शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

शिक्षकांना ३८ दिवसांचीच उन्हाळी सुटी; १५ जूनपासून उघडणार शाळा

By निखिल म्हात्रे | Published: May 01, 2024 10:38 AM

७ मे रोजी निवडणूक कर्तव्यावर,  इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत आता बंद झाली आहे

अलिबाग : आठवडाभरात जिल्हा परिषदेच्या शाळांच्या परीक्षा संपणार आहेत. त्यानंतरही शिक्षकांना शाळेत यावे लागणार आहे. ७ मे रोजी लोकसभा निवडणूक कर्तव्यावर हजर राहावे लागणार असून, ८ मेपासून त्यांना उन्हाळी सुट्या लागणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना ३८ दिवसांची सुटी मिळणार आहे.

इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत आता बंद झाली आहे. त्यामुळे परीक्षा घेतल्यानंतर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा एका महिन्यानंतर परीक्षा घेतली जाणार आहे. त्यातही एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा त्याच वर्गात बसावे लागणार आहे.

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या आहेत, त्यांना उन्हाळी सुटी लागली आहे. ज्या शाळांच्या परीक्षा झालेल्या नाहीत, त्यांना चालू आठवड्यात परीक्षा संपविण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांना सुट्या लागल्या तरी मुख्याध्यापक व शिक्षकांना पुढील शैक्षणिक वर्षीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया अजून सुरू न झाल्याने शाळांना तोवर उर्वरित ७५ टक्के प्रवेश पूर्ण करून घ्यावे लागणार आहेत. शाळांनी आता त्याची तयारी सुरू केली आहे.निवडणुकीमुळे ८ मेपासून उन्हाळी सुटी१ मे रोजी विद्यार्थ्यांना मिळणार निकालपत्र१५ जूनपासून पुन्हा सुरू होतील शाळादोन दिवस तयारीसाठी शाळेत यावे लागणार

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सुट्या शाळांना ६ मेपासून लागणार आहेत, पण लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान असल्याने ८ मेपासून सुट्या लागतील. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा या आठवड्यात संपतील. त्यांची परीक्षा सकाळच्या सत्रात घेतल्या जात आहेत.- पुनिता गुरव, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, रायगड.

टॅग्स :Teacherशिक्षकElectionनिवडणूक