शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही केले तरी काय? अजितदादांचा आढाव यांना सवाल

By राजू इनामदार | Updated: November 30, 2024 18:46 IST

ज्यांचा पराभव झाला ते बोलत असतील तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उत्तर दिले आहे, ते तरी मान्य करणार की नाही?

पुणे: तुम्ही आदरणीय, वंदनीय आहात, पण आम्ही नक्की केले तरी काय? गरीब कष्टकरी महिलांना आर्थिक मदत देणे चूक आहे का? लोकसभेतील पराभवानंतर आम्ही कधी मतदान यंत्रांबद्दल बोललो नाही, मग आता ज्यांचा पराभव झाला ते बोलत असतील तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उत्तर दिले आहे, ते तरी मान्य करणार की नाही? अशा प्रश्नांची सरबत्ती करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी डॉ. बाबा आढाव यांची उपोषणस्थळी भेट घेत सरकारच्या योजनांचे समर्थन करत निवडणूक यंत्रणेत काहीही घोटाळा वगैरे नसल्याचे जाहीरपणे सांगितले.

निवडणूकीत पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला, मतदान यंत्रामध्ये काही घोटाळा आहे, केंद्र सरकार कोणत्याही चर्चेला संसदेत तयार होत नाही, लोकशाही मुल्यांची घसरण सुरू आहे असे आरोप करत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी तीन दिवसांचे आत्मक्लेश आंदोलन सुरू केले. त्याचा शनिवारी तिसरा दिवस होता. अजित पवार यांनी शनिवारी दुपारी डॉ. आढाव यांची उपोषण स्थळी येऊन भेट घेतली. एक नागरिक, एक कार्यकर्ता व काळजीवाहू सरकारचा प्रतिनिधी या नात्याने आपण इथे आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पवार यांनी डॉ. आढाव यांच्या सर्व आक्षेपांना तिथेच जाहीरपणे उत्तरे दिली. ते म्हणाले,“ लोकसभेला आमचा पराभव झाला. त्यावेळी मीच काहीतरी आकर्षक योजना काढायला हवी असे सांगितले. शिवराजसिंह चौहान यांची लाडली बहिण योजना आमच्यासमोर होती. ती बजेटमध्ये बसत होती. त्यामुळे आम्ही जाहीर केली. यात २१ ते ६५ वर्षे वयाच्या महिलांना यात दरमहा १५०० रूपये मिळतात. यात वाईट काय आहे?

मतदान यंत्रांच्या विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने, ‘पराभव झाला की हरकत व जिंकलात की काहीच नाही’ असे उत्तर दिले. राज्यघटनेला आपण सगळे मानतो. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश त्यानुसार मान्य करायला हवा. केंद्र सरकार संसदेत चर्चा करायला तयार होत नाही. याबाबत दिल्लीत गेल्यावर संसदीय कामकाज मंत्री आहेत, त्यांची भेट घेऊन त्यांना याची कल्पना देईल असे पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, “बाबा, मी नेहमीच तुमच्याबरोबर संपर्कात रहात असतो. आंदोलन करण्याचा तुमचा अधिकार मला मान्य आहे, पण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना याही वैयक्तीक लाभ देणाऱ्याच योजना आहेत, त्यामुळे आमच्या योजनेत गैर काहीही नाही.”

अजित पवार यांनी जाहीरपणे त्यांच्या मित्रपक्षांना त्यांची बटेंगे ते कटेंगे, एक है ते सेफ है या घोषणा मान्य नसल्याचे सांगितले याबद्दल डॉ. आढाव यांनी त्यांचे कौतूक केले. तुमचे पुरोगामी धोरण तुम्ही सोडलेले नाही हे यातून तसेच आंदोलन, उपोषण याची दखल घेऊन आज तुम्ही भेट घ्यायला आला यातून दिसते असे डॉ. आढाव म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारBaba Adhavबाबा आढावagitationआंदोलनMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४