शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

यंदा द्राक्ष उत्पादनात ९ लाख टनांनी होईल घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 06:09 IST

अतिवृष्टी व लांबलेल्या पावसामुळे राज्यातील द्राक्ष पिकांचे अपरिमित नुकसान झाले

पुणे : अतिवृष्टी व लांबलेल्या पावसामुळे राज्यातील द्राक्ष पिकांचे अपरिमित नुकसान झाले असून, द्राक्ष उत्पादनात यंदा आठ ते ९ लाख टनांनी घट होण्याची शक्यता आहे. निर्यातीलाही त्याचा फटका बसणार आहे. अतिपावसाने घड कुजणे, मण्यांना तडा जाणे, डावणी व करपा रोगाचा प्रादुर्भाव अशा समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागल्याने द्राक्ष बागाईतदारांचे कंबरडेच मोडणार आहे.राज्यात जुलै आणि सप्टेंबरमध्ये जोरदार वृष्टी झाली. दिवाळीतही पावसाची हजेरी होती. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे आॅक्टोबरमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे द्राक्षांसह भात, बाजरी, मका, भाजीपाला, ऊस व फळबागांचेही नुकसान झाले आहे.पुणे जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांचे १ लाख १५ हजार ७४६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. द्राक्षाचे आगार समजल्या जाणाºया नाशिक जिल्ह्यात सुमारे तीस टक्क्यांहून अधिक द्राक्ष बागांचे नुकसान झाले.पुणे जिल्ह्यात बारामती, इंदापूर व जुन्नर येथील बागांचे नुकसान झाले आहे. त्यात नानापर्पल, फ्लेम सिडलेस, जंबो सिडलेस व शरद सिडलेस द्राक्षांचा समावेश आहे. द्राक्ष बागाईतदार संघाचे खजिनदार कैलास भोसले म्हणाले की, राज्यात ४० ते ४२ दिवस जोरदार पाऊस झाला. द्राक्ष पीक साडेचार ते पाच महिन्यांचे असते. नोव्हेंबरमध्ये द्राक्षे छाटणीला येतात. पावसामुळे फुलोरा, मणी धरणे ते छाटणीपर्यंत प्रत्येक टप्प्यात द्राक्ष बागांना नुकसानीचा सामना करावा लागला.राज्यात द्राक्षाचे तब्बल साडेतीनते चार लाख एकर क्षेत्र आहे. त्यापैकी ८० ते ९० हजार हेक्टरवरील बागांचे साठ ते शंभर टक्के नुकसान झाले आहे. राज्यात दरवर्षी सरासरी ३५ लाख टन द्राक्षांचे उत्पादन होते. त्यातील अडीच लाख टन द्राक्षांची निर्यात होते. उर्वरित द्राक्षे ही स्थानिक बाजारपेठेत विकली जातात. यंदा ८ ते ९ लाख टनांनी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणारी निर्यात पूर्णपणे थांबली आहे.>विमा सक्तीचा करावाद्राक्ष पिकासाठी शेतकºयांना १५ हजार ४०० रुपये विमा शुल्क भरावे लागते. तितकेच शुल्क सरकार भरते. सरकारने पन्नासऐवजी ९० टक्के विमा शुल्क भरावे. त्यानंतर, विमा उतरविणे सक्तीचे करावे.- कैलास भोसले, खजिनदार,महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ