शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींना स्वच्छतेसाठी पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 00:32 IST

रायगड जिल्हा हागणदारीमुक्त घोषित झाल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामपंचयतींमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहावे यासंदर्भात जिल्हा परिषदेमार्फत सूचना देण्यात आल्या होत्या.

पेण : रायगड जिल्हा हागणदारीमुक्त घोषित झाल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामपंचयतींमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहावे यासंदर्भात जिल्हा परिषदेमार्फत सूचना देण्यात आल्या होत्या. स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग यावर लक्ष ठेवून होता. स्वच्छतेमध्ये सातत्य राखणाऱ्या व परिसर स्वच्छ ठेवणाºया ११३ ग्रामपंचायतींना संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये पेण तालुक्यातील वाशी ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली असून द्वितीय क्रमांक सावरसई तर तृतीय क्रमांक तरणखोप या ग्रामपंचायतीला मिळाला आहे.वाशी ग्रामपंचायतीचे सरपंच गोरखनाथ पाटील व सदस्यांनी हा पुरस्कार जि. प. अध्यक्षा आदिती तटकरे व शेकाप आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते स्वीकारला.रायगड जिल्हा स्वच्छ भारत अभियानात अव्वल राहण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत प्रयत्नांची पराकाष्टा सुरू आहे. जि.प.च्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या टीमवर्कने याकामी प्रचंड मेहनत घेतली असल्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पी. एम. साळुंखे यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येक घरामध्ये शौचालय उभारण्यासाठी जनतेचे समुपदेशन केले. त्यामुळे जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे.स्वच्छता अभियान जिल्ह्यातील ८०७ ग्रामपंचयतींनी राबविले. यासाठी जिल्हा परिषदेने तब्बल १ कोटी ५७ लाखांची पारितोषिकांची खैरात करून यामधील ११३ ग्रामपंचायतींना तालुकानिहाय २०१७-१८ मधील पारितोषिके देऊन सन्मानित केलेआहे.जिल्ह्यातील ५९ गटामधील ग्रामपंचायतींनादेखील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. २०१७-१८ मधील जिल्हास्तरीय पुरस्कारामध्ये माणगाव तालुक्यातील चांदोरे प्रथम, रोहा तालुक्यातील रोठ बु. द्वितीय तर उरणमधील धुतुम ग्रामपंचायतीला तृतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. विशेष पुरस्कारामध्ये म्हसळा तालुक्यातील फळसप ग्रामपंचायतीला कुटुंब कल्याण स्व. आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार मिळाला आहे. तर महाड तालुक्यातील फाळकेवाडी पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्थापनाचा वसंतराव नाईक पुरस्कार मिळाला आहे.२०१७-१८ मधील पेण तालुक्यातील वाशी ही खारेपाटातील ग्रामपंचायत असून स्वच्छ भारत अभियानात तालुक्यातून प्रथम क्रमाकांची मानकरी ठरली आहे. याचबरोबर पेणमधील सावरसई, तरणखोप, करंबेळी आराव, अंतोरे व आमटेम या ग्रामपंचायतींनासुद्घा स्वच्छ अभियानात गटनिहाय पुरस्कार मिळालेले आहेत.>पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढली असून ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रभागनिहाय नागरिकांनी स्वच्छतेचे पालन करून ओला व सुका कचरा घंटागाडीतच टाकावा. लोकांचा सहभाग असल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाल्यापासून याचे सर्व श्रेय वाशी ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील नागरिकांना देत आहे.- गोरखनाथ पाटील,सरपंच, वाशी, पेणअलिबाग तालुक्यातील अंबेपूर ग्रामपंचायतीला सामाजिक एकता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. जिल्हास्तरीय ग्रामपंचायतीमध्ये २०१८-१९ मध्ये चिंचवली ग्रामपंचायत ता. माणगाव प्रथम पुरस्काराचे मानकरी तर जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार पनवेल तालुक्यातील चावणे ग्रामपंचायतीला मिळाला आहे. महाड तालुक्यातील पारमाची ग्रामपंचायत तृतीय पुरस्काराची मानकरी ठरली आहे.