शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
4
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
5
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
6
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
7
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
8
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
9
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
10
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
11
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
12
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
13
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
14
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
15
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
16
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
17
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
18
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
19
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
20
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली

Sharad Pawar: महविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण? शरद पवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 17:22 IST

आमच्या पक्षाला निवडणुकीआधी मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यात स्वारस्य नाही

पुणे : निवडणुकीआधी मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यात आमच्या पक्षाला स्वारस्य नाही, सत्ता परिवर्तन होणे हे मला महत्त्वाचे वाटते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले. बदलापूरसारख्या घटना वारंवार घडत आहेत, त्यासंदर्भात असलेल्या जनभावना व्यक्त करण्यासाठी म्हणून बंद आहे, त्यात कसलेही राजकारण नाही, असे त्यांनी सांगितले. (Maharashtra Politics)  

पुण्यात मुक्कामी आले असताना, मोदी बागेतील निवासस्थानी पत्रकारांबरोबर बोलताना पवार यांनी राज्य सरकारने अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जावरही टीका केली. सत्तेत किंवा सत्तेबरोबर असणाऱ्यांच्या कारखान्यांना मदत केली गेली. राज्य सरकार अडचणीत आलेल्यांना मदत करताना नीती ठरवते. आता नीती ठरली, मात्र मदत फक्त सत्तेत असणाऱ्यांच्या कारखान्यांना केली गेली. यापूर्वी असे कधीही होत नव्हते. सरकारमध्ये मंत्र्यांकडून शपथ घेतली जाते. त्यावेळी मी निर्णय घेताना त्यामध्ये न्याय विचार करेल, असे म्हटले जाते. अडचणीत असलेल्यांना मदत करताना त्यात राजकारण आणले जात असेल, तर तो त्या शपथेचा एकप्रकारे भंगच आहे, असे पवार म्हणाले.

महाविकास आघाडीतच असलेल्या उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री कोण ते ठरवा, असे म्हटले आहे. याकडे लक्ष वेधल्यानंतर पवार म्हणाले, मुख्यमंत्री कोण असावा यात राष्ट्रवादी काँग्रेसला स्वारस्य नाही. आत्ता सत्ता परिवर्तन होणे महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. उत्तम प्रशासन देत राज्याचा विकास करणे, यासाठी सत्ता परिवर्तन हवे. त्यामुळे पर्याय कसा देता येईल, यालाच महत्त्व द्यायला हवे.

राज्यात अनेक ठिकाणी तुमच्याकडे येण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. तसे जाहीर केले जात आहे, तुमच्या भेटीसाठी अनेकजण येत आहेत, याबाबत विचारले असता पवार म्हणाले, मी अनेक वर्षे अनेकांबरोबर काम केले आहे. त्यामुळे भेटीगाठी होत असतात. त्यात बाकीचे काही असतेच असे नाही. ३ सप्टेंबरला मी कोल्हापूरला जात आहे. तिथे जाहीर सभा घेण्याचा माझा विचार आहे. त्यात काही गोष्टी उघड करू, असे पवार यांनी सांगितले.

बदलापूर आंदोलकांमध्ये बदलापूरचे कोणीही नव्हते, बाहेरून आलेले लोक होते, अशी टीका करत पोलिस लोकांवर गुन्हे दाखल करत असल्याचे लक्षात आणून दिले असता, पवार यांनी, सरकारमधील कोणी असे बोलणे योग्य नाही, असे सांगितले. ही लोकांमधील अस्वस्थता आहे. भावना व्यक्त करायची लोकांची ती पद्धत असते. यात कोणाला राजकारण करायचे असेल, असे वाटत नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा