शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

Ajit Pawar: तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही केले तरी काय? अजितदादांचा आढाव यांना सवाल

By राजू इनामदार | Updated: November 30, 2024 18:46 IST

ज्यांचा पराभव झाला ते बोलत असतील तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उत्तर दिले आहे, ते तरी मान्य करणार की नाही?

पुणे: तुम्ही आदरणीय, वंदनीय आहात, पण आम्ही नक्की केले तरी काय? गरीब कष्टकरी महिलांना आर्थिक मदत देणे चूक आहे का? लोकसभेतील पराभवानंतर आम्ही कधी मतदान यंत्रांबद्दल बोललो नाही, मग आता ज्यांचा पराभव झाला ते बोलत असतील तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उत्तर दिले आहे, ते तरी मान्य करणार की नाही? अशा प्रश्नांची सरबत्ती करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी डॉ. बाबा आढाव यांची उपोषणस्थळी भेट घेत सरकारच्या योजनांचे समर्थन करत निवडणूक यंत्रणेत काहीही घोटाळा वगैरे नसल्याचे जाहीरपणे सांगितले.

निवडणूकीत पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला, मतदान यंत्रामध्ये काही घोटाळा आहे, केंद्र सरकार कोणत्याही चर्चेला संसदेत तयार होत नाही, लोकशाही मुल्यांची घसरण सुरू आहे असे आरोप करत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी तीन दिवसांचे आत्मक्लेश आंदोलन सुरू केले. त्याचा शनिवारी तिसरा दिवस होता. अजित पवार यांनी शनिवारी दुपारी डॉ. आढाव यांची उपोषण स्थळी येऊन भेट घेतली. एक नागरिक, एक कार्यकर्ता व काळजीवाहू सरकारचा प्रतिनिधी या नात्याने आपण इथे आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पवार यांनी डॉ. आढाव यांच्या सर्व आक्षेपांना तिथेच जाहीरपणे उत्तरे दिली. ते म्हणाले,“ लोकसभेला आमचा पराभव झाला. त्यावेळी मीच काहीतरी आकर्षक योजना काढायला हवी असे सांगितले. शिवराजसिंह चौहान यांची लाडली बहिण योजना आमच्यासमोर होती. ती बजेटमध्ये बसत होती. त्यामुळे आम्ही जाहीर केली. यात २१ ते ६५ वर्षे वयाच्या महिलांना यात दरमहा १५०० रूपये मिळतात. यात वाईट काय आहे?

मतदान यंत्रांच्या विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने, ‘पराभव झाला की हरकत व जिंकलात की काहीच नाही’ असे उत्तर दिले. राज्यघटनेला आपण सगळे मानतो. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश त्यानुसार मान्य करायला हवा. केंद्र सरकार संसदेत चर्चा करायला तयार होत नाही. याबाबत दिल्लीत गेल्यावर संसदीय कामकाज मंत्री आहेत, त्यांची भेट घेऊन त्यांना याची कल्पना देईल असे पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, “बाबा, मी नेहमीच तुमच्याबरोबर संपर्कात रहात असतो. आंदोलन करण्याचा तुमचा अधिकार मला मान्य आहे, पण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना याही वैयक्तीक लाभ देणाऱ्याच योजना आहेत, त्यामुळे आमच्या योजनेत गैर काहीही नाही.”

अजित पवार यांनी जाहीरपणे त्यांच्या मित्रपक्षांना त्यांची बटेंगे ते कटेंगे, एक है ते सेफ है या घोषणा मान्य नसल्याचे सांगितले याबद्दल डॉ. आढाव यांनी त्यांचे कौतूक केले. तुमचे पुरोगामी धोरण तुम्ही सोडलेले नाही हे यातून तसेच आंदोलन, उपोषण याची दखल घेऊन आज तुम्ही भेट घ्यायला आला यातून दिसते असे डॉ. आढाव म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारBaba Adhavबाबा आढावagitationआंदोलनMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४