शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

पाकिस्तानवर वर्चस्वाची संधी का गमावली? प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 11:26 IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची गरज नसताना मध्यस्थी झालीच होती तर, पाकिस्तानकडून पुन्हा भारतावर हल्ला होणार नाही असे वदवून का घेतले नाही?

पुणे: भारत-पाकिस्तान संघर्षात पाकिस्तानकडून नेहमीच होणारा दहशतवादाचा त्रास कायमचा मिटविण्याची संधी असताना युद्धबंदी करून ती का गमावली? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शुक्रवारी (दि.६) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना केला. यावेळी भारत-पाकिस्तानमधील संघर्षात तिसऱ्या देशाने म्हणजेच अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची गरज नव्हती. जर मध्यस्थी झालीच होती तर, पाकिस्तानकडून पुन्हा भारतावर हल्ला होणार नाही असे वदवून का घेतले नाही. जर पाकिस्तानचे हल्ले निष्फळ झाले, तर भारतीय हवाई दलाचे नुकसान झाले कसे? हे नुकसान अंतर्गत तोडफोडीमुळे झाले का? असे प्रश्नही उपस्थित केले.

पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर यांनी सिंगापूरमधील शांग्री-ला संवादात भारताचे संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी दिलेल्या वक्तव्याचा संदर्भ दिला. चौहान यांनी भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पहिल्या दिवशी भारतीय हवाई दलाची मालमत्ता नष्ट झाल्याची कबुली दिली होती. यावरून जाब विचारला की, जर पाकिस्तानचे हल्ले निष्फळ ठरले होते, तर भारताचे नुकसान कशामुळे झाले? हे प्रश्न केवळ राजकीय नसून, देशाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारे आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे झालेले नुकसान केवळ बाह्य हल्ल्यामुळे की अंतर्गत त्रुटींमुळे? यावर सरकारने स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचे सांगितले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून काढलेल्या तिरंगा विजय फेरीवर टीका करत, भाजप या मोहिमेचे श्रेय घेत असताना, सरकारकडून प्रत्यक्षात काय घडले, यावर पारदर्शक माहिती दिली जात नाही.

आंबेडकर यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या आधीच्या ब्रीफिंगची आठवण करून दिली, ज्यात सांगण्यात आले होते की, पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे भारताने निष्क्रिय केली. याच पार्श्वभूमीवर मग हवाई दलाचे नुकसान कसे झाले? हे नुकसान केवळ शत्रू पक्षामुळे झाले, की आतून कोणी तोडफोड केली? देशाच्या सुरक्षेसंबंधी इतका महत्त्वाचा मुद्दा असताना, पंतप्रधानांनी देशाला काहीही सांगितलेले नाही. त्यांनी देशाची दिशाभूल केली का? असा सवाल केला.

 

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकारairforceहवाईदलPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला