शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

जागतिक प्राणी दिन विशेष , देवराई टिकली, तर टिकेल वन्यजीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 06:31 IST

देवासाठी राखून ठेवलेले वन म्हणजे ‘देवराई’ या श्रद्धेमुळे देवरायांमध्ये प्राणी, हजारो वर्षांची झाडे, औषधी वनस्पती जतन राहिल्या आहेत.

नीलेश काण्णवघोडेगाव : देवासाठी राखून ठेवलेले वन म्हणजे ‘देवराई’ या श्रद्धेमुळे देवरायांमध्ये प्राणी, हजारो वर्षांची झाडे, औषधी वनस्पती जतन राहिल्या आहेत. देवरायांमध्ये वाढणाºया वनस्पती व प्राण्यांना इजा पोहचल्यास देवाचा कोप होतो, अशी समजूत लोकांमध्ये आहे. यामुळे माणुस आणि निसर्ग यांचे नाते टिकून आहे. या देवरायांमध्ये अनेक प्राणी, पशुपक्षी, किटकांचा अधिवास आहे. या देवरायांकडे आता दुर्लक्ष होऊ लागले असून देवराया सुरक्षीत राहिल्यास हजारो वर्षांचा ठेवा जतन राहणार आहे.

भारतात अंदाजे चौदा हजार तर महाराष्ट्रात चार हजार देवराई असल्याचे केंद्र सरकारच्या सीपीआर पर्यावरण शिक्षण केंद्राने केलेल्या पाहणी अहवालात म्हटले आहे. काही तज्ज्ञांच्या मते देशात एक लाखापेक्षाही जास्त देवराया आहेत. देशात हिमाचल प्रदेशमध्ये सर्वांत जास्त देवराया पाहायला मिळतात. कर्नाटक, उत्तराखंड, केरळ राज्यांमध्ये मोठ्या आकाराच्या देवराया आहेत. महाराष्ट्रात जास्त देवराया पश्चिम घाटातील पुणे, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.

या देवरायांच्या संरक्षणासाठी आदिवासी समाजाने काही नियम आखून ठेवले आहेत. या देवराईत कोणीही झाडे तोडू शकणार नाही, जळणासाठी लाकूड घेणार नाही, फळे तोडणार नाही, तसेच खाली पडलेली फळे-फुलेही कोणी घेणार नाही, असे नियम आहेत. आदिवासी समाजात फक्त उत्सवामध्ये जेवण तयार करण्यासाठी देवराईत पडलेली वाळलली लाकडे घेतली जातात. काही देवरार्इंमध्ये आदिवासी लोक चप्पल घालूनही जात नाहीत. देवराईतून वाहणारे पाणीही आदिवासी लोक चप्पल घालून ओलांडत नाहीत. देवराई राखून आदिवासी लोकांनी निसर्गाशी समतोल साधून घेतला आहे.

देवराईमध्ये असलेल्या मंदिरात स्थानिक देवतांचे वास्तव्य असते. हा देवच आपले रक्षण करतो, अशी आदिवासी लोकांची धारणा आहे. देवराईतील वाळलेले पान ही खाजगी वापरासाठी कोणी घेऊ शकत नाही. जर देवराईचे नियम मोडल्यास यातील देवता स्वप्नात येऊन, याचा जाब विचारतो, अशी समजूत आहे. याचा परिणाम खोलवर आहे. यामुळे निसर्गाची जपणूक साधली जात आहे.काही देवरायांमधून स्थानिक लोकांना विशिष्ट काळात, विशिष्ट दिवशी, विशिष्ट कामासाठी वस्तु घेण्याची परवानगी आहे. थोडक्यत काही देवरार्इंमध्ये एका कुटुंबाला एकच बांबू घेण्याची परवानगी आहेत.देवरायांच्या संरक्षणात शासनाचे लक्ष हवेया देवरायांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी शासनाने लक्ष दिले पाहिजे. देवराया टिकल्या तर पुरातन काळातील झाडे, वेली येथील जैवविविधता टिकेल, यातील प्राणी, पशु, पक्षी, किटक टिकतील.वन कायद्यांमध्येही यांच्या संरक्षणासाठी ठोस तरतूद नाही. काळाप्रमाणे या देवयारांकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. स्थानिक लोकही नियम डावलून देवरायांमध्ये गुरे चरण्यासाठी सोडताना दिसतात.देवरायांचे महत्व पटवून त्यांचे जतन करण्यासाठी या देवराया संरक्षीत ठिकाण म्हणून जाहीर केल्या पाहिजेत.

टॅग्स :Puneपुणे