शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

Pandharpur Wari: शासनाने यंदाचा पालखी सोहळा बायोबबल (जैव सुरक्षा कवच) पध्दतीने करण्यास परवानगी द्यावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 15:59 IST

श्री संत तुकाराम महाराज संस्थानची मागणी

ठळक मुद्दे शासनाने बायोबबलला परवानगी दिल्यास श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सर्व नियमांचे पालन करण्यात येईल.

देहूगाव: शासनाने आयपीएल प्रमाणेच जैव सुरक्षा कवचामध्ये (बायोबबल) श्री संत तुकाराम महाराज ३३६ व्या पालखी सोहळ्यास पंढरपूरला नेण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी केली आहे. यावेळी पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, संजय महाराज मोरया आणि विश्वस्त उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पालखी सोहळ्या संदर्भात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतीच सभा घेतली होती. या सभेमध्ये मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांनी मोजक्याच ५०० वारकऱ्यांसमवेत पायी वारीचा आग्रह धरला होता. या सभेत पुढील आढवड्यात या संदर्भात कॅबिनेट मध्ये चर्चा होवून सकारात्मक निर्णय घेऊ असे पवार यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने बायोबबलला परवानगी दिल्यास श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सर्व नियमांचे पालन करण्यात येईल.  

बायोबबल म्हणजे काय? 

जैव सुरक्षित वातावरण ( बायोबबल ) यामध्ये संबंधित व्यक्तींना आरोग्याचा अहवाल रोज सादर करावा लागतो. समाज, परिसर आणि नागरिकांपासून त्यांना १,२ किलोमीटर वेगळे ठेवले जाते. बायोबबलमध्ये त्यांना कोणीही व्यक्ती भेटू शकत नाही. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई देखील केली जाते.  

पालखी सोहळ्यात कसा असेल बायोबबल? 

पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या प्रत्येक वारकऱ्यांने आरटीपीसीआर कोवीड तपासणी केल्याचा अहवाल संस्थानकडे सादर करावा. सदर वारकरीची वयोमर्यादा व शारिरीक क्षमता शासनाच्या अटी व शर्ती प्रमाणे राहिल. वारीमधील सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी संस्थानने नेमून दिलेल्या ठिकाणीच मुक्काम करावा. सोहळा सोडून इतरत्र बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात येवू नये तसेच त्यांच्या कोणत्याही वस्तूंचा स्विकार करू नये. पालखी मुक्कामाची ठिकाणे गावाच्या बाहेर मोकळ्या जागेत किंवा शाळा महाविल्यालये असेल. ही ठिकाणी मुक्कामापुर्वी व नंतर सॅनिटाईझ केली जावीत. प्रत्येक वारकऱ्याची दर तीन दिवसांनी कोवीड टेस्ट केली जाईल.

भोजनाची व राहण्याची व्यवस्था संस्थानच्या वतीने करण्यात येईल. सहभागी वारकऱ्यांनी सॅनिटाईझरचा वापर करावा, मास्क लावणे बंधनकारक असून वेळोवेळी हात धुणे आवश्यक आहे. देहू ते पंढरपूर व पंढरपूर ते देहू परतीचा प्रवास बंधनकारक असेल. सोहळ्यात सहभागी होण्याअगोदर व नंतरही ७ दिवस विलगीकरण कक्षात राहणे आवश्यक आहे. पालखी सोहळा कार्यक्रमामध्ये पालखी सोहळा प्रमुखांनी व शासनाच्या प्रतिनिधींनी वेळोवेळी केलेल्या सुचनांचे पालन करावे लागेल. अशा प्रकारचे जैव सुरक्षा कवच पुरवण्याची मागणी त्यांनी केली आहे.. 

टॅग्स :PuneपुणेdehuदेहूSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाPandharpurपंढरपूरAjit Pawarअजित पवार