शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून १४८ शेतकरी वंचित; विमा कंपनीचा भोंगळ कारभार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 11:29 PM

शेतकºयांनी सन २०१७/२०१८ यावर्षी प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत आंबा विम्याचे पैसे भरले होते, तरी हे पैसे सप्टेंबर २०१८ पर्यंत शेतकºयांना मिळणे गरजेचे होते

पाली : स्टेट बँक, विमा कंपनीचा भोंगळ कारभार उघडकीस आला असून, प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून १४८ शेतकरी वंचित असल्याचा प्रकार घडल्याने सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

सुधागड-पाली तालुक्यांतील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यास विलंब लागल्याने बळीराजा शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांचे विषय लक्षात घेऊन न्याय मिळविण्यासाठी संबंधित स्टेट बँक आॅफ इंडिया पाली शाखा, कृषी व तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. त्या वेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष विलास उतेकर यांनी संबंधित अधिकाºयांना फसल पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यास विलंब का झाला, त्या वेळी स्टेट बँके च्या व्यवस्थापकांनी विमा कंपनीच्या हलगर्जीमुळे हा प्रकार घडला आहे, असे सांगितले.

त्यावर विमा कंपनीच्या अधिकाºयांचे म्हणणे आले की, कालावधीदरम्यान स्टेट बँकेने कागदपत्र न दिल्याने हा प्रकार घडला आहे. स्टेट बँक व विमा कंपनीचा भोंगळ कारभार लक्षात आल्याने पाली तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पीक विमा योजनेचा शेतकºयांना लाभ मिळण्यास विलंब झाला आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर स्टेट बँक व विमा कंपनी यांना नोटीस काढून बोलाविण्यात आले. त्या वेळी कागदपत्रांची माहिती मागविण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आले की, स्टेट बँकेच्या हलगर्जीमुळेच सुधागड तालुक्यातील १४८ शेतकºयांना फसल पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यास विलंब लागला आहे. त्यावर १४८ शेतकºयांना ५८ लाख ३० हजार ५१८ इतकी रक्कम स्टेट बँकेने द्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निकालाद्वारे म्हटले आहे.

शेतकºयांनी सन २०१७/२०१८ यावर्षी प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत आंबा विम्याचे पैसे भरले होते, तरी हे पैसे सप्टेंबर २०१८ पर्यंत शेतकºयांना मिळणे गरजेचे होते; परंतु २०२० लागला तरी शेतकºयांना या विमा योजनेचा लाभ मिळाला नाही, असे असतानाही स्टेट बँक व विमा कंपनी शेतकºयांची दिशाभूल करत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या आत पैसे स्टेट बँकेने व विमा कंपनीने न दिल्यास शेतकरी पाली येथील स्टेट बँके समोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.मी, पीक विमा सन २०१७ ला भरला, त्यानंतर आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या योजनेचा मला लाभ मिळेल; परंतु दोन वर्षे झाली तरी ८८ हजार ५०० रुपये विम्याची रक्कम मिळाली नाही. - सदानंद कोंडे, शेतकरी.जिल्हाधिकारी यांच्या निकालानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेची रक्कम शेतकºयांना मिळवून देण्यासाठी आमच्या वरिष्ठांकडून प्रक्रिया सुरू आहे. - नितीन म्हात्रे, व्यवस्थापक, स्टेट बँक आॅफ इंडिया, पालीशेतकºयांना फेब्रुवारी अखेरपर्यंत जर पैसे मिळाले नाही तर तालुक्यातील सर्व शेतकरी एकत्र येऊन स्टेट बँकेच्या समोर धरणे आंदोलन करू. - विलास उतेकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष.

टॅग्स :Farmerशेतकरी