शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

Pune Satara Highway: पुणे - सातारा महामार्गाचे काम रखडले; दहा वर्षे उलटूनही काम अपूर्णच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 19:04 IST

पुणे - सातारा दरम्यानच्या सुमारे १४० किलोमीटरच्या अंतरासाठीच्या सहा पदरी रस्त्याचे काम करारानुसार २०१० मध्ये पूर्ण होणार होते

राहुल पांगारे

खेड - शिवापूर : पुणे - सातारा महामार्गाचे काम तीन वर्षांत संपवण्याचा कालावधी होता. मात्र, तब्बल १० वर्षे उलटूनही या महामार्गाचे काम अपूर्णच आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने हा महामार्ग महत्वपूर्ण मानला जातो. असे असतानाही ठेकेदार कंपनी रिलायन्स इन्फ्राला सहा वेळा मुदतवाढ देऊनही हे काम पूर्ण होत नाही. याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणही याबाबत गप्प बसले आहे.

पुणे - सातारा दरम्यानच्या सुमारे १४० किलोमीटरच्या अंतरासाठीच्या सहा पदरी रस्त्याच्या कामाला २०१०मध्ये सुरुवात झाली. बांधा, वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर बांधल्या जाणाऱ्या या रस्त्याचे काम अंदाजे तीन वर्षांमध्ये म्हणजेच मार्च २०१३ मध्ये पूर्ण केले जाईल, असा करारच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व या महामार्गाचे काम करणारी खासगी कंपनी रिलायन्स इन्फ्रा स्ट्रक्चर यांच्यात झाला होता.

मार्च २०२३ संपला तरी या रस्त्याचे काम अर्धवटच आहे. सुमारे सहा वेळा मुदतवाढ घेऊनही महामार्गावरील अनेक ठिकाणची सेवा रस्त्याची कामे, अनेक गावांच्या जवळील उड्डाणपुलांची कामे अपूर्ण आहेत, तर काही चालू झालेली नाहीत. सेवा रस्त्यावरील स्वच्छतागृहे, महामार्गाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, महामार्गावर पथदिवे एक ना अनेक कामे अजूनही अपूर्णच आहेत.

याबाबत नेमकं कुणाचे आणि काय चुकते आहे, याची काहीच माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सध्याचे अधिकारी देत नाहीत. रस्त्यावर टोल मात्र काम पूर्ण होण्याच्या अगोदरच घेतला जात आहे आणि वेळोवेळी त्याच्यामध्ये वाढही करण्यात येत आहे. रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम तसेच सेवा रस्त्यांची कामे अनेक ठिकाणी अपूर्ण असतानाही टोल मात्र सहा पदरी रस्त्याचा घेतला जात आहे. सोयीसुविधांचा अभाव मात्र टोलच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारला जात असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व प्रशासन मात्र डोळे मिटून झोपेचे सोंग घेत आहे, अशा प्रकारची भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

गेल्यात दहा - बारा वर्षांमध्ये या महामार्गावर अपघात झाले. शेकडो लोकांनी या ठिकाणी आपला जीव गमावला, असे असताना प्राधिकरणाच्या वतीने किंवा प्रशासनाच्या वतीने रिलायन्स इन्फ्रासारख्या कंपनीला साधा जाब विचारला गेला नाही, की त्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल झाला नाही, याचं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एरव्ही एखाद्याने छोटासा गुन्हा केला किंवा एखाद्या कराराचा भंग केला की, त्याच्यावर कारवाई करणाऱ्या प्रशासनाने मात्र रिलायन्स इन्फ्रासारख्या ठेकेदार कंपनीवर एवढ्या वर्षांमध्ये एखादी दुसरी अपवादात्मक कारवाई सोडली तर कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केल्याचे दिसून येत नाही.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणते...

पुणे - सातारा महामार्ग कामाचा प्रकल्प अहवाल २००७-०८ मध्ये तयार झाला. त्यानंतर २०१०मध्ये कामाला सुरुवात करण्यात आली. शासनाकडून सदर काम चालू होण्यापूर्वी ठेकेदार कंपनीस जमीन संपादित करून देणे आवश्यक होते. मात्र, शासनाकडून जमीन संपादित करून देण्यास विलंब झाला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडूनही कामांमध्ये अडथळा आणून काम बंद करण्याच्या घटना घडल्या तसेच ठेकेदार कंपनीनेही कामांमध्ये दिरंगाई केली. एवढेच नाही तर अनेक कारणे या महामार्गाच्या कामाला उशीर होण्यास कारणीभूत आहेत. मात्र, सद्यस्थितीला जवळजवळ ९८ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या काही दिवसातच अपूर्ण कामेही पूर्ण केली जातील.

टॅग्स :PuneपुणेSatara areaसातारा परिसरhighwayमहामार्गGovernmentसरकार