शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
4
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
5
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
6
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
7
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
8
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
9
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
10
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
11
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
12
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
13
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
14
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
15
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
16
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
17
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
18
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
19
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
20
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

पुस्तकांची तुला, धान्याची तुला ऐकली असेल, पण चिमुकलीची तर चक्क बियांनी वृक्षतुला!

By श्रीकिशन काळे | Updated: June 15, 2023 15:07 IST

चिमुकलीच्या वाढदिवशी अनोखी भेट, बियांपासून आता रोपे तयार करून ते अनेक ठिकाणी लावण्यात येणार

पुणे: पुस्तकांची तुला, धान्याची तुला ऐकली असेल, पाहिली असेल, पण एका पर्यावरणप्रेमी पालकाने आपल्या चिमुकलीची तुला देशी बियांनी केली. त्या बियांपासून आता रोपे तयार करून ते अनेक ठिकाणी लावण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यावरण संवर्धन करण्यास हातभार लागणार आहे.

कित्येक वर्षांपासून तुला करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये आहे. पण त्या तुलेमध्ये बराच बदल होत गेला. पूर्वीच्या काळी राजा-महाराजा सोन्या-चांदीची तुला करत असत. त्यानंतर मग धान्याची तुला करण्याची परंपरा आली. श्रीमंत माणसं वाढदिवशी अन्नधान्य तुला करून ते गरीबांना वाटत. तशी आजही काही प्रमाणात ही तुला होते. तसेच आधुनिक विचारांची लोकं आणि वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी पुस्तकांची तुला काही वर्षांपासून लोकप्रिय होत आहे. त्यातून पुस्तके वाटप होतात आणि वाचनसंस्कृतीला वाव मिळतो. आता त्यातही बदल होऊन नव्या काळाशी सुसंगत अशी तुला करण्यावर भर दिला जात आहे.

पर्यावरणप्रेमी सुमित राठोड यांनी आपल्या चिमुकल्या मुलीच्या वाढदिवसी देशी बियांची तुला केली. त्यामुळे त्यांचे चांगलेच कौतूक होत आहे. तसेच इतर ठिकाणी आता असा उपक्रम राबविण्यावरही भर देण्यासाठी प्रयत्न होत आहे. सुमित राठोड यांनी तुला केलेल्या बिया स्वत:च्या परिसरात लावणार आहेत. तसेच काही बिया महाराष्ट्र वृक्षसंवर्धिनीचे प्रिया व सुनील भिडे या दाम्पत्याकडे आणि देवराईचे रघुनाथ ढोले यांच्याकडे देण्यात येणार आहेत. इथे या बियांपासून रोपे तयार होतील. त्यानंतर ठिकठिकाणी वाटप केले जाईल.

ही तुला अतिशय समृध्द करणारी 

सुमित राठोड यांनी आपल्या लेकीच्या वाढदिवसी केलेला हा उपक्रम अतिशय सुंदर आहे. मंदिरात तुलाभार करून अन्नदान करण्याची परंपरा आपल्यालात आहेच. तशी बीज तुला करून वृक्षांच्या बिया सुयोग्य हातात गेल्यास ही वृक्ष चळवळ मोठी होण्यास हातभार लागेल. इतरांनी देखील याचा अवलंब केला पाहिजे. ही तुला अतिशय समृध्द करणारी आहे. पालकांनी याचा जरूर विचार करावा. - प्रिया भिडे, महाराष्ट्र वृक्षसंवर्धिनी

महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीतर्फे बीजांकूर अभियान राबविले जात आहे. त्यात वनस्पतींच्या बिया संकलित करून संस्थेकडे द्यायच्या आहेत. किमान पाच प्रकारच्या बिया हव्यात. त्या दिल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याला राज्यातून प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणSocialसामाजिकEducationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्र