शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
3
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
4
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
5
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
6
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
7
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
8
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
9
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
10
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
11
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
12
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
13
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
14
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
15
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
16
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
17
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
18
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
19
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
20
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाचे प्रश्न का चिघळले? त्यांची सत्ता असताना काय उपाययोजना केल्या? फडणवीस यांचे विरोधकांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 13:17 IST

मराठा समाजाच्या आंदोलनात कधीही यापूर्वी असे झाले नव्हते परंतु, आता जे होत आहे, ते अतिशय निंदनीय आहे

पुणे : मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला कोर्टाच्या अटी, शर्तीनुसार परवानगी दिली होती. परंतु, आंदोलकांकडून रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने वागणूक सुरू आहे. याबाबत उच्च न्यायालयाने मुंबईत कोणाला येऊ देऊ नका, असे निर्देश राज्य सरकारला दिले असून, आंदोलकांच्या वर्तणुकीबाबत कोर्टाने नाराजी व्यक्त केली. याबाबत कोर्टाने काही निर्देश दिले असून, जे काही निर्देश आहेत, ते पालन करणे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे. प्रशासन त्या निर्देशांचे पालन करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. १) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ यांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर सगळ्या पर्यायांचा विचार करण्यात आला. आरक्षण कोर्टात कसे टिकेल, यावर चर्चा करण्यात आली. मात्र, महिला पत्रकारांचा विनयभंग हे कुठेतरी आंदोलनाला गालबोट लावल्यासारखे आहे. मराठा समाजाच्या आंदोलनात कधीही यापूर्वी असे झाले नव्हते. परंतु, आता जे होत आहे, ते अतिशय निंदनीय आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा कायद्याच्या अखत्यारीत असून, केंद्राच्या हातात नाही. पहिल्या दिवशी आंदोलकांनी जो काही धुडगूस घातला, त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती. त्यानंतर मग लगेच आम्हाला उपाशी ठेवल्याचा आरोप करण्यात आला. पण तसे काही नव्हते, काही लोकांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला होता म्हणून दुकाने बंद करण्यात आली होती. आम्ही व्यापाऱ्यांना सांगितले की, इथे पोलिस संरक्षण देऊ, तुम्ही दुकाने उघडी ठेवा. आता दुकाने उघडी आहेत.

राजकीय पोळी भाजणे बंद करा 

खासदार सुप्रिया सुळेंसह सर्व राजकीय नेत्यांना माझी विनंती आहे की, सामाजिक प्रश्नांवर राजकीय पोळी भाजणे बंद केले पाहिजे. कारण, त्यामुळे आपलेच तोंड पोळते. मराठा समाजाचे प्रश्न का चिघळले? त्यांची सत्ता असताना त्यांनी मराठा समाजासाठी काय उपाययोजना केल्या? २०१९ नंतर पुन्हा अडीच वर्षे त्यांची सत्ता होती. यावेळी एकही प्रश्न मराठा समाजाच्या बाजूने घेतले नाहीत. जे काही निर्णय घेतले ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी घेतले आहेत, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी