शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

जो कारखाना चालवू शकत नाही तो विकास काय करणार? अजित पवार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 13:17 IST

विचार करा जो कारखाना चालवू शकत नाही तो जुन्नरकरांचा काय विकास करणार? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

ओतूर : उमेदवार अनेक उभे राहतात तो त्यांचा अधिकार आहे. पण दहा वर्षांत तुम्ही इतरांच्या तुलनेत उसाला कमी भाव दिला. माळेगाव व सोमेश्वर साखर कारखान्यांचे भाव पाहिले तर ३६०० आहे. आणि तुम्हाला विघ्नहर सहकारी साखर कारखाना ३२०० देतो तोही बळं-बळं. याचा विचार करा जो कारखाना चालवू शकत नाही तो जुन्नरकरांचा काय विकास करणार? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. यावेळी जुन्नरचे आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्यावर अजित पवार यांनी टीका केली.  दरम्यान, अतुल हा जुन्नरच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी राहिला आहे. त्याने कधीही जातिपातीचे राजकारण केले नाही. एक कार्यकुशल, कर्तव्यदक्ष, सुसंस्कृत, संवेदनशील, अभ्यासू नेतृत्व म्हणून मी त्याच्याकडे पाहत आहे, असेही ते म्हणाले. महायुतीचे उमेदवार आमदार अतुल बेनके यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.  अजित पवार पुढे बोलतांना म्हणाले,'विरोधक टीका करतात की, राज्याची तिजोरी रिकामी केली. आम्ही भेदभाव करत नाही. आम्ही सर्वांना पुढे घेऊन चाललो आहे. त्यासाठी लाडकी बहीण योजना, मुलींच्या शिक्षणासाठी ५०% सवलत, शेतकऱ्यांसाठी वीजबिले माफ केली आहेत यासह अनेक योजना भविष्यात आपण सुरू करणार आहे. जुन्नर तालुक्यातील बिबट प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांसाठी दिवसा लाइट देणार आहोत. सत्तेत असल्यावर विकासकामे करता येतात. आम्ही सत्तेसाठी हपापलो नाही; पण ज्यांनी आम्हाला निवडून दिले त्यांना न्याय देण्यासाठी नवीन कामांना मंजुरी देण्यासाठी; तसेच काही कामांचा ‘स्टे’ उठवण्यासाठी आम्ही सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. मधल्या काळात कांदा प्रश्नामुळे आम्हाला लोकसभेला चांगलाच फटका बसला; पण त्या चुका सुधारण्यासाठी कांदा निर्यातबंदी उठवली. आज माझा कांदा उत्पादक शेतकरी खूश आहे. आदिवासी भागाचा प्रमुख हिरडा कारखान्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. मंजुरीपत्र देखील लवकरच देणार असल्याचे त्यांनी सांगितले.अतुल बेनके म्हणाले, गेली पाच वर्षे तालुक्यात प्रामाणिक सेवा करत आहे. तरुण पिढीला अधिकारी बनवण्यासाठी ‘एमपीएससी’, ‘यूपीएससी’ यांची लायब्ररी आणि प्रशिक्षण केंद्र, शिवनेरी किल्ला संवर्धन, आदिवासी विभागात कुकडेश्वर मंदिरासाठी, तसेच हिरडा कारखाना यासाठी अजित पवारांनी मोठा निधी मिळाला. मुस्लीम बांधवांना मोठा निधी मिळाला, पिंपळगावच्या राम मंदिरासाठी, आरोग्याच्या दृष्टिकोनातून नारायणगाव, ओतूर ग्रामीण रुग्णालय अशी अनेक कामे केली. कुकडी प्रकल्पातील पाणी देण्याचे आपण काम केले. त्यामुळे जुन्नरकरांनी मला ‘पाणीदार आमदार’ पदवी दिली आहे.‘जुन्नरच्या पाण्याला हात लावू देणार नाही’जुन्नर-आंबेगाव तालुक्यांच्या धरणांमधील पाण्याचे योगदान मोठे आहे. लोकांच्या जमिनी गेल्या आहेत. पाण्याचा अधिकार आपला आहे. आपल्याला फेरनियोजनाचे पाणी आणे पठार, कोपरे मांडवे येथे न्यायचे आहे. वल्लभशेठचा मुलगा जिवंत असेपर्यंत आपल्या पाण्याला कोण हात लावू शकणार नाही. कर्जत-जामखेडचे युवराज म्हणत असतील पाणी पळवू. महाराजांच्या जन्मभूमीतील आम्ही मावळे आहोत. आमच्या हक्काच्या पाण्यासाठी परकीय असो स्वकीय असो, कोणी जरी आमच्यासमोर उभा राहिला तरी आम्ही जुन्नरच्या पाण्याला हात लावून देणार नाही. माझी स्पर्धा कुणाबरोबर नाही. मी प्रामाणिक काम करत आलो आहे आणि प्रामाणिक काम करत राहणार असल्याचेही आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार