शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मराठा समाजाचे प्रश्न का चिघळले? त्यांची सत्ता असताना काय उपाययोजना केल्या? फडणवीस यांचे विरोधकांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 13:17 IST

मराठा समाजाच्या आंदोलनात कधीही यापूर्वी असे झाले नव्हते परंतु, आता जे होत आहे, ते अतिशय निंदनीय आहे

पुणे : मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला कोर्टाच्या अटी, शर्तीनुसार परवानगी दिली होती. परंतु, आंदोलकांकडून रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने वागणूक सुरू आहे. याबाबत उच्च न्यायालयाने मुंबईत कोणाला येऊ देऊ नका, असे निर्देश राज्य सरकारला दिले असून, आंदोलकांच्या वर्तणुकीबाबत कोर्टाने नाराजी व्यक्त केली. याबाबत कोर्टाने काही निर्देश दिले असून, जे काही निर्देश आहेत, ते पालन करणे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे. प्रशासन त्या निर्देशांचे पालन करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. १) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ यांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर सगळ्या पर्यायांचा विचार करण्यात आला. आरक्षण कोर्टात कसे टिकेल, यावर चर्चा करण्यात आली. मात्र, महिला पत्रकारांचा विनयभंग हे कुठेतरी आंदोलनाला गालबोट लावल्यासारखे आहे. मराठा समाजाच्या आंदोलनात कधीही यापूर्वी असे झाले नव्हते. परंतु, आता जे होत आहे, ते अतिशय निंदनीय आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा कायद्याच्या अखत्यारीत असून, केंद्राच्या हातात नाही. पहिल्या दिवशी आंदोलकांनी जो काही धुडगूस घातला, त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती. त्यानंतर मग लगेच आम्हाला उपाशी ठेवल्याचा आरोप करण्यात आला. पण तसे काही नव्हते, काही लोकांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला होता म्हणून दुकाने बंद करण्यात आली होती. आम्ही व्यापाऱ्यांना सांगितले की, इथे पोलिस संरक्षण देऊ, तुम्ही दुकाने उघडी ठेवा. आता दुकाने उघडी आहेत.

राजकीय पोळी भाजणे बंद करा 

खासदार सुप्रिया सुळेंसह सर्व राजकीय नेत्यांना माझी विनंती आहे की, सामाजिक प्रश्नांवर राजकीय पोळी भाजणे बंद केले पाहिजे. कारण, त्यामुळे आपलेच तोंड पोळते. मराठा समाजाचे प्रश्न का चिघळले? त्यांची सत्ता असताना त्यांनी मराठा समाजासाठी काय उपाययोजना केल्या? २०१९ नंतर पुन्हा अडीच वर्षे त्यांची सत्ता होती. यावेळी एकही प्रश्न मराठा समाजाच्या बाजूने घेतले नाहीत. जे काही निर्णय घेतले ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी घेतले आहेत, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी