शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

यंदा द्राक्ष उत्पादनात ९ लाख टनांनी होईल घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 06:09 IST

अतिवृष्टी व लांबलेल्या पावसामुळे राज्यातील द्राक्ष पिकांचे अपरिमित नुकसान झाले

पुणे : अतिवृष्टी व लांबलेल्या पावसामुळे राज्यातील द्राक्ष पिकांचे अपरिमित नुकसान झाले असून, द्राक्ष उत्पादनात यंदा आठ ते ९ लाख टनांनी घट होण्याची शक्यता आहे. निर्यातीलाही त्याचा फटका बसणार आहे. अतिपावसाने घड कुजणे, मण्यांना तडा जाणे, डावणी व करपा रोगाचा प्रादुर्भाव अशा समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागल्याने द्राक्ष बागाईतदारांचे कंबरडेच मोडणार आहे.राज्यात जुलै आणि सप्टेंबरमध्ये जोरदार वृष्टी झाली. दिवाळीतही पावसाची हजेरी होती. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे आॅक्टोबरमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे द्राक्षांसह भात, बाजरी, मका, भाजीपाला, ऊस व फळबागांचेही नुकसान झाले आहे.पुणे जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांचे १ लाख १५ हजार ७४६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. द्राक्षाचे आगार समजल्या जाणाºया नाशिक जिल्ह्यात सुमारे तीस टक्क्यांहून अधिक द्राक्ष बागांचे नुकसान झाले.पुणे जिल्ह्यात बारामती, इंदापूर व जुन्नर येथील बागांचे नुकसान झाले आहे. त्यात नानापर्पल, फ्लेम सिडलेस, जंबो सिडलेस व शरद सिडलेस द्राक्षांचा समावेश आहे. द्राक्ष बागाईतदार संघाचे खजिनदार कैलास भोसले म्हणाले की, राज्यात ४० ते ४२ दिवस जोरदार पाऊस झाला. द्राक्ष पीक साडेचार ते पाच महिन्यांचे असते. नोव्हेंबरमध्ये द्राक्षे छाटणीला येतात. पावसामुळे फुलोरा, मणी धरणे ते छाटणीपर्यंत प्रत्येक टप्प्यात द्राक्ष बागांना नुकसानीचा सामना करावा लागला.राज्यात द्राक्षाचे तब्बल साडेतीनते चार लाख एकर क्षेत्र आहे. त्यापैकी ८० ते ९० हजार हेक्टरवरील बागांचे साठ ते शंभर टक्के नुकसान झाले आहे. राज्यात दरवर्षी सरासरी ३५ लाख टन द्राक्षांचे उत्पादन होते. त्यातील अडीच लाख टन द्राक्षांची निर्यात होते. उर्वरित द्राक्षे ही स्थानिक बाजारपेठेत विकली जातात. यंदा ८ ते ९ लाख टनांनी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणारी निर्यात पूर्णपणे थांबली आहे.>विमा सक्तीचा करावाद्राक्ष पिकासाठी शेतकºयांना १५ हजार ४०० रुपये विमा शुल्क भरावे लागते. तितकेच शुल्क सरकार भरते. सरकारने पन्नासऐवजी ९० टक्के विमा शुल्क भरावे. त्यानंतर, विमा उतरविणे सक्तीचे करावे.- कैलास भोसले, खजिनदार,महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ