शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वनविभागात उच्चशिक्षण घेतलेल्यांना संधी का नाही? हा पदवीधरांवर अन्याय, विद्यार्थ्यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 10:05 IST

महाराष्ट्र सरकारच्या नव्या परिपत्रकात केवळ १० वी -१२ वी उत्तीर्ण असलेल्यांना संधी दिली आहे, त्यापेक्षा अधिक पात्रता असलेल्यांना सहभागी होता येणार नाही

पुणे : महाराष्ट्रात सरकारी नोकरीसाठी उच्चशिक्षण घेतलेल्यांना धक्का बसला आहे. वनविभागातर्फे वनसेवक पदासाठी परिपत्रक काढण्यात आले असून, त्यात केवळ दहाबी-बारावी उत्तीर्ण असलेल्यांना संधी दिली आहे. त्यापेक्षा अधिक पात्रता असलेल्यांना सहभागी होता येणार नाही, हा पदवीधरांवर अन्याय असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी केला.

महाराष्ट्र राज्याच्या वतीने (दि.५) डिसेंबर रोजी एक परिपत्रक काढण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या नव्या परिपत्रकामुळे राज्यभरातील विद्यार्थी आणि बेरोजगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारने वनविभागातील गट-ड श्रेणीच्या १२,९९१ पदांची भरती जाहीर केली असून, या पदांसाठी अर्जदारांची शैक्षणिक पात्रता ही फक्त दहावी ते बारावी इतकीच असावी, अशी अट घातली आहे. यामुळे उच्चशिक्षण घेतलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार नाहीत. परिणामी उच्चशिक्षण घेतलेले लाखो युवक-युवतींचे स्वप्न भंग झाले आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभर संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे. एकीकडे सरकार शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देत असल्याचा दावा करते, तर दुसरीकडे उच्चशिक्षण घेतलेल्यांना सरकारी नोकरीच्या संधीपासून वंचित ठेवत आहे. यामुळे विद्यार्थी आणि बेरोजगारांमध्ये असंतोष पसरला आहे.

विद्यार्थी विठ्ठल नारायण बडे याने सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. तो म्हणाला की, उच्चशिक्षण घेतलेले विद्यार्थी वर्षानुवर्षे सरकारी नोकरीची तयारी करत असतात. अशा वेळी सरकारचा हा निर्णय अत्यंत अन्यायकारक आहे. त्यांनी सरकारला विनंती केली आहे की, ही अट काढून टाकण्यात यावी. अन्यथा विद्यार्थी रस्त्यावर उतरतील.

टॅग्स :Puneपुणेforest departmentवनविभागStudentविद्यार्थीEducationशिक्षणEmployeeकर्मचारीexamपरीक्षा