाच मंत्रिपद मिळाले नव्हते. प्रशांत ठाकूर यांना सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले होते. नवी मुंबईमध्ये माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. विजय चौगुले यांना वडार समाज संघटनेचे अध्यक्षपद, पनवेलमधील बाळासाहेब पाटील यांचीही महामंडळावर वर्णी लावली होती; परंतु प्रत्यक्ष मंत्रिमंडळामध्ये कोणालाही संधी मिळाली नव्हती.

या वेळच्या मंत्रिमंडळामध्ये नवी मुंबई व पनवेलला संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. रायगड जिल्ह्याला मागील पाच वर्षांमध्ये एकही मंत्रिपद मिळाले नव्हते. पालकमंत्री पदही जिल्ह्याबाहेरील मंत्र्यांवर सोपविण्याची वेळ आली होती. या वेळी जिल्ह्याला मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून, प्रशांत ठाकूर यांची वर्णी लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू म्हणून ओळखल्या जात आहेत. तिकीटवाटपामध्येही त्यांच्यावरच विश्वास दाखविण्यात आला होता. यामुळे आता त्यांची मंत्रिमंडळातही वर्णी लागू शकते, असे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँगे्रसमधून भाजपमध्ये आलेले गणेश नाईक यांनाही मंत्रिमंडळामध्ये संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये पक्ष बळकट करण्यासाठी व महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी नाईकांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.गणेश नाईक : ऐरोली मतदारसंघातून ७८ हजार मतांनी विजयी झाले आहेत. १९९० पासून आतापर्यंत पाच वेळा ते विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. १९९५ च्या युती सरकारमध्ये ते मंत्री होते. २००४ पासून सलग दहा वर्षे कॅबिनेट मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे. १९९५ पासून नवी मुंबई महानगरपालिका ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. राजकारणातील अनुभवामुळे त्यांना संधी मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.मंदा म्हात्रे : बेलापूर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा मंदा म्हात्रे विजयी झाल्या आहेत. १९९५ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका, सभापती, यानंतर विधानपरिषद सदस्य म्हणून कामाचा अनुभव आहे. मागील पाच वर्षांमध्ये अनेक प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळविले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू म्हणूनही त्यांची ओळख आहे. यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.प्रशांत ठाकूर : पनवेल मतदारसंघातून प्रशांत ठाकूर तब्बल ९२ हजार मताधिक्याने विजयी झाले आहेत. पनवेल नगरपालिकेमधील नगरसेवक म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. नगराध्यक्षपदही भूषविले आहे. सलग तीन वेळा पनवेल मतदारसंघातून विजयी झाले आहेत. सिडकोचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पक्ष बळकट करण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :raigad-pcरायगडpanvelपनवेलMLAआमदारGanesh Naikगणेश नाईक