शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक
2
महापालिकेत युती; वाद विसरून एकोपा, देवेंद्र फडणवीस- एकनाथ शिंदे यांचा बैठकीत निर्णय; मुख्यमंत्र्यांसमोर शिंदे-रवींद्र चव्हाण यांच्यात रुसवेफुगवे
3
महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही
4
एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल
5
अनिल अंबानींचा पुत्र जय अनमोलवर गुन्हा; बँकेला २२८ कोटींना फसवल्याचा आरोप सीबीआयने घेतली झडती
6
IND vs SA 1st T20I : पांड्याची 'फिफ्टी' अन् बुमराहची 'सेंच्युरी'; टीम इंडियासमोर द.आफ्रिकेच्या संघानं टेकले गुडघे
7
“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक
8
IND vs SA : सूर्यानं दुसऱ्यावरच दाखवला भरवसा; पांड्या म्हणाला, "मला काहीच फरक पडत नाही!"
9
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहनं रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
10
न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्याविरोधात INDIA आघाडीचे महाभियोग अस्त्र; १२० खासदारांच्या सह्यांसह प्रस्ताव सादर
11
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
12
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
13
२६.६६ कोटींचा गंडा! बनावट स्टॉक स्कीमच्या जाळ्यात फसला व्यापारी; बँक कर्मचाऱ्यासह ७ जण अटकेत
14
हात फॅक्चर असताना ते मैदानात उतरले अन्...! शतकाच्या बादशहानं शेअर केली दिग्गजासोबतच्या शतकाची गोष्ट
15
स्मृती मानधनाच नव्हे, तर 'या' खास ९ लोकांनीही पलाश मुच्छालला केलं 'अनफॉलो', पाहा यादी
16
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
17
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
18
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
19
Numerology: त्रिग्रही लक्ष्मी नारायण योग, ६ मूलांकांना दुपटीने लाभ; पद-पैसा-नफा, चांगला काळ!
20
राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar: महविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण? शरद पवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 17:22 IST

आमच्या पक्षाला निवडणुकीआधी मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यात स्वारस्य नाही

पुणे : निवडणुकीआधी मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यात आमच्या पक्षाला स्वारस्य नाही, सत्ता परिवर्तन होणे हे मला महत्त्वाचे वाटते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले. बदलापूरसारख्या घटना वारंवार घडत आहेत, त्यासंदर्भात असलेल्या जनभावना व्यक्त करण्यासाठी म्हणून बंद आहे, त्यात कसलेही राजकारण नाही, असे त्यांनी सांगितले. (Maharashtra Politics)  

पुण्यात मुक्कामी आले असताना, मोदी बागेतील निवासस्थानी पत्रकारांबरोबर बोलताना पवार यांनी राज्य सरकारने अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जावरही टीका केली. सत्तेत किंवा सत्तेबरोबर असणाऱ्यांच्या कारखान्यांना मदत केली गेली. राज्य सरकार अडचणीत आलेल्यांना मदत करताना नीती ठरवते. आता नीती ठरली, मात्र मदत फक्त सत्तेत असणाऱ्यांच्या कारखान्यांना केली गेली. यापूर्वी असे कधीही होत नव्हते. सरकारमध्ये मंत्र्यांकडून शपथ घेतली जाते. त्यावेळी मी निर्णय घेताना त्यामध्ये न्याय विचार करेल, असे म्हटले जाते. अडचणीत असलेल्यांना मदत करताना त्यात राजकारण आणले जात असेल, तर तो त्या शपथेचा एकप्रकारे भंगच आहे, असे पवार म्हणाले.

महाविकास आघाडीतच असलेल्या उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री कोण ते ठरवा, असे म्हटले आहे. याकडे लक्ष वेधल्यानंतर पवार म्हणाले, मुख्यमंत्री कोण असावा यात राष्ट्रवादी काँग्रेसला स्वारस्य नाही. आत्ता सत्ता परिवर्तन होणे महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. उत्तम प्रशासन देत राज्याचा विकास करणे, यासाठी सत्ता परिवर्तन हवे. त्यामुळे पर्याय कसा देता येईल, यालाच महत्त्व द्यायला हवे.

राज्यात अनेक ठिकाणी तुमच्याकडे येण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. तसे जाहीर केले जात आहे, तुमच्या भेटीसाठी अनेकजण येत आहेत, याबाबत विचारले असता पवार म्हणाले, मी अनेक वर्षे अनेकांबरोबर काम केले आहे. त्यामुळे भेटीगाठी होत असतात. त्यात बाकीचे काही असतेच असे नाही. ३ सप्टेंबरला मी कोल्हापूरला जात आहे. तिथे जाहीर सभा घेण्याचा माझा विचार आहे. त्यात काही गोष्टी उघड करू, असे पवार यांनी सांगितले.

बदलापूर आंदोलकांमध्ये बदलापूरचे कोणीही नव्हते, बाहेरून आलेले लोक होते, अशी टीका करत पोलिस लोकांवर गुन्हे दाखल करत असल्याचे लक्षात आणून दिले असता, पवार यांनी, सरकारमधील कोणी असे बोलणे योग्य नाही, असे सांगितले. ही लोकांमधील अस्वस्थता आहे. भावना व्यक्त करायची लोकांची ती पद्धत असते. यात कोणाला राजकारण करायचे असेल, असे वाटत नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा