शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

करंजा बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेल्या मच्छीमार बोटीला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 17:57 IST

सुमारे ६० लाख किमतीचे सामान खाक, सुदैवाने जीवितहानी टळली

मधुकर ठाकूर

उरण: रंगरंगोटी, डागडूजी करून करंजा बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेल्या  गजानन नाखवा यांच्या मालकीच्या देवी पलसाई माता या मच्छीमार बोटीला मंगळवारी (६) सकाळी आग लागली आहे.तीन अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. जेवण बनविताना आगीची दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या आगीत जिवित हानी झाली नसली तरी मच्छीमार बोटीसह सुमारे ६० लाखांची सामुग्री जळून नष्ट झाली आहे.

उरण तालुक्यातील बापदेव पाडा-करंजा येथील मच्छीमार गजानन नाखवा यांच्या मालकीची देवी पलसाई माता ही मच्छीमार बोट रंगरंगोटी, डागडूजी करून समुद्रात नांगरुन ठेवण्यात आली होती.सकाळी १० -१०.३० वाजताच्या सुमारास स्टोवर जेवण बनविण्यात येत असताना बोटीतून धूर येण्यास सुरुवात झाली होती.धुरानंतर बोटीच्या पुढील भागात आग लागल्याचे कामगारांना आढळून आले. कामगारांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.मात्र त्यातुन काहीच निष्पन्न झाले नाही.उलट आगीचे प्रमाण वाढल्याने त्यांनी मदतीसाठी हाक दिली.दरम्यान बोटींमध्ये आगीचा भडका उडाल्यानंतर बंदरात जमलेल्या मच्छीमारांनी लागलीच अग्निशमन दलाला पाचारण केले.

अग्निशमन दलाचे बंब समुद्रात पोहचणे शक्य नसल्याने आग लागलेली मच्छीमार बोट अन्य बोटींच्या सहाय्याने खेचून करंजा बंदरात आणण्यात आली.अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.तोपर्यंत मच्छीमार बोटीचा पुढील भाग आगीत जळून गेला होता.या आगीत मच्छीमार बोटीतील जाळी,सामान आगीत भस्मसात झाला आहे. बोटीच्या मागील बाजूस डिझेलची टाकी होती.सुदैवाने डिझेलच्या टाकीपर्यंत आग पोहचली नसल्याने मोठा अनर्थ टळला.तरीही आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुमारे ५० ते ६० लाखाचे आर्थिक नुकसान झाले असल्याची साधार भीती मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :uran-acउरणRaigadरायगडfireआगFire Brigadeअग्निशमन दल