शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पिकविणारा कर्जबाजारी होऊन संकटात सापडल्यावर खाणाऱ्यांचे काय होणार; शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 19:06 IST

केंद्रात सत्ता असणाऱ्यांकडे शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी अधिक असते, मात्र अलीकडे याबाबत दृष्टीकोन बदलल्याचे चित्र

बारामती : शेती संदर्भात अनेक प्रश्न आहेत. ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी अधिक आहे. मात्र, अलीकडे याबाबत  दृष्टीकोन बदलल्याचे चित्र आहे. कधीकधी दिल्लीत चर्चा करण्याची संधी मिळते. यावेळी खासगीत झालेल्या बोलण्यात त्यांना पिकविणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांचे महत्व अधिक असल्याचे जाणवते. मात्र, पिकविणारा कर्जबाजारी झाल्यावर, संकटात सापडल्यावर खाणाऱ्यांना अवलंबुन रहावे लागेल, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार वर केली.

बारामती येथे जागतिक स्तरावरील आयोजित कृषि प्रदर्शन उदघाटन कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी त्यांनी कांदा आणि मळी निर्यातबंदीकडे लक्ष वेधले. पवार पुढे म्हणाले, साखर कारखान्यात आपण साखरेबरोबरच मळी, इथेनाॅल,अल्कोहाल उत्पादन करतो. कारखाना परिसरात मळी मोलॅसिसचे टॅंक असतात. मळीला निर्यातीनंतरच किंमत मिळते. त्यामुळे ती निर्यात का करु नये, असा सवाल पवार यांनी केला. केंद्राने मळी निर्यात करायची,असे सांगितले आहे. 

शेतकऱ्याला त्याच्या घामाच्या मिळणाऱ्या किंमतीला विरोध होत असेल. तर तो शेतकऱ्याचा हितकर्ता नाही, असे चित्र सध्या देशात दिसुन येते. शेतीमालाशी संबंधित थोडी किंमत वाढली की, सरकार लगेच भावनावश होते. त्या किंमतीला रोखण्याचा प्रयत्न होतो. शेतकऱ्याचा विचार केला जात नाही. शेतीवरील वाढलेला बोजा कमी केला जात नाही. तो कमी करण्याची गरज आहे. देश स्वतंत्र झाल्यावर ३५ कोटी लोकसंख्या असताना ८० टक्के लोकसंख्या शेतीव्यवसायात होती. आजच्या लोकसंख्येच्या तुलनेत ५६ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबुन आहे. मात्र, शेतजमिनीत मोठी घट झाल्याचे पवार यांनी नमुद केले.

....कांद्याच्या माळा घाला,अन्यथा कवड्यच्या माळा घाला

केंद्रात मंत्री असताना एकदा विरोधी पक्षाचे भाजपचे लोक गळ्यात कांद्याच्या माळा घालून पार्लमेंटमध्ये आले. त्यांनी कांद्याच्या वाढलेल्या किंमतीला कृषिमंत्री जबाबदार असल्याचे सांगत माझ्या राजीनाम्याची मागणी केली. यावर मला अध्यक्षांनी खुलासा करण्यास सांगितला. कांदाउत्पादक शेतकरी देशातील जिरायती  असल्याचे सांगत कांदा निर्यात बंदी मागे घेणार नाही. गळ्यात कांद्याच्या माळा घाला, अन्यथा केवड्याच्या माळा घाला, शेतकऱ्याला त्याच्या मालाची किंमत मिळालीच पाहिजे. त्यासाठी काहीही सहन करायची माझी तयारी असल्याचे विरोधकांना  सांगितले. त्यावर विरोधक गप्प बसल्याची आठवण पवार यांनी सांगितली.

...दहातोंडी रावणाप्रमाणे शेतीप्रश्न

शेतीसंदर्भात एकदा यशवंतराव चव्हाण यांना ‘देशाचे शेती प्रश्न काय आणि किती? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चव्हाण यांनी दहातोंडी रावणाप्रमाणे शेतीप्रश्न असल्याचे उत्तर दिल्याची आठवण पवार यांनी सांगितली. शेतकऱ्यांसमोर जमिनीचा पोत, पाणी, खताचा, बियाणाचा, शेतीमालाच्या भावाचा असे अनेक प्रश्न आहेत. त्याची सोडवणुक करणे, ही शेतकऱ्यांना मदत आहे. यामध्ये केंंद्र सरकारची जबाबदारी अधिक असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांंनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा