शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

खानावमधील १७ आदिवासी कुटुंबे जमीन हक्कास वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 2:54 AM

अलिबाग तालुक्यातील खानाव-बामणगाव परिसरातील १७ आदिवासी कुटुंबांनी आपले दावे दाखल करूनही गेल्या दोन वर्षांत त्यांच्या नावावर या जमिनी झाल्या नाहीत.

विशेष प्रतिनिधी ।अलिबाग : आदिवासी बांधवांना घरठाण हक्काची जमीन त्यांच्या नावे करण्याकरिता कायदा करण्यात आला. त्या सदर्भातील जमीन हक्काचे दावे जिल्ह्यात अनेक ठिकाणी आदिवासी बांधवांनी दाखल केले, त्यास मंजुरी मिळून जिल्ह्यातील अनेक आदिवासी बांधवांच्या नावे वनहक्कातील जमिनी नावावरही झाल्या; परंतु अलिबाग तालुक्यातील खानाव-बामणगाव परिसरातील १७ आदिवासी कुटुंबांनी आपले दावे दाखल करूनही गेल्या दोन वर्षांत त्यांच्या नावावर या जमिनी झाल्या नाहीत.महसूल विभाग व वनविभाग यांच्या संयुक्त कार्यवाहीअंती ही प्रक्रिया पूर्ण होते; परंतु खानाव-बामणगावमधील या आदिवासींना वनविभागाकडून सहकार्य मिळत नसल्याने ही प्रक्रिया पूर्ण होत नसल्याची माहिती या आदिवासी बांधवांकडून उपलब्ध झाली आहे.वेलटवाडी (खानाव)मधील आदिवासी ग्रामस्थांच्या जमीन हक्काच्या सामूहिक दाव्यांच्या मंजुरीकरिता ११ फेब्रुवारी २०१६ रोजी खानाव ग्रामपंचायतीने अलिबागच्या तहसीलदारांना रीतसर पत्र दिले आहे. त्यांवर अद्याप कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, शनिवार, २१ एप्रिल रोजी वेलटवाडी (खानाव)मधील पोशा देवशी गडखळ व सर्व आदिवासी कुटुंबांनी अलिबाग वनविभाग आणि अलिबाग तहसीलदार यांना रीतसर निवेदन देऊन या जमिनी आपल्या नावावर कराव्यात, अशी विनंती केली आहे.रायगड जिल्ह्यातील शासनाच्या धोरणानुसार आदिवासी विकास समितीच्या झालेल्या बैठकीत या समाजाला इतर समाजाच्या बरोबरीने मूळ प्रवाहात आणण्यासाठी चर्चा झाली, त्यातच त्यांना डोंगराळ भागात जिथे राहत आहेत, तिथे घराची जागा स्वमालकीची करून त्यावर पक्के घर बांधण्यासाठीची परवानगी देण्याबाबत अंतिम चर्चा झाली; परंतु अजूनही अलिबाग तालुक्यातील खानाव व बामणगाव परिसरातील आदिवासी बांधवांना आपल्या घराच्या डागडुजी कामाकरिता व घर पक्के करण्यासाठी वनविभागाकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. जागा वनविभागाची असून, त्यावर आदिवासी बांधवांचा हक्क नाही, त्यांना घर बांधता येणार नाही, अशी पारंपरिक भूमिका वनविभागाच्या अधिकाऱ्यांची व कर्मचाºयांची आहे. नव्या वनहक्क कायद्यानुसार पात्र आदिवासींना त्यांच्या हक्काच्या जागेपासून व घरापासून वंचित ठेवता येणार नाही, याची कल्पना वनविभागास देणे गरजेचे झाले आहे.दरम्यान, बामणगाव-खानाव येथील आदिवासी बांधवांच्या या वन हक्क दाव्यांबाबतची नेमकी माहिती घेऊन, या संदर्भात वनविभागाच्या सहयोगाने लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अलिबागचे तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

टॅग्स :forestजंगल