शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पनवेलसह नवी मुंबईत मंत्रिपदाचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 01:46 IST

तीनही आमदार स्पर्धेत । पक्षश्रेष्ठी कोणावर विश्वास दाखविणार याकडे शहरवासीयांचे लक्ष

नामदेव मोरे 

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये भाजपने एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. पक्षाचे तीन अधिकृत व एक बंडखोर उमेदवार विजयी झाला आहे. निवडून आलेले तीनही आमदार मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये असल्याचे बोलले जात असून, पक्षश्रेष्ठी नक्की कोणाला व किती जणांना संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात सत्तास्थापनेचा पेच असताना नवी मुंबईमध्ये मात्र मंत्रिपदाचीच चर्चा सुरू आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये चार विधानसभेचे मतदारसंघ आहेत. देशातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र म्हणून या परिसराची ओळख आहे. जेएनपीटी, ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, तळोजा व रसायनी औद्योगिक वसाहतीसह अनेक मोठे उद्योग या परिसरामध्ये आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचेही काम सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी भाजपचे अस्तित्वही या परिसरामध्ये नव्हते. २०१४ च्या निवडणुकीमध्ये बेलापूर व पनवेलमध्ये भाजपने विजय मिळविला. २०१९ च्या निवडणुकीमध्ये ऐरोलीमधील गणेश नाईक, बेलापूरमधून मंदा म्हात्रे, पनवेलमधून प्रशांत ठाकूर भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. उरणमध्ये बंडखोर उमेदवार महेश बालदी विजयी झाले असून, त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.पनवेल महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. नवी मुंबई महानगरपालिकेवरही आता त्यांनी वर्चस्व मिळविले आहे. यापूर्वी राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष व काँगे्रसचे वर्चस्व असलेल्या परिसरामधील सर्व प्रमुख सत्तास्थाने भाजपने ताब्यात घेतली आहेत. मागील पाच वर्षांमध्ये या परिसरातील कोणालाच मंत्रिपद मिळाले नव्हते. प्रशांत ठाकूर यांना सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले होते. नवी मुंबईमध्ये माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. विजय चौगुले यांना वडार समाज संघटनेचे अध्यक्षपद, पनवेलमधील बाळासाहेब पाटील यांचीही महामंडळावर वर्णी लावली होती; परंतु प्रत्यक्ष मंत्रिमंडळामध्ये कोणालाही संधी मिळाली नव्हती.

या वेळच्या मंत्रिमंडळामध्ये नवी मुंबई व पनवेलला संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. रायगड जिल्ह्याला मागील पाच वर्षांमध्ये एकही मंत्रिपद मिळाले नव्हते. पालकमंत्री पदही जिल्ह्याबाहेरील मंत्र्यांवर सोपविण्याची वेळ आली होती. या वेळी जिल्ह्याला मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून, प्रशांत ठाकूर यांची वर्णी लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू म्हणून ओळखल्या जात आहेत. तिकीटवाटपामध्येही त्यांच्यावरच विश्वास दाखविण्यात आला होता. यामुळे आता त्यांची मंत्रिमंडळातही वर्णी लागू शकते, असे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँगे्रसमधून भाजपमध्ये आलेले गणेश नाईक यांनाही मंत्रिमंडळामध्ये संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये पक्ष बळकट करण्यासाठी व महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी नाईकांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.गणेश नाईक : ऐरोली मतदारसंघातून ७८ हजार मतांनी विजयी झाले आहेत. १९९० पासून आतापर्यंत पाच वेळा ते विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. १९९५ च्या युती सरकारमध्ये ते मंत्री होते. २००४ पासून सलग दहा वर्षे कॅबिनेट मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे. १९९५ पासून नवी मुंबई महानगरपालिका ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. राजकारणातील अनुभवामुळे त्यांना संधी मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.मंदा म्हात्रे : बेलापूर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा मंदा म्हात्रे विजयी झाल्या आहेत. १९९५ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका, सभापती, यानंतर विधानपरिषद सदस्य म्हणून कामाचा अनुभव आहे. मागील पाच वर्षांमध्ये अनेक प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळविले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू म्हणूनही त्यांची ओळख आहे. यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.प्रशांत ठाकूर : पनवेल मतदारसंघातून प्रशांत ठाकूर तब्बल ९२ हजार मताधिक्याने विजयी झाले आहेत. पनवेल नगरपालिकेमधील नगरसेवक म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. नगराध्यक्षपदही भूषविले आहे. सलग तीन वेळा पनवेल मतदारसंघातून विजयी झाले आहेत. सिडकोचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पक्ष बळकट करण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :raigad-pcरायगडpanvelपनवेलMLAआमदारGanesh Naikगणेश नाईक