शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी आरोग्य तपासणी गांभीर्याने घेणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:13 IST

डॉक्टरांचा सल्ला : लवकर निदान, लवकर उपचार पुणे : जीवनशैलीशी संबंधित आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आहार आणि व्यायाम ...

डॉक्टरांचा सल्ला : लवकर निदान, लवकर उपचार

पुणे : जीवनशैलीशी संबंधित आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आहार आणि व्यायाम यामध्ये नसलेली सुसूत्रता, व्यसनाधीनता, ताणतणाव यामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे. आजार होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी, आजारांचे लवकर निदान आणि उपचार यासाठी नियमित तपासण्यांवर भर देणे आवश्यक आहे.

३० ते ४० वर्षे वयोगटात धोक्याची घंटा देणारे आजार रोखण्यासाठी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या काळातच या समस्या रोखल्यास पुढे होणारे गंभीर परिणाम रोखता येऊ शकतात. नियमित आरोग्य तपासणी केल्यास मधुमेह, उच्चरक्तदाब, अपचन, हृदयाचे आजार, मूत्रपिंडविकार आदी आजारांची धोक्याची घंटा वेळीच ओळखली तर वेळीच जीवनशैलीत बदल करून आणि योग्य उपचार घेतल्यास, तरुण पिढीदेखील दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जनरल फिजिशियन डॉ. मुकेश बुधवानी म्हणाले, ‘बदलती जीवनशैली ही आरोग्याच्या विविध समस्यांना आमंत्रण देणारी ठरत आहे. ३० ते ४० वर्षे वयोगटात आढळणा-या आजारांमध्ये मधुमेह, लठ्ठपणा, फुफ्फुसाचा रोग, उच्च रक्तदाब, हायपरलिपिडेमिया, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा दीर्घकालीन धोका, चयापचय विकार आणि यकृत रोग यांचा समावेश आहे. सुरुवातीच्या काळातच या आरोग्यविषयक समस्या गांभीर्याने घेत त्यानुसार उपचार केल्यास भविष्यातील गुंतागुत रोखता येऊ शकते. थायरॉइड, यकृत आणि मूत्रपिंडाच्या समस्या, मधुमेह, उच्च रक्तदाब, तणाव, चिंता, नैराश्य, अपचन आणि मायग्रेन या अनुवंशिक आरोग्याच्या समस्या आहेत. तरुण स्त्रियांमध्ये थायरॉइड विकार सामान्य आहे आणि त्यामुळे वंध्यत्व येऊ शकते. नियमित आरोग्य तपासणीद्वारे तीव्र आजारांचे वेळीच निदान करणे शक्य होते.’

---

कोणत्या चाचण्या गरजेच्या?

मधुमेह तपासणी, वजन, कोलेस्टेराॅलची पातळी, यूरिक अॅसिडस्, हिमोग्राम, मूत्रपिंड आणि यकृत कार्य चाचणी, रक्तातील साखर, लिपिड प्रोफाइल, सोनोग्राफी, लठ्ठपणा आणि चरबीचे प्रमाण याकरिता रक्त तपासणी.

स्त्रियांनी तरुण वयातच मॅमोग्राम आणि पॅप स्मिअर चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. शरीरात व्हिटॅमिन बी १२ आणि डी आणि कॅल्शियमसारख्या कमतरतेचे मूल्यांकन केले पाहिजे जेणेकरून संधिवात, स्मृतिभ्रंश, एकाग्रता आणि स्मरणशक्ती यासारख्या दीर्घकालीन समस्या टाळता येतील.

---

काय काळजी घ्यावी?

योगा, एरोबिक्स, व्यायामशाळा, पोहणे, सूर्यनमस्कार, जॉगिंग, सायकलिंग, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि चालणे असे व्यायाम प्रकार निवडणे योग्य ठरेल. ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन, मसालेदार, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन करणे टाळा.