शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

दोन हजार रुपयांसाठी अपहरण करून तरुणाचा खून; दोघांना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 11:55 IST

- दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागेल, असेही नमूद केले आहे.

पुणे : रस्त्यावरून जात असताना दुचाकीला आडवा आल्याने दुचाकीचे नुकसान झाल्याचा बहाणा करून तरुणाचे अपहरण करीत नातेवाइकांकडे दोन हजारांची मागणी करूनही पैसे न दिल्याने तरुणाचा खून करणाऱ्या दोघांना न्यायालयाने जन्मठेपेसह सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्यात तब्बल ४० जणांची साक्ष नोंदविण्यात आली.

सत्र न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी हा निकाल दिला. सुमित ऊर्फ सोन्या सुधीर काळे व अक्षय ऊर्फ भीमा बाळू दिवटे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागेल, असेही नमूद केले आहे. ही घटना १८ मार्च २०१७ रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली.रामअवतार बनवारीलाल जाटव (वय १९) असे मृत युवकाचे नाव आहे. मूळचा मध्य प्रदेशचा असलेला जाटव पुण्यात बांधकाम ठिकाणी फरशी बसविण्याचे काम करीत होता. घटनेच्या दिवशी आरोपी त्यांच्या दुचाकीवरून मार्केटयार्ड येथे जात होते. यावेळी रामअवतार हा रस्त्यात आडवा आल्याने दोन्ही आरोपी रस्त्यावर खाली पडले. याबाबत त्यांनी रामअवतारकडे नुकसान भरपाईची मागणी केली. यादरम्यान, त्यांनी त्याला दुचाकीवर जबरदस्तीने बसवून वनशिव वस्ती येथील मोकळ्या जागेत नेत त्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधत रामअवतार याला सोडण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. पैसे न मिळाल्याच्या कारणावरून त्यांनी संगनमत करत रामअवतार याचा दोरीने गळा आवळून व त्याच्या डोक्यात दगड घालून खून करत दोघे पसार झाले होते.याप्रकरणी, पोलिसांनी आरोपींना अटक करत त्यांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील वामन कोळी यांनी कामकाज पाहिले. युक्तिवादादरम्यान, त्यांनी व्हॉइस सॅम्पल, मोबाइल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आदी पुरावे कोर्टापुढे सादर केले. न्यायालयाने सरकार पक्षासह बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत शिक्षा सुनावली. सरकार पक्षास न्यायालयीन कामकाजास हवालदार गणेश तेळकर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCourtन्यायालय