शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कालव्याच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू ; पुण्याजवळील राजगुरुनगर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 7:01 PM

कालव्याच्याकडेने जाताना दुचाकी घसरुन पाण्यात पडून युवकाचा मृत्यू झाला

राजगुरुनगर: चासकमान कालव्याच्या पाण्यात बुडुन युवकाचा मृत्यु झाला. पंचशील विठ्ठल फलके (वय ४५ )रा स्वामी समर्थ सोसायटी,राजगुरूनगर असे मयत युवकांचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,मयत पंचशील याला पोहता येत नव्हते.कालव्याच्या दक्षिण भरावाच्या पट्टीवरून दुचाकीने (क्र एम एच १४ ई डी ५९३९) कामानिमित्त चालला होता. भरावाच्या खड्यात दुचाकी आदळून गाडीवरचा ताबा सुटला. दुचाकी भरावाच्या कडेला पडली. पंचशील मात्र थेट वाहत्या पाण्यात पडला. ही सर्व घटना कालव्यावर धुणे धुण्यासाठी आलेल्या काही महिलांनी पाहिली. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र आजूबाजूला पोहणारे कोणीही नव्हते. काही अंतर गेल्यावर तो बुडाला. तालुका क्रीडा संकुल जवळ थिगळस्थळ परिसरात शनिवारी दुपारी एकच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहरातील अनेक युवक व नागरीक घटनास्थळी जमले होते 

गावातील पोहणाऱ्या दहा युवकांनी राजगुरूनगर ते टाकळकरवाडीपर्यंत पाण्यात शोध घेतला. मात्र रात्री उशिरा पर्यंत मृतदेह मिळुन आला नाही.आज सकाळी एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. रेटवडी येथे सातारकावस्ती येथुन जाणाऱ्या डाव्या कालव्यात झुडपाला फलके यांच्या मुत्यूदेह अडकल्याचे दिसुन आले. युवकांच्या मदतीने मुत्यूदेह बाहेर काढण्यात आला. त्याच्या मागे पत्नी, मुलगी,सहा वर्षांचा मुलगा,भाऊ,वृद्ध आई वडील असा परिवार आहे.राजगुरूनगर नगरपरिषदेच्या १८ कोटी रुपयांची पाणी योजना व ३२ कोटी रुपयांची बंदिस्त गटार योजना अंतिम टप्प्यात आहे. हे काम करण्यात पंचशील याचा मोलाचा सहभाग होता. असे जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे तालुका अध्यक्ष अतुल देशमुख यांनी सांगितले. 

टॅग्स :Deathमृत्यूdrowningपाण्यात बुडणेPuneपुणे