शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लेखकाने सामाजिक किंवा धार्मिक दबावाला बळी न पडता मनातील विचार मुक्तपणे मांडावेत - विश्वास पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 17:08 IST

लेखकाच्या अंगात एखाद्या विषयाचे झपाटलेपण येत नाही, तोपर्यंत त्या विषयाला न्याय दिल्यासारखे होत नाही

पुणे : लेखकाने राजकीय, सामाजिक किंवा धार्मिक दबावाला बळी न पडता स्वतःच्या आणि लोकांच्या मनातील विचार मुक्तपणे मांडले पाहिजेत, असे मत ‘पानिपत’कार आणि नियाेजित संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयाेजित अभिजात मराठी शब्दोत्सव या ग्रंथ प्रदर्शनात ते बाेलत हाेते. हे प्रदर्शन दि. ९ नोव्हेंबरपर्यंत सुरू होणार आहे. याचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले.

टिळक रस्ता येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात हा कार्यक्रम सोमवारी पार पडला. याप्रसंगी राजहंस प्रकाशनाचे संपादक शिरीष सहस्रबुद्धे, अक्षरधारा बुक गॅलरीच्या संचालिका रसिका राठिवडेकर आणि स्नेहा अवसरीकर उपस्थित होत्या. ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांनी पाटील यांची मुलाखत घेतली.

पाटील म्हणाले की, माझी अशीच एक गाजलेली कादंबरी ‘राजहंस’कडे प्रकाशनासाठी दिली हाेती; पण अपेक्षेप्रमाणे लेखन झाले नसल्याने संपादकीय मंडळ नाराज असल्याचे लक्षात आले. तेव्हा मी माजगावकर यांच्याकडून अधिकचा सहा महिन्यांचा कालावधी मागून घेतला आणि त्या कादंबरीला अंतिम रूप दिले.

शेवटच्या क्षणीसुद्धा तुम्हाला पुनर्विचार करावा लागू शकतो. कारण, लेखन ही एक प्रक्रिया असून, पुनर्लेखन हे खरे लेखन असते. लेखकाच्या अंगात एखाद्या विषयाचे झपाटलेपण येत नाही, तोपर्यंत त्या विषयाला न्याय दिल्यासारखे होत नाही. लेखकाने त्याच्या एखाद्या कथा-कादंबरीची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी लेखनासोबत पुनर्लेखनावरही भर देणे आवश्यक आहे. स्तुती करणारे मित्र आजूबाजूला ठेवण्यापेक्षा वेळ प्रसंगी कान पकडणारे आणि तुमच्याकडून अधिकची अपेक्षा करणारे वाचक आणि प्रकाशक तुमच्या आजूबाजूला असणे आवश्यक असते. याप्रसंगी विश्वास पाटील यांनी पानिपत, महानायक, लस्ट फॉर लालबाग आदी कादंबऱ्यांची निर्मितीमागच्या कथा उलगडून सांगितल्या. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानावरही भाष्य केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Writer should freely express thoughts without succumbing to pressure: Vishwas Patil

Web Summary : Vishwas Patil emphasized writers should freely express thoughts, avoiding political, social, or religious pressure. He highlighted the importance of revision in writing and having critical readers. Patil shared insights into his novels and acknowledged Anna Bhau Sathe's literary contribution.
टॅग्स :Puneपुणेmarathiमराठीliteratureसाहित्यSocialसामाजिकakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळPoliticsराजकारण