शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
3
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
4
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
5
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
6
’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
7
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
8
रिलेशिनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले गौरव कपूर-कृतिका कामरा, व्हिडीओ व्हायरल
9
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
10
Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता
11
"माझ्या एका सिगारेटने दिल्लीच्या प्रदूषणात फरक पडणार नाही"; TMC खासदाराचं भाजपाला प्रत्युत्तर
12
Rahul Gandhi: "लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे" लोकसभेत राहुल गांधींचं महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य!
13
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
14
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
15
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
16
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
18
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
19
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
20
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
Daily Top 2Weekly Top 5

जिथे पिण्याच्या पाण्यासाठी कोसो दूर पायपीट व्हायची; आता तिथे विहिरी फुल्लं भरून वाहू लागल्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 12:04 IST

गुजरात, नाशिक, मुंबई, पुणे येथून नागरिक आले आणि त्यांनी येथे काम केले. परिणामी यंदा येथील पाणी साठा चांगला वाढला..

ठळक मुद्देउदाचीवाडी झाले पाणीदार; एप्रिल-मे मध्ये जाणवायची टंचाई

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून एप्रिल-मे महिन्यात उदाचीवाडीमध्ये ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हाल व्हायचे. परंतु, गेल्या दोन वर्षांमध्ये लोकसहभागातून येथे पाणी जिरविण्यासाठी डोंगर माथ्यावर आणि पायथ्यावर खड्डे तयार करण्यात आले. त्यामुळे आता येथील विहिरी भरून वाहू लागल्या आहेत. तसेच गतवर्षीच्या पावसाने एप्रिल-मे मध्ये पाणी कमी पडले नाही. हे पाणी जिरविण्याचे झालेले काम पुढच्या पिढीसाठी एक मोठा ठेवा असेल, अशाच भावना येथील ग्रामस्थांच्या आहेत. उदाचीवाडी येथे पाणी जिरविण्यासाठी पाणी फांउडेशनतर्फे खड्डे खोदण्याचा उपक्रम घेतला. गेली दोन वर्षांपासून तो सुरू आहे. गुजरात, नाशिक, मुंबई, पुणे येथून नागरिक आले आणि त्यांनी येथे काम केले. परिणामी यंदा येथील पाणी साठा चांगला वाढला असून, संपूर्ण वाडी पाणीदार बनली आहे. येथील कामाविषयी स्थानिक तरूण नामदेव कुंभारकर म्हणाले,‘‘आमच्या परिसरात २०१८ पासून खड्डे घेण्याचे काम सुरू झाले. गतवर्षी चांगला पाऊस झाला आणि खड्ड्यांमध्ये पाणी जिरले आणि साठले. मी लहान असताना म्हणजे १९९८ साली विहिरीमध्ये एवढं पाणी असायचे की, त्यात पोहता यायचे. पण गेल्या काही वर्षात तो आनंद घेता आला नाही. यंदा प्रथमच आम्हाला विहिरीत पोहता आले. कारण विहिरी भरून वाहू लागल्या आहेत. हे काम आता पुढील पिढीसाठी कायमस्वरूपी राहणार आहे.’’

===================पाणी पाहून कामाचे समाधानस्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या पुण्यातील प्रा. अनुष्का कजबजे म्हणाल्या,‘‘उन्हाळ्यात सुटीच्या दिवशी कुटुंबासह आणि मित्राबरोबर तिथे जाऊन खड्डे खणायचो. त्याचे ‘चिज’ आता झाल्याचे समाधान मिळत आहे. कारण इथे आता सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. असाच उपक्रम प्रत्येक गावात झाला तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पाणीदार होईल.’’==========================प्रत्येक गावात असे काम व्हावेगावात एकूण १७६ घरे असून, प्रत्येक घराने सांडपाण्यासाठी शोष खड्डे केले आहेत. त्यामुळे त्यातच सांडपाणी जाते. इतरत्र कुठेही वाहताना दिसत नाही. परिणामी स्वच्छता आपोआप राहते. असाच उपक्रम प्रत्येक गावी व्हायला हवा. तसेच ऊस हे पीक न लावता सीतापळ, अंजीर आणि ज्वारी, बाजरी, वटाणा, कांदा, कोबी असे पीक घेत आहोत.- नामदेव कुंभारकर, तरूण, उदाचीवाडी

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीdroughtदुष्काळ