शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

चिंतामणीने आता करावे तरी काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रिक्षा उचलून नेल्याची तक्रार केली म्हणून फायनान्स कंपन्यांनी आता रिक्षाचालकांना त्रास देण्यास सुरुवात केली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रिक्षा उचलून नेल्याची तक्रार केली म्हणून फायनान्स कंपन्यांनी आता रिक्षाचालकांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. तक्रार मिटली असे लिहून द्यावे म्हणून कंपन्या मागे लागल्या असून पुन्हा रिक्षा उचलून नेण्याची धमकी दिली जात आहे.

कसबा पेठेत राहणाऱ्या चिंतामणी यांनी फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून रिक्षा घेतली, चांगला व्यवसाय सुरू होता, तर टाळेबंदी लागली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशाने हप्ता गेला नाही तरी कंपनी काही महिने थांबली, नंतर मात्र घरी येऊन रिक्षा उचलून नेली. त्याविरोधात चिंतामणी यांनी आरबीआयकडे एका रिक्षा संघटनेच्या माध्यमातून तक्रार केली. आरबीआयने दखल घेत संबंधित कंपनीविरोधात कारवाई सुरू केली.

दरम्यानच्या काळात चिंतामणीच्या दोन्ही मुलींनी त्या काम करत होत्या तिथून तीन महिन्यांचा पगार आगाऊ घेतला व काही हप्ते जमा केले.

कंपनीने रिक्षा सोडली, मात्र चिंतामणी यांच्यावर तक्रार मागे घेण्याबाबत दबाव आणण्यास सुरुवात केली. चिंतामणीचा व्यवसाय सुरू होता, त्यामुळे त्यांनी लक्ष दिले नाही, पण व्यवसाय कमी झाला, त्यामुळे पुन्हा त्यांचे हप्ते थकले व कंपनीने आता त्यांच्यावर रोज दबाव आणण्यास सुरूवात केली आहे. हप्ते थकले म्हणून नोटीस पाठवून रिक्षा पुन्हा उचलून नेण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.---//

असे एक नाही अनेक चिंतामणी आहेत. आम्ही फायनान्स कंपनीच्या विरोधात रीतसर तक्रार केली. हप्ते थकले म्हणून वाहन उचलून नेण्याआधी कंपनीने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत.

- आप रिक्षा संघटना