शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
4
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
5
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
6
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
7
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
8
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
9
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
10
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
11
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
12
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
13
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
14
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
15
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
16
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
17
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
18
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
19
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...

मराठा समाजाचे प्रश्न का चिघळले? त्यांची सत्ता असताना काय उपाययोजना केल्या? फडणवीस यांचे विरोधकांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 13:17 IST

मराठा समाजाच्या आंदोलनात कधीही यापूर्वी असे झाले नव्हते परंतु, आता जे होत आहे, ते अतिशय निंदनीय आहे

पुणे : मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला कोर्टाच्या अटी, शर्तीनुसार परवानगी दिली होती. परंतु, आंदोलकांकडून रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने वागणूक सुरू आहे. याबाबत उच्च न्यायालयाने मुंबईत कोणाला येऊ देऊ नका, असे निर्देश राज्य सरकारला दिले असून, आंदोलकांच्या वर्तणुकीबाबत कोर्टाने नाराजी व्यक्त केली. याबाबत कोर्टाने काही निर्देश दिले असून, जे काही निर्देश आहेत, ते पालन करणे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे. प्रशासन त्या निर्देशांचे पालन करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. १) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ यांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर सगळ्या पर्यायांचा विचार करण्यात आला. आरक्षण कोर्टात कसे टिकेल, यावर चर्चा करण्यात आली. मात्र, महिला पत्रकारांचा विनयभंग हे कुठेतरी आंदोलनाला गालबोट लावल्यासारखे आहे. मराठा समाजाच्या आंदोलनात कधीही यापूर्वी असे झाले नव्हते. परंतु, आता जे होत आहे, ते अतिशय निंदनीय आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा कायद्याच्या अखत्यारीत असून, केंद्राच्या हातात नाही. पहिल्या दिवशी आंदोलकांनी जो काही धुडगूस घातला, त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती. त्यानंतर मग लगेच आम्हाला उपाशी ठेवल्याचा आरोप करण्यात आला. पण तसे काही नव्हते, काही लोकांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला होता म्हणून दुकाने बंद करण्यात आली होती. आम्ही व्यापाऱ्यांना सांगितले की, इथे पोलिस संरक्षण देऊ, तुम्ही दुकाने उघडी ठेवा. आता दुकाने उघडी आहेत.

राजकीय पोळी भाजणे बंद करा 

खासदार सुप्रिया सुळेंसह सर्व राजकीय नेत्यांना माझी विनंती आहे की, सामाजिक प्रश्नांवर राजकीय पोळी भाजणे बंद केले पाहिजे. कारण, त्यामुळे आपलेच तोंड पोळते. मराठा समाजाचे प्रश्न का चिघळले? त्यांची सत्ता असताना त्यांनी मराठा समाजासाठी काय उपाययोजना केल्या? २०१९ नंतर पुन्हा अडीच वर्षे त्यांची सत्ता होती. यावेळी एकही प्रश्न मराठा समाजाच्या बाजूने घेतले नाहीत. जे काही निर्णय घेतले ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी घेतले आहेत, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी