शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पूजा चव्हाण प्रकरणी पोलिस तपास झाला नाही तर न्यायालयात जाऊ; पुण्यातल्या वकिलाचा पोलिसांना अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 17:33 IST

पूजेची हत्या झाली की आत्महत्या हे अजून कळालेले नाही. जर एफआयआरच दाखल केला नाहीतर पोलीस तपास कसा करणार?

पुणे : पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येला आठ ते नऊ दिवस उलटून गेल्यावर कोणतीच कारवाई करण्यात आले नाही. तसेच वानवडी पोलीस ठाण्यात अद्याप एफआयआर सुद्धा दाखल करून घेण्यात आलेला नाही. आता याप्रकरणी पुण्यातील वकिलांच्या जस्टीस लीग सोसायटीने वानवडी पोलिसांत तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

पुण्यामध्ये २२ वर्षांच्या पूजा चव्हाण या तरुणीने रविवारी( दि.7) इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली होती. याप्रकरणी ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणात वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव जोडले गेल्याने या प्रकरणाला गंभीर वळण घेतले आहे. मात्र, आठवडा उलटून सुद्धा पोलिसांकडुन अद्याप गुन्हा नोंद करण्यात आला नाही. यामध्ये तिच्या नातेवाईकांचे जबाब नोंदण्यात आले आहेत. मात्र ते सर्वजण बीड येथे आहेत. तसेच याप्रकरणात तक्रार देण्यात आलेली नाही. त्यामुळे अद्याप पोलिसांनी गुन्हा नोंद केला नसल्याचे पोलिसांकडुन सांगण्यात येत आहे. 

आता पुण्यातील वकिलांच्या संघटनेने पूजाच्या आत्महत्येप्रकरणी बुधवारी वानवडी पोलीस ठाणे गाठले. त्याचवेळी पूजाच्या घटनेत पोलिसांनी अद्यापही एफआयआर का दाखल केला नाही हे संशयास्पद असल्याचे म्हणत तक्रार दाखल केली.तसेच घटनेला इतके दिवस उलटून देखील पोलिसांनी साधा एफआयआर सुद्धा का दाखल करून घेतला नाही. हा दखलपात्र गुन्हा असून सुद्धा पोलिसांच्या दिरंगाईमुळे घटनेशी संबंधित संशयित आरोपी म्हणून ज्यांचे नावे समोर येत आहे त्यापैकी काही जण फरार होत आहे. पोलीस प्रशासन याबाबत कुठली कारवाई करतेय की नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे.  दखलपात्र गुन्हा असून सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला जात नसेल तर ही चुकीची बाब आहे. आणि त्याविरुद्ध आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. 

अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे म्हणाले, सुशांतसिंग राजपूत केसमध्ये बिहारमध्ये एफआयआर दाखल झाला आणि नंतर तपास केला गेला. तपासानंतर सत्य असत्य बाहेर येईल. मात्र, सर्वात आधी पोलिसांनी एफआयआर तरी दाखल करायला हवा. पूजेची हत्या झाली की आत्महत्या हे अजून कळालेले नाही. जर एफआयआरच दाखल केला नाहीतर पोलीस तपास कसा करणार? पुणे पोलिसांनी चौकशीची पावले उचलली नाहीत तर हायकोर्टात जाण्याचा इशारा पुण्यातील जस्टीस लीग सोसायटीने दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसadvocateवकिलHigh Courtउच्च न्यायालय