शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
3
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
4
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
5
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
6
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
7
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
8
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
9
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
10
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
11
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
12
'जुम्मा गर्ल' किमी काटकर आठवतेय का? लेटेस्ट फोटो आला समोर, ओळखणं झालंय कठीण
13
’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
14
रिलेशिनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले गौरव कपूर-कृतिका कामरा, व्हिडीओ व्हायरल
15
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
16
Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता
17
"माझ्या एका सिगारेटने दिल्लीच्या प्रदूषणात फरक पडणार नाही"; TMC खासदाराचं भाजपाला प्रत्युत्तर
18
Rahul Gandhi: "लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे" लोकसभेत राहुल गांधींचं महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य!
19
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
20
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानवर वर्चस्वाची संधी का गमावली? प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 11:26 IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची गरज नसताना मध्यस्थी झालीच होती तर, पाकिस्तानकडून पुन्हा भारतावर हल्ला होणार नाही असे वदवून का घेतले नाही?

पुणे: भारत-पाकिस्तान संघर्षात पाकिस्तानकडून नेहमीच होणारा दहशतवादाचा त्रास कायमचा मिटविण्याची संधी असताना युद्धबंदी करून ती का गमावली? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शुक्रवारी (दि.६) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना केला. यावेळी भारत-पाकिस्तानमधील संघर्षात तिसऱ्या देशाने म्हणजेच अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची गरज नव्हती. जर मध्यस्थी झालीच होती तर, पाकिस्तानकडून पुन्हा भारतावर हल्ला होणार नाही असे वदवून का घेतले नाही. जर पाकिस्तानचे हल्ले निष्फळ झाले, तर भारतीय हवाई दलाचे नुकसान झाले कसे? हे नुकसान अंतर्गत तोडफोडीमुळे झाले का? असे प्रश्नही उपस्थित केले.

पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर यांनी सिंगापूरमधील शांग्री-ला संवादात भारताचे संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी दिलेल्या वक्तव्याचा संदर्भ दिला. चौहान यांनी भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पहिल्या दिवशी भारतीय हवाई दलाची मालमत्ता नष्ट झाल्याची कबुली दिली होती. यावरून जाब विचारला की, जर पाकिस्तानचे हल्ले निष्फळ ठरले होते, तर भारताचे नुकसान कशामुळे झाले? हे प्रश्न केवळ राजकीय नसून, देशाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारे आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे झालेले नुकसान केवळ बाह्य हल्ल्यामुळे की अंतर्गत त्रुटींमुळे? यावर सरकारने स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचे सांगितले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून काढलेल्या तिरंगा विजय फेरीवर टीका करत, भाजप या मोहिमेचे श्रेय घेत असताना, सरकारकडून प्रत्यक्षात काय घडले, यावर पारदर्शक माहिती दिली जात नाही.

आंबेडकर यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या आधीच्या ब्रीफिंगची आठवण करून दिली, ज्यात सांगण्यात आले होते की, पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे भारताने निष्क्रिय केली. याच पार्श्वभूमीवर मग हवाई दलाचे नुकसान कसे झाले? हे नुकसान केवळ शत्रू पक्षामुळे झाले, की आतून कोणी तोडफोड केली? देशाच्या सुरक्षेसंबंधी इतका महत्त्वाचा मुद्दा असताना, पंतप्रधानांनी देशाला काहीही सांगितलेले नाही. त्यांनी देशाची दिशाभूल केली का? असा सवाल केला.

 

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकारairforceहवाईदलPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला