शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरेंना विनंती करणार; चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 18:43 IST

कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध करावी म्हणून राज ठाकरेंनी सुद्धा मविआला विनंती केली होती

पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यावर भाजपचे नेते प्रचारासाठी पुण्यात येऊ लागले आहेत. आजही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रचारासाठी पुण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरेंनाही प्रचारात सहभागी होण्याची विनंती करणार असल्याचे सांगितली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले ,कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध करावी म्हणून आम्ही महाविकास आघाडीला विनंती केली होती. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही विनंती केली होती. महाविकास आघाडीने आमची विनंती मान्य केली नाही. पण राज ठाकरे यांनी आमची विनंती मान्य केली. राज ठाकरे यांनी प्रचारात सहभागी व्हावे म्हणून आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. ते येत नसतील तर त्यांचा प्रतिनिधी तरी प्रचारासाठी देण्यात यावा अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहे. राष्टवादीचे जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावे किंवा विरोधीपक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री व्हावे हा त्यांचा अंर्तगत प्रश्न आहे. मात्र त्यांचा मनसुबा यशस्वी होऊ शकला नाही. शिवसेनेचे नुकसान करून २०१९ मध्ये १०० आमदार निवडून आणण्याचे आदेश होते, आता २०२४ मध्ये बघूया कुणाचा मुख्यमंत्री होतो ते, असंही बावनकुळे यांनी सांगितले.

शहा यांचा दौरा नियोजित

कसब्याचं आम्हाला आव्हान नसून आम्ही प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेत असतो. कसब्यात केंद्रीय पातळीवरून कुणीही प्रचारासाठी येणार नाही. राज्य पातळीवरचे नेते प्रचारासाठी येतील. अमित शहा यांचा दौरा आणि निवडणुकीचा काहीच संबंध नाही. शाह यांचा दौरा नियोजित होता, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

फडणवीस यांना अभिमन्यू करण्यात आलं

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरें यांच्या सभांचे रेकॉर्ड माझ्याकडे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणार असच म्हटलं गेलं. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांना अभिमन्यू करण्यात आलं आहे. सूड भावनेने कधी काम केलं नाही पण फडणवीस यांचा विश्वासघात केला जातोय, असंही त्यांनी सांगितलं.

भीमाशंकर बाबत काय दावा करायचा तो करू द्या, आपली श्रद्धास्थान कायम

आसाम सरकारने महाराष्ट्रातील भीमाशंकर या देवस्थानावर दावा केला आहे. त्याबाबत विचारले असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आसाम सरकारला काय दावा करायचा तो करूद्या. मात्र आपली श्रद्धास्थान कायम राहणार आहेत, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.ज्या विरोधकांनी उद्योगांसाठी एकही बैठक घेतली नाही. ते आता उद्योग गेला म्हणत आहेत. फक्त बातम्या पेरण्याचे काम करत आहेत. पण एकही पेपर दाखवू शकले नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाMNSमनसे