शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

चिंतामणीने आता करावे तरी काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रिक्षा उचलून नेल्याची तक्रार केली म्हणून फायनान्स कंपन्यांनी आता रिक्षाचालकांना त्रास देण्यास सुरुवात केली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रिक्षा उचलून नेल्याची तक्रार केली म्हणून फायनान्स कंपन्यांनी आता रिक्षाचालकांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. तक्रार मिटली असे लिहून द्यावे म्हणून कंपन्या मागे लागल्या असून पुन्हा रिक्षा उचलून नेण्याची धमकी दिली जात आहे.

कसबा पेठेत राहणाऱ्या चिंतामणी यांनी फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून रिक्षा घेतली, चांगला व्यवसाय सुरू होता, तर टाळेबंदी लागली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशाने हप्ता गेला नाही तरी कंपनी काही महिने थांबली, नंतर मात्र घरी येऊन रिक्षा उचलून नेली. त्याविरोधात चिंतामणी यांनी आरबीआयकडे एका रिक्षा संघटनेच्या माध्यमातून तक्रार केली. आरबीआयने दखल घेत संबंधित कंपनीविरोधात कारवाई सुरू केली.

दरम्यानच्या काळात चिंतामणीच्या दोन्ही मुलींनी त्या काम करत होत्या तिथून तीन महिन्यांचा पगार आगाऊ घेतला व काही हप्ते जमा केले.

कंपनीने रिक्षा सोडली, मात्र चिंतामणी यांच्यावर तक्रार मागे घेण्याबाबत दबाव आणण्यास सुरुवात केली. चिंतामणीचा व्यवसाय सुरू होता, त्यामुळे त्यांनी लक्ष दिले नाही, पण व्यवसाय कमी झाला, त्यामुळे पुन्हा त्यांचे हप्ते थकले व कंपनीने आता त्यांच्यावर रोज दबाव आणण्यास सुरूवात केली आहे. हप्ते थकले म्हणून नोटीस पाठवून रिक्षा पुन्हा उचलून नेण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.---//

असे एक नाही अनेक चिंतामणी आहेत. आम्ही फायनान्स कंपनीच्या विरोधात रीतसर तक्रार केली. हप्ते थकले म्हणून वाहन उचलून नेण्याआधी कंपनीने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत.

- आप रिक्षा संघटना