शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

धरण भरलेले असतानाही पाणीकपात कशासाठी  : डॉ. अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 21:25 IST

महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा पिंपरी-चिंचवड शहराला कधी पाणी टंचाई जाणवली नाही

ठळक मुद्देशहरातील पाणीपुरवठ्याचा घेतला आढावा

पिंपरी : पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या नियोजनात काय चुका केल्या आहेत, काय अडचणी आहेत आदींबाबत पाहणी करणार आहोत, असे सांगत असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा पिंपरी-चिंचवड शहराला कधी पाणी टंचाई जाणवली नाही. त्यावेळी पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसतानाही शहराला दररोज पाणीपुरवठा केला जात होता. आता मात्र पाणीकपात का होत आहे, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. खासदार डॉ. कोल्हे यांनी निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राला शनिवारी भेट दिली. या वेळी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक दत्ता साने आदी यावेळी उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले, दोन वर्षांपूर्वी महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. त्या वेळी कमी पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसतानाही योग्य नियोजनामुळे शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. परिणामी पाणी कपात न करता दरोरज पुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे, हे कसले नियोजन आहे, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. ह्यस्मार्ट सिटीह्णअंतर्गत अनेक कामे अर्धवट आहेत. ऑ प्टीकल फायबर लेईंगचे काम झाले आहे. मात्र, कव्हरिगंसाठी अनेक ठिकाणी फक्त मुरूम वापरला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीची कामे नक्की स्मार्टली होत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसDamधरणBJPभाजपा