शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागात उच्चशिक्षण घेतलेल्यांना संधी का नाही? हा पदवीधरांवर अन्याय, विद्यार्थ्यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 10:05 IST

महाराष्ट्र सरकारच्या नव्या परिपत्रकात केवळ १० वी -१२ वी उत्तीर्ण असलेल्यांना संधी दिली आहे, त्यापेक्षा अधिक पात्रता असलेल्यांना सहभागी होता येणार नाही

पुणे : महाराष्ट्रात सरकारी नोकरीसाठी उच्चशिक्षण घेतलेल्यांना धक्का बसला आहे. वनविभागातर्फे वनसेवक पदासाठी परिपत्रक काढण्यात आले असून, त्यात केवळ दहाबी-बारावी उत्तीर्ण असलेल्यांना संधी दिली आहे. त्यापेक्षा अधिक पात्रता असलेल्यांना सहभागी होता येणार नाही, हा पदवीधरांवर अन्याय असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी केला.

महाराष्ट्र राज्याच्या वतीने (दि.५) डिसेंबर रोजी एक परिपत्रक काढण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या नव्या परिपत्रकामुळे राज्यभरातील विद्यार्थी आणि बेरोजगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारने वनविभागातील गट-ड श्रेणीच्या १२,९९१ पदांची भरती जाहीर केली असून, या पदांसाठी अर्जदारांची शैक्षणिक पात्रता ही फक्त दहावी ते बारावी इतकीच असावी, अशी अट घातली आहे. यामुळे उच्चशिक्षण घेतलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार नाहीत. परिणामी उच्चशिक्षण घेतलेले लाखो युवक-युवतींचे स्वप्न भंग झाले आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभर संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे. एकीकडे सरकार शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देत असल्याचा दावा करते, तर दुसरीकडे उच्चशिक्षण घेतलेल्यांना सरकारी नोकरीच्या संधीपासून वंचित ठेवत आहे. यामुळे विद्यार्थी आणि बेरोजगारांमध्ये असंतोष पसरला आहे.

विद्यार्थी विठ्ठल नारायण बडे याने सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. तो म्हणाला की, उच्चशिक्षण घेतलेले विद्यार्थी वर्षानुवर्षे सरकारी नोकरीची तयारी करत असतात. अशा वेळी सरकारचा हा निर्णय अत्यंत अन्यायकारक आहे. त्यांनी सरकारला विनंती केली आहे की, ही अट काढून टाकण्यात यावी. अन्यथा विद्यार्थी रस्त्यावर उतरतील.

टॅग्स :Puneपुणेforest departmentवनविभागStudentविद्यार्थीEducationशिक्षणEmployeeकर्मचारीexamपरीक्षा