शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दरवेळी नवऱ्याची अरेरावी कोण सहन करेल? लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक हिंसाचाराच्या तब्बल ५९८ तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 13:08 IST

लॉकडाऊनच्या काळात घरच्यांना वेळ देण्याऐवजी पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आल्याची उदाहरणे समोर

ठळक मुद्देभरोसा सेलकडून ५५ जणांना टेलिफोनिक कौन्सिलिंग छोट्या छोट्या कारणांमुळे पत्नीला मारहाण करण्यापर्यंत पतीची मजल

पुणे : स्वयंपाक करण्यास थोडा उशीर झाला, त्याने सांगितलेल्या सुचनेकडे दुर्लक्ष करुन घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सांगण्याकडे लक्ष दिले, त्याच्या प्रोजेक्टमध्ये मदत करताना मनासारखे प्रेझेंटशन तयार न होणे, इतकेच नव्हे तर घरकामात मदत कर म्हणून म्हटल्याने  इगो दुखावल्याने मारहाण करणे, शिवीगाळ करणे, घरच्यांसमोर अपमानित करणे, लॉकडाऊनच्या काळात महिलांच्या शारीरिक व मानसिक अत्याचारात वाढ  झाली आहे. गेल्या दीड महिन्यापासून पुणे कंट्रोलकडे तब्बल ५९८  तक्रारींची नोंद झाली असून भरोसा सेलच्या वतीने आतापर्यंत ५५ जणांना टेलिफोनिक कौन्सिलिंग करुन मार्गदर्शन करण्यात आले आहे.  सतत काम, धावपळ, ऑफिसच्या कामाचे दडपण, वरिष्ठांच्या सुचनेची तातडीने करावी लागणारी अंमलबजावणी यासारख्या अनेक कारणांचा पाढा कुटुंबाला वेळ देता येत नसल्याचे कारण नवरोबा पत्नीला देतात. मात्र लॉकडाऊनच्या काळात घरच्यांना वेळ देण्याऐवजी पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आल्याची उदाहरणे समोर आली आहेत. छोट्या छोट्या कारणांमुळे पत्नीला मारहाण करण्यापर्यंत पतीची मजल केली आहे. याविषयी अधिक माहिती देताना हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे म्हणाले, आमच्याकडे साधारण २० ते २५ तक्रारींची नोंद झाली आहे. यात प्रामुख्याने नव-याकडून पत्नीला शाररीक व मानसिक त्रास देण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून लोक घरात बसून आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्यात चिडचिडपणा येणे स्वाभाविक आहे. परंतु त्यावर कुणाला शिवीगाळ करणे, अपमानित करणे चुकीचे आहे. पतीला वेळेवर नाश्ता न मिळाल्याने त्याने पत्नीला शिवीगाळ व मारहाण केल्याची आमच्याकडे तक्रार आली आहे. यात पती पत्नीकडे वेगवेगळया पदार्थांची मागणी करत आहे. कामाचा ताण सहन न झाल्याने पत्नीची चिडचिड वाढली आहे. पतीला घराबाहेर पडता येत नसल्याने तसेच इतर कुणी बोलल्याने त्याचा राग घरच्या मंडळीवर काढत असल्याच्या तक्रारीची नोंद करण्यात आली आहे.उच्चशिक्षित मध्यम वर्गातील लोक असे वागत असतील तर काय म्हणावे? घरात सामान अस्ताव्यस्त करुन ठेवणे ते पत्नीने व्यवस्थित न ठेवल्यास तिच्या माहेरच्या व्यक्तींना दोष देणे, पत्नीने सासु सास-यांना उलट बोलणे असे प्रकार दिसून आले आहेत.     भरोसा सेलने देखील टेलिफोनिक कौन्सिलिंगच्या माध्यमातून अनेक नवरोबा, पत्नी आणि सासु सासरे यांना मार्गदर्शन केले आहे. लॉकडाऊन सुरु  झाल्यापासून ५५ तक्रारींचे समुपदेशन करण्यात आले आहे. यात सासु सासरे यांच्याकडून होणारा मानसिक व शारीरिक छळ, नव-याची अरेरावी तसेच पत्नीने पतीला एखादे काम सांगितल्यानंतर त्याचा राग पतीला येणे, माहेरच्या माणसांना दोष देऊन त्यांच्यावरुन टोमणे मारणे असे प्रकार होत आहेत. ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यात सुशिक्षित व्यक्तींचा समावेश मोठ्या संख्येने आहे. आपआपसात सुसंवाद साधुन एकमेकांना वेळ देण्यासाठी लॉकडाऊनचा उपयोग करण्याविषयी त्यांना सांगण्यात येते. कामाचा ताण, करियर, हे सर्व कायम असून त्याशिवाय असणारे आयुष्य सकारात्मकतेने जगण्यासाठी पती-पत्नीने एकमेकांना समजुन घ्यावे.  मुलांना वेळ द्यावा. त्यांच्याशी बोलण्याचा सल्ला त्यांना देण्यात येतो. 

* कौटुंबिक हिंसाचाराबाबत तक्रार करायची असल्यास पोलिसांकडून मदत मिळवता येईल. फँमिली कोर्टात सध्या मुलाबाळांची कस्टडी प्रकरणे (मुलांना भेटणे, घटस्फोट प्रकरणे) सुरु आहेत. मेलमार्फत देखील तक्रार नोंदवता येणार आहे. मुळातच पती-पत्नीने आपआपसांत संवाद ठेवण्याची आवश्यकता आहे.  सध्या घरकामासाठी मोलकरीण नसल्याने त्या सर्व कामाचा ताण पत्नीवर आला आहे. किरकोळ कारणावरुन वाद होत आहेत. आवडीची भाजी न बनवणे, किराणा माल खरेदीसाठी न जाणे यावरुन भांडणे होत आहे. महिलांनी पोलिसांची हेल्पलाईनचा आधार घेऊन तक्रार दाखल करावी.       -अ‍ॅड. वैशाली चांदणे (अध्यक्ष-पुणे फॅमिली कोर्ट असोसिएशन)  

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीadvocateवकिलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFamilyपरिवार