शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

तरुण जास्त शिकत आहेत म्हणून बेराेजगार, हा माेदींचा नवीन भारत ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 6:59 PM

काॅंग्रसचे राष्ट्रीय प्रवक्ते गाैरव वल्लभ यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत माेदींच्या हाऊडी माेदी या कार्यक्रमावर टीका केली.

पुणे : भारतातील तरुण माेठ्याप्रमाणावर उच्च शिक्षण घेत आहेत, त्यामुळे बेराेजगारीचे प्रमाण वाढत असल्याचा अजब अहवाल मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिला आहे, मंत्रालय असे म्हणत असेल तर हाच माेदींचा नवा भारत आहे का, असा सवाल काॅंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गाैरव वल्लभ यांनी माेंदी सरकारला केला. पुण्यात आज आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी युवक काॅंग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे, पुण्याचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माेहन जाेशी आदी उपस्थित हाेते. 

गाैरव वल्लभ म्हणाले, देशात दरवर्षी एक कराेड लाेक पदवी घेतात, त्यातील बहुतांश लाेकांना नाेकऱ्या मिळत नाहीत. सध्या देशात  20 ते 24 या वयाेगटामधील तरुणांचे बेरोजगारीचे प्रमाण 40 टक्के आहे. यातही शहरातील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. सव्वातीन करोड लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. पुण्यातील उत्पादन कंपन्यांमधील 3 लाख लाेकांच्या नाेकऱ्या गेल्या आहेत. आणखी 10 लाख लाेकांच्या नाेकऱ्या जाण्याची शक्यता आहे. ही माहिती खुद्द भारत सरकारनेच दिली आहे. एकीकडे बेराेजगारी राेज वाढत असताना तसेच देश आर्थिक संकटात असताना पंतप्रधान माेदी हाऊडी माेदी कार्यक्रमात व्यस्त आहेत. सध्या देशावर 89 लाख काेटी रुपयांचे कर्ज आहे. देशाचा जीडीपी आज 5 टक्क्यांवर आहे. कृषिक्षेत्राचा तर दाेन टक्क्यांवर आहे. शेतकरी, व्यावसायिक कोणीच सुखाने जगू शकत नाहीये. असंघटित क्षेत्र बंद पडले आहे. वाहन क्षेत्रात मंदी आहे कारण लाेकांकडे वाहन खरेदीसाठी पैसे नाहीत. असे सर्व असताना माेदी अमेरिकेत जाऊन विविध भाषांमध्ये भारतात सर्व ठिक आहे असे म्हणतात. 

पीएमसी बॅंकेबाबत बाेलताना वल्लभ म्हणाले, पीएमसी बॅंक मागील वर्षापर्यंत 100 कराेड रुपये फायद्यात हाेती. 23 ते 25 सप्टेंबर या काळत असं काय झालं की नागरिकांना पैसे काढण्यासाठी निर्बंध लादले गेले. लाेकांचे पैसै त्यांनाच काढू दिले जात नाहीत. रिझर्व बॅंक बॅंकांच्या आर्थिक स्थितीबाबत वेळाेवेळी सूचना देत असते, पीएमसी बॅंकेच्या संचालकांनी त्याकडे लक्ष का दिले नाही. या बॅंकेच्या संचालक मंडळात गेल्या 13 वर्षांपासून भाजपाच्या एका खासदाराचा मुलगा आहे, त्यामुळे या बॅंकेच्या व्यवहारांबाबत शंका येते. बॅंकेवर घातलेले निर्बंध ही एक प्रकारची नाेटबंदीची पुनरावृत्ती आहे. नागरिकांना महिन्याला 10 हजार रुपये काढता येतील ही घातलेली अट मागे घेण्यात यावी. तसेच सगळ्या संचालकांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी काॅंग्रेसची मागणी आहे. 

हाऊडी माेदी कार्यक्रमावर टीका करताना वल्लभ म्हणाले, हाऊडी माेदी कार्यक्रमामधून भारताला काहीच मिळाले नाही. एच 1 व्हिसा नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याबाबत माेदी ट्रॅम्प यांच्याशी काही बाेलले नाहीत. भारतातून निर्यात हाेणारा बासमती भात आणि सफरचंद अमेरिका यावर रासायनिक फवारणी केली आहे असे म्हणत परत पाठवत आहे, त्याबाबत देखील माेदींनी कुठलिही चर्चा केली नाही. आयात हाेणाऱ्या वस्तूंवर अमेरिका माेठ्याप्रमाणावर कर लावत आहे त्यावर सुद्धा माेदी गप्प आहेत. या कार्यक्रमातून भारतात किती गुंतवणूक आली हे माेदींने जाहीर करावे. अन्यथा हा कार्यक्रम केवळ माेदींची खासगी भेट हाेती असेच समजावे लागेल. 

काश्मीरच्या नागरिकांना विश्वासात न घेता 370 रद्द करणे हे असंवेधानिक आहे असेही वल्लभ यावेळी म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसPuneपुणेPoliticsराजकारणHowdy Modiहाऊडी मोदी