शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

करंजा बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेल्या मच्छीमार बोटीला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 17:57 IST

सुमारे ६० लाख किमतीचे सामान खाक, सुदैवाने जीवितहानी टळली

मधुकर ठाकूर

उरण: रंगरंगोटी, डागडूजी करून करंजा बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेल्या  गजानन नाखवा यांच्या मालकीच्या देवी पलसाई माता या मच्छीमार बोटीला मंगळवारी (६) सकाळी आग लागली आहे.तीन अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. जेवण बनविताना आगीची दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या आगीत जिवित हानी झाली नसली तरी मच्छीमार बोटीसह सुमारे ६० लाखांची सामुग्री जळून नष्ट झाली आहे.

उरण तालुक्यातील बापदेव पाडा-करंजा येथील मच्छीमार गजानन नाखवा यांच्या मालकीची देवी पलसाई माता ही मच्छीमार बोट रंगरंगोटी, डागडूजी करून समुद्रात नांगरुन ठेवण्यात आली होती.सकाळी १० -१०.३० वाजताच्या सुमारास स्टोवर जेवण बनविण्यात येत असताना बोटीतून धूर येण्यास सुरुवात झाली होती.धुरानंतर बोटीच्या पुढील भागात आग लागल्याचे कामगारांना आढळून आले. कामगारांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.मात्र त्यातुन काहीच निष्पन्न झाले नाही.उलट आगीचे प्रमाण वाढल्याने त्यांनी मदतीसाठी हाक दिली.दरम्यान बोटींमध्ये आगीचा भडका उडाल्यानंतर बंदरात जमलेल्या मच्छीमारांनी लागलीच अग्निशमन दलाला पाचारण केले.

अग्निशमन दलाचे बंब समुद्रात पोहचणे शक्य नसल्याने आग लागलेली मच्छीमार बोट अन्य बोटींच्या सहाय्याने खेचून करंजा बंदरात आणण्यात आली.अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.तोपर्यंत मच्छीमार बोटीचा पुढील भाग आगीत जळून गेला होता.या आगीत मच्छीमार बोटीतील जाळी,सामान आगीत भस्मसात झाला आहे. बोटीच्या मागील बाजूस डिझेलची टाकी होती.सुदैवाने डिझेलच्या टाकीपर्यंत आग पोहचली नसल्याने मोठा अनर्थ टळला.तरीही आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुमारे ५० ते ६० लाखाचे आर्थिक नुकसान झाले असल्याची साधार भीती मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :uran-acउरणRaigadरायगडfireआगFire Brigadeअग्निशमन दल