शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’च्या मंदीत महिलांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST

भारतीय लष्करात मोठी भरती : ‘कोरोना’च्या मंदीत महिलांना केंद्र शासनाच्या नोकरीची संधी -- बारामती : कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या ...

भारतीय लष्करात मोठी भरती : ‘कोरोना’च्या मंदीत महिलांना

केंद्र शासनाच्या नोकरीची संधी

--

बारामती :

कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या मंदीच्या काळात महिलांना कें द्र शासनाच्या नोकरीची संधी मिळाली आहे. भारतीय लष्करातील सोल्जर जनरल ड्यूटी म्हणजेच वूमन मिलिटरी पोलीस या पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. महिलांसाठी गेल्या काही वर्षांतील ही तिसरी संधी आहे.

या पदासाठी शंभर जागा असून त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ६ जून ते २० जुलै २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर महिला उमेदवारांना त्यांच्या इमेलवर अ‍ॅडमिट कार्ड पाठवले जाणार आहे. त्या ॲडमिट कार्डवर भरतीचे ठिकाण, दिनांक, वेळ इत्यादी सर्व गोष्टी नमूद असणार आहेत. ही रॅली महाराष्ट्रातील उमेदवारांना पुण्यामध्ये असणार आहे. यासाठीची वयाची पात्रता ही १७.५ ते २१ वर्ष या दरम्यान आहे म्हणजेच महिला उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर २००० ते एप्रिल २००४ या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच उंची १५२ सेंटीमीटर, वजन उंची आणि वयाच्या प्रमाणात असावे. यासाठीचे शिक्षण ४५ टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असावे. शारीरिक पात्रता मध्ये काही घटकांना सवलत देण्यात आली आहे.

यामध्ये आजी-माजी सैनिकांच्या मुली, शहीद सैनिकांच्या मुली यांना उंची दोन सेंटीमीटर, वजनात दोन किलो सवलत देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीला शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाते. या शारीरिक क्षमता चाचणी १.६ किलो मीटर म्हणजे सोळाशे मीटर धावणे हा महत्त्वाचा प्रकार आहे त्यासाठी गुणांकन आहे .त्याचबरोबर लांब उडी ,उंच उडी या प्रकारांचा समावेश आहे .पण त्यांना गुण दिले जाणार नाहीत. शारीरिक क्षमता चाचणी झाल्यानंतर महिला उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाणार आहे. या वैद्यकीय चाचणीत शारीरिक दृष्ट्या व मानसिक दृष्ट्या फिट असणे आवश्यक आहे .तसेच प्रेग्नेंसी व टॅटू ला प्रतिबंध केला आहे. परमनंट टॅटू हाताच्या दर्शनी भागावर असेल तर उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर जावे लागेल. वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची आहे. यासाठी निगेटिव्ह मार्किंग आहे. या लेखी परीक्षेतून आजी-माजी सैनिकांच्या मुली विधवा व एनसीसी धारक महिला उमेदवार यांना काही गुण दिले जातात. अशा पद्धतीने मैदानी चाचणी व लेखी परीक्षेतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पण उमेदवारांची संख्या जास्त आल्यास दहावीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची संख्या मर्यादित केली जाईल.

--

कोट

महिलांना गेल्या काही वर्षांपासून नव्यानेच लष्करात दाखल होण्याची संधी मिळत आहे. ही तिसरी भरती आहे. त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर अ‍ॅडमिट कार्ड मिळते. हे कार्ड घेऊनच भरतीला जावे. ही भरती खुली नसते ही बाब लक्षात घ्यावी.

उमेश रुपनवर

सांचलक, सह्याद्री करीअर अ‍ॅकॅडमी

————————————————

————————————