शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पिकविणारा कर्जबाजारी होऊन संकटात सापडल्यावर खाणाऱ्यांचे काय होणार; शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 19:06 IST

केंद्रात सत्ता असणाऱ्यांकडे शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी अधिक असते, मात्र अलीकडे याबाबत दृष्टीकोन बदलल्याचे चित्र

बारामती : शेती संदर्भात अनेक प्रश्न आहेत. ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी अधिक आहे. मात्र, अलीकडे याबाबत  दृष्टीकोन बदलल्याचे चित्र आहे. कधीकधी दिल्लीत चर्चा करण्याची संधी मिळते. यावेळी खासगीत झालेल्या बोलण्यात त्यांना पिकविणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांचे महत्व अधिक असल्याचे जाणवते. मात्र, पिकविणारा कर्जबाजारी झाल्यावर, संकटात सापडल्यावर खाणाऱ्यांना अवलंबुन रहावे लागेल, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार वर केली.

बारामती येथे जागतिक स्तरावरील आयोजित कृषि प्रदर्शन उदघाटन कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी त्यांनी कांदा आणि मळी निर्यातबंदीकडे लक्ष वेधले. पवार पुढे म्हणाले, साखर कारखान्यात आपण साखरेबरोबरच मळी, इथेनाॅल,अल्कोहाल उत्पादन करतो. कारखाना परिसरात मळी मोलॅसिसचे टॅंक असतात. मळीला निर्यातीनंतरच किंमत मिळते. त्यामुळे ती निर्यात का करु नये, असा सवाल पवार यांनी केला. केंद्राने मळी निर्यात करायची,असे सांगितले आहे. 

शेतकऱ्याला त्याच्या घामाच्या मिळणाऱ्या किंमतीला विरोध होत असेल. तर तो शेतकऱ्याचा हितकर्ता नाही, असे चित्र सध्या देशात दिसुन येते. शेतीमालाशी संबंधित थोडी किंमत वाढली की, सरकार लगेच भावनावश होते. त्या किंमतीला रोखण्याचा प्रयत्न होतो. शेतकऱ्याचा विचार केला जात नाही. शेतीवरील वाढलेला बोजा कमी केला जात नाही. तो कमी करण्याची गरज आहे. देश स्वतंत्र झाल्यावर ३५ कोटी लोकसंख्या असताना ८० टक्के लोकसंख्या शेतीव्यवसायात होती. आजच्या लोकसंख्येच्या तुलनेत ५६ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबुन आहे. मात्र, शेतजमिनीत मोठी घट झाल्याचे पवार यांनी नमुद केले.

....कांद्याच्या माळा घाला,अन्यथा कवड्यच्या माळा घाला

केंद्रात मंत्री असताना एकदा विरोधी पक्षाचे भाजपचे लोक गळ्यात कांद्याच्या माळा घालून पार्लमेंटमध्ये आले. त्यांनी कांद्याच्या वाढलेल्या किंमतीला कृषिमंत्री जबाबदार असल्याचे सांगत माझ्या राजीनाम्याची मागणी केली. यावर मला अध्यक्षांनी खुलासा करण्यास सांगितला. कांदाउत्पादक शेतकरी देशातील जिरायती  असल्याचे सांगत कांदा निर्यात बंदी मागे घेणार नाही. गळ्यात कांद्याच्या माळा घाला, अन्यथा केवड्याच्या माळा घाला, शेतकऱ्याला त्याच्या मालाची किंमत मिळालीच पाहिजे. त्यासाठी काहीही सहन करायची माझी तयारी असल्याचे विरोधकांना  सांगितले. त्यावर विरोधक गप्प बसल्याची आठवण पवार यांनी सांगितली.

...दहातोंडी रावणाप्रमाणे शेतीप्रश्न

शेतीसंदर्भात एकदा यशवंतराव चव्हाण यांना ‘देशाचे शेती प्रश्न काय आणि किती? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चव्हाण यांनी दहातोंडी रावणाप्रमाणे शेतीप्रश्न असल्याचे उत्तर दिल्याची आठवण पवार यांनी सांगितली. शेतकऱ्यांसमोर जमिनीचा पोत, पाणी, खताचा, बियाणाचा, शेतीमालाच्या भावाचा असे अनेक प्रश्न आहेत. त्याची सोडवणुक करणे, ही शेतकऱ्यांना मदत आहे. यामध्ये केंंद्र सरकारची जबाबदारी अधिक असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांंनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा