शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नद्यांमधील घातक ‘पांढरा फेस’ कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 13:51 IST

डिटर्जंटमधून नदीत जाणारे सांडपाण्यातील ५० टक्के घातक रसायन होईल कमी

ठळक मुद्देप्रदूषण मंडळाचा निर्णय : पर्यावरण अभ्यासकांनी मंडळाकडे केला होता पाठपुरावा

पुणे : घराघरांत कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डिटर्जंट्समधील घातक फॉस्फेटची कमाल मर्यादा निश्चित करण्याच्या रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या मागणीला मान्यता दिली असून, केंद्रीय प्रदूषण मंडळाने त्याबाबतचे पत्र याबाबतचा पाठपुरावा करणारे कार्यकर्ते गणेश बोरा यांना दिले आहे. त्यात म्हटले आहे, की फॉस्फेटचे प्रमाण ५० टक्केकमी करण्यात येईल, त्यामुळे डिटर्जंटमधून नदीत जाणारे सांडपाण्यातील ५० टक्के घातक रसायन कमी होईल. परिणामी प्रदूषणही कमी होणार आहे. डिटर्जंट्समधील फॉस्फेटचे प्रमाण कमी करावे, यासाठी वाल्हेकरवाडीतील पर्यावरण अभ्यासकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा केला होता. अखेर दीड-दोन वर्षांनंतर त्यांना यश आले आहे. मंडळाने आता हे प्रमाण कमी करण्यासाठी पावले उचलल्याचे पत्र पाठविले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मागील ८२५ दिवसांपासून पवना नदी स्वच्छता करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या गणेश बोरा, प्रदीप वाल्हेकर आणि सोमनाथ हरपुडे यांनी त्यांच्या टीमबरोबर जलप्रदूषणाच्या कारणांचा अभ्यास केला. ते करीत असताना त्यांच्या निदर्शनास आढळले, की दररोजच्या जीवनात वापरात येणाऱ्या साबण, डिटर्जंट्समध्ये असणाऱ्या घातक फॉस्फेटमुळे पाण्याचे प्रदूषण वाढत आहे. डिटर्जंट्समध्ये उच्च फॉस्फरस/फॉस्फेट वापरणे हे यामागचे मूळ कारण आहे. खरे तर भारतामध्ये ग्राहक व्यवहार मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय मानक ब्यूरोने (बीआयएस) १९६८ मध्ये केलेल्या मापदंडामध्ये डिटर्जंटमधील फॉस्फेटच्या कमाल वापराबाबत कोणताही मापदंड अस्तित्वात नाही. गेल्या २ वर्षांपासून रोटेरियन गणेश बोरा यांनी त्यांच्या रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या माध्यमातून जलशक्ती मंत्रालय, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन मंत्रालय, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय आणि भारतीय मानक ब्युरोकडे (बीआयएस) संपर्क साधला. बीआयएस मानदंडांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही संपर्क साधला. त्यानंतर गणेश बोरा यांना केंद्रीय प्रदूषण मंडळाने अंमलबजावणीचे पत्र पाठविले आहे. ........वेगवेगळ्या पाठपुराव्यानंतर बीआयएसने या प्रलंबित दुरुस्तीसाठी मंजुरी दिली. आता नवीन मानकांनुसार डिटर्जंटमध्ये फॉस्फेटची पातळी २.५ ते ५ टक्के कमाल असावी, असे ठरवण्यात आले आहे. घरगुती, लॉँड्री आणि इंडस्ट्रीजमध्ये वापरण्यात येणाऱ्या डिटर्जंटमधील फॉस्फेटची पातळी कमी करण्यात येणार आहे, असे पत्र मिळाल्याचे गणेश बोरा यांनी ‘लोकमत’ला सांगितले 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरण