शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

Pandharpur Wari: शासनाने यंदाचा पालखी सोहळा बायोबबल (जैव सुरक्षा कवच) पध्दतीने करण्यास परवानगी द्यावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 15:59 IST

श्री संत तुकाराम महाराज संस्थानची मागणी

ठळक मुद्दे शासनाने बायोबबलला परवानगी दिल्यास श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सर्व नियमांचे पालन करण्यात येईल.

देहूगाव: शासनाने आयपीएल प्रमाणेच जैव सुरक्षा कवचामध्ये (बायोबबल) श्री संत तुकाराम महाराज ३३६ व्या पालखी सोहळ्यास पंढरपूरला नेण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी केली आहे. यावेळी पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, संजय महाराज मोरया आणि विश्वस्त उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पालखी सोहळ्या संदर्भात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतीच सभा घेतली होती. या सभेमध्ये मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांनी मोजक्याच ५०० वारकऱ्यांसमवेत पायी वारीचा आग्रह धरला होता. या सभेत पुढील आढवड्यात या संदर्भात कॅबिनेट मध्ये चर्चा होवून सकारात्मक निर्णय घेऊ असे पवार यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने बायोबबलला परवानगी दिल्यास श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सर्व नियमांचे पालन करण्यात येईल.  

बायोबबल म्हणजे काय? 

जैव सुरक्षित वातावरण ( बायोबबल ) यामध्ये संबंधित व्यक्तींना आरोग्याचा अहवाल रोज सादर करावा लागतो. समाज, परिसर आणि नागरिकांपासून त्यांना १,२ किलोमीटर वेगळे ठेवले जाते. बायोबबलमध्ये त्यांना कोणीही व्यक्ती भेटू शकत नाही. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई देखील केली जाते.  

पालखी सोहळ्यात कसा असेल बायोबबल? 

पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या प्रत्येक वारकऱ्यांने आरटीपीसीआर कोवीड तपासणी केल्याचा अहवाल संस्थानकडे सादर करावा. सदर वारकरीची वयोमर्यादा व शारिरीक क्षमता शासनाच्या अटी व शर्ती प्रमाणे राहिल. वारीमधील सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी संस्थानने नेमून दिलेल्या ठिकाणीच मुक्काम करावा. सोहळा सोडून इतरत्र बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात येवू नये तसेच त्यांच्या कोणत्याही वस्तूंचा स्विकार करू नये. पालखी मुक्कामाची ठिकाणे गावाच्या बाहेर मोकळ्या जागेत किंवा शाळा महाविल्यालये असेल. ही ठिकाणी मुक्कामापुर्वी व नंतर सॅनिटाईझ केली जावीत. प्रत्येक वारकऱ्याची दर तीन दिवसांनी कोवीड टेस्ट केली जाईल.

भोजनाची व राहण्याची व्यवस्था संस्थानच्या वतीने करण्यात येईल. सहभागी वारकऱ्यांनी सॅनिटाईझरचा वापर करावा, मास्क लावणे बंधनकारक असून वेळोवेळी हात धुणे आवश्यक आहे. देहू ते पंढरपूर व पंढरपूर ते देहू परतीचा प्रवास बंधनकारक असेल. सोहळ्यात सहभागी होण्याअगोदर व नंतरही ७ दिवस विलगीकरण कक्षात राहणे आवश्यक आहे. पालखी सोहळा कार्यक्रमामध्ये पालखी सोहळा प्रमुखांनी व शासनाच्या प्रतिनिधींनी वेळोवेळी केलेल्या सुचनांचे पालन करावे लागेल. अशा प्रकारचे जैव सुरक्षा कवच पुरवण्याची मागणी त्यांनी केली आहे.. 

टॅग्स :PuneपुणेdehuदेहूSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाPandharpurपंढरपूरAjit Pawarअजित पवार