शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
4
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
5
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
6
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
7
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
8
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
9
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
10
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
11
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
12
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
13
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
14
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
15
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
16
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
17
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
18
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
19
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
20
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
Daily Top 2Weekly Top 5

लेखकाने सामाजिक किंवा धार्मिक दबावाला बळी न पडता मनातील विचार मुक्तपणे मांडावेत - विश्वास पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 17:08 IST

लेखकाच्या अंगात एखाद्या विषयाचे झपाटलेपण येत नाही, तोपर्यंत त्या विषयाला न्याय दिल्यासारखे होत नाही

पुणे : लेखकाने राजकीय, सामाजिक किंवा धार्मिक दबावाला बळी न पडता स्वतःच्या आणि लोकांच्या मनातील विचार मुक्तपणे मांडले पाहिजेत, असे मत ‘पानिपत’कार आणि नियाेजित संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयाेजित अभिजात मराठी शब्दोत्सव या ग्रंथ प्रदर्शनात ते बाेलत हाेते. हे प्रदर्शन दि. ९ नोव्हेंबरपर्यंत सुरू होणार आहे. याचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले.

टिळक रस्ता येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात हा कार्यक्रम सोमवारी पार पडला. याप्रसंगी राजहंस प्रकाशनाचे संपादक शिरीष सहस्रबुद्धे, अक्षरधारा बुक गॅलरीच्या संचालिका रसिका राठिवडेकर आणि स्नेहा अवसरीकर उपस्थित होत्या. ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांनी पाटील यांची मुलाखत घेतली.

पाटील म्हणाले की, माझी अशीच एक गाजलेली कादंबरी ‘राजहंस’कडे प्रकाशनासाठी दिली हाेती; पण अपेक्षेप्रमाणे लेखन झाले नसल्याने संपादकीय मंडळ नाराज असल्याचे लक्षात आले. तेव्हा मी माजगावकर यांच्याकडून अधिकचा सहा महिन्यांचा कालावधी मागून घेतला आणि त्या कादंबरीला अंतिम रूप दिले.

शेवटच्या क्षणीसुद्धा तुम्हाला पुनर्विचार करावा लागू शकतो. कारण, लेखन ही एक प्रक्रिया असून, पुनर्लेखन हे खरे लेखन असते. लेखकाच्या अंगात एखाद्या विषयाचे झपाटलेपण येत नाही, तोपर्यंत त्या विषयाला न्याय दिल्यासारखे होत नाही. लेखकाने त्याच्या एखाद्या कथा-कादंबरीची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी लेखनासोबत पुनर्लेखनावरही भर देणे आवश्यक आहे. स्तुती करणारे मित्र आजूबाजूला ठेवण्यापेक्षा वेळ प्रसंगी कान पकडणारे आणि तुमच्याकडून अधिकची अपेक्षा करणारे वाचक आणि प्रकाशक तुमच्या आजूबाजूला असणे आवश्यक असते. याप्रसंगी विश्वास पाटील यांनी पानिपत, महानायक, लस्ट फॉर लालबाग आदी कादंबऱ्यांची निर्मितीमागच्या कथा उलगडून सांगितल्या. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानावरही भाष्य केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Writer should freely express thoughts without succumbing to pressure: Vishwas Patil

Web Summary : Vishwas Patil emphasized writers should freely express thoughts, avoiding political, social, or religious pressure. He highlighted the importance of revision in writing and having critical readers. Patil shared insights into his novels and acknowledged Anna Bhau Sathe's literary contribution.
टॅग्स :Puneपुणेmarathiमराठीliteratureसाहित्यSocialसामाजिकakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळPoliticsराजकारण