शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

पाकिस्तानवर वर्चस्वाची संधी का गमावली? प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 11:26 IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची गरज नसताना मध्यस्थी झालीच होती तर, पाकिस्तानकडून पुन्हा भारतावर हल्ला होणार नाही असे वदवून का घेतले नाही?

पुणे: भारत-पाकिस्तान संघर्षात पाकिस्तानकडून नेहमीच होणारा दहशतवादाचा त्रास कायमचा मिटविण्याची संधी असताना युद्धबंदी करून ती का गमावली? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शुक्रवारी (दि.६) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना केला. यावेळी भारत-पाकिस्तानमधील संघर्षात तिसऱ्या देशाने म्हणजेच अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची गरज नव्हती. जर मध्यस्थी झालीच होती तर, पाकिस्तानकडून पुन्हा भारतावर हल्ला होणार नाही असे वदवून का घेतले नाही. जर पाकिस्तानचे हल्ले निष्फळ झाले, तर भारतीय हवाई दलाचे नुकसान झाले कसे? हे नुकसान अंतर्गत तोडफोडीमुळे झाले का? असे प्रश्नही उपस्थित केले.

पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर यांनी सिंगापूरमधील शांग्री-ला संवादात भारताचे संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी दिलेल्या वक्तव्याचा संदर्भ दिला. चौहान यांनी भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पहिल्या दिवशी भारतीय हवाई दलाची मालमत्ता नष्ट झाल्याची कबुली दिली होती. यावरून जाब विचारला की, जर पाकिस्तानचे हल्ले निष्फळ ठरले होते, तर भारताचे नुकसान कशामुळे झाले? हे प्रश्न केवळ राजकीय नसून, देशाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारे आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे झालेले नुकसान केवळ बाह्य हल्ल्यामुळे की अंतर्गत त्रुटींमुळे? यावर सरकारने स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचे सांगितले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून काढलेल्या तिरंगा विजय फेरीवर टीका करत, भाजप या मोहिमेचे श्रेय घेत असताना, सरकारकडून प्रत्यक्षात काय घडले, यावर पारदर्शक माहिती दिली जात नाही.

आंबेडकर यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या आधीच्या ब्रीफिंगची आठवण करून दिली, ज्यात सांगण्यात आले होते की, पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे भारताने निष्क्रिय केली. याच पार्श्वभूमीवर मग हवाई दलाचे नुकसान कसे झाले? हे नुकसान केवळ शत्रू पक्षामुळे झाले, की आतून कोणी तोडफोड केली? देशाच्या सुरक्षेसंबंधी इतका महत्त्वाचा मुद्दा असताना, पंतप्रधानांनी देशाला काहीही सांगितलेले नाही. त्यांनी देशाची दिशाभूल केली का? असा सवाल केला.

 

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकारairforceहवाईदलPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला