शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वनविभागात उच्चशिक्षण घेतलेल्यांना संधी का नाही? हा पदवीधरांवर अन्याय, विद्यार्थ्यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 10:05 IST

महाराष्ट्र सरकारच्या नव्या परिपत्रकात केवळ १० वी -१२ वी उत्तीर्ण असलेल्यांना संधी दिली आहे, त्यापेक्षा अधिक पात्रता असलेल्यांना सहभागी होता येणार नाही

पुणे : महाराष्ट्रात सरकारी नोकरीसाठी उच्चशिक्षण घेतलेल्यांना धक्का बसला आहे. वनविभागातर्फे वनसेवक पदासाठी परिपत्रक काढण्यात आले असून, त्यात केवळ दहाबी-बारावी उत्तीर्ण असलेल्यांना संधी दिली आहे. त्यापेक्षा अधिक पात्रता असलेल्यांना सहभागी होता येणार नाही, हा पदवीधरांवर अन्याय असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी केला.

महाराष्ट्र राज्याच्या वतीने (दि.५) डिसेंबर रोजी एक परिपत्रक काढण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या नव्या परिपत्रकामुळे राज्यभरातील विद्यार्थी आणि बेरोजगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारने वनविभागातील गट-ड श्रेणीच्या १२,९९१ पदांची भरती जाहीर केली असून, या पदांसाठी अर्जदारांची शैक्षणिक पात्रता ही फक्त दहावी ते बारावी इतकीच असावी, अशी अट घातली आहे. यामुळे उच्चशिक्षण घेतलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार नाहीत. परिणामी उच्चशिक्षण घेतलेले लाखो युवक-युवतींचे स्वप्न भंग झाले आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभर संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे. एकीकडे सरकार शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देत असल्याचा दावा करते, तर दुसरीकडे उच्चशिक्षण घेतलेल्यांना सरकारी नोकरीच्या संधीपासून वंचित ठेवत आहे. यामुळे विद्यार्थी आणि बेरोजगारांमध्ये असंतोष पसरला आहे.

विद्यार्थी विठ्ठल नारायण बडे याने सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. तो म्हणाला की, उच्चशिक्षण घेतलेले विद्यार्थी वर्षानुवर्षे सरकारी नोकरीची तयारी करत असतात. अशा वेळी सरकारचा हा निर्णय अत्यंत अन्यायकारक आहे. त्यांनी सरकारला विनंती केली आहे की, ही अट काढून टाकण्यात यावी. अन्यथा विद्यार्थी रस्त्यावर उतरतील.

टॅग्स :Puneपुणेforest departmentवनविभागStudentविद्यार्थीEducationशिक्षणEmployeeकर्मचारीexamपरीक्षा