शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

पूजा चव्हाण प्रकरणात उद्धव ठाकरेंची नेमकी मजबुरी काय ? विनायक मेटेंचा संतप्त सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 15:59 IST

सगळ्या जगाला माहिती आहे, कोण बोलतोय, कोणत्या भाषेत बोलतोय, याचा अर्थ सरकारला नीतिमत्ता राहिलेली नाही. 

पुणे : शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांचे पूजा चव्हाण प्रकरणात नाव चर्चेत आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यात ते जवळपास १५ दिवस समोर न आल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते. यावरून भाजपने राज्य सरकार व शिवसेनेवर टीकेची झोड उठवली होती. आता शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी देखील पूजा चव्हाण प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

पुण्यात विनायक मेटे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. मेटे म्हणाले, बाळासाहेब ठाकरेचे विचार उद्धव यांनी बाजूला ठेवले आहे.बाळासाहेब ठाकरेंनी आरोप झालेल्या मंत्र्यांना तासभरही पदावर ठेवले नसते. उद्धव ठाकरेंना नेमकी कोणती मजबुरी आहे? सगळ्या जगाला माहिती आहे, कोण बोलतोय, कोणत्या भाषेत बोलतोय, याचा अर्थ सरकारला नीतिमत्ता राहिलेली नाही. 

पूजाची हत्या की आत्महत्या हे चौकशीत समोर येईल. पण पोलीस ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहेत. त्यांच्या चौकशीवर माझा विश्वास नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुखांनी स्वतःहून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी द्यावे असेही मेटे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच धनंजय मुंडे त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर स्वतःहून पुढे आले. ते १५ दिवस लपून बसले नाही. 

मराठा आरक्षणाचा निकाल येईपर्यंत शासकीय भरती आणि एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलाव्यात. केवळ दीड महिने म्हणजे १ एप्रिलपर्यंत पुढे घ्याव्यात. राजेश टोपे यांच्या विभागाची भरती उद्या होत आहे.मात्र आरोग्य विभागाची परीक्षा टोपे यांनी पुढे ढकलावी.

आघाडी सरकारला मराठा मुलामुलींचे आयुष्य उध्वस्त झाले तरी देणं घेणं नाही, अशोक चव्हाणांना तर त्याहून नाही. मराठा मुलामुलींचे वैरी मराठा मंत्री झाले आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही, भरती पुढे घ्या. - विनायक मेटे, आमदार 

टॅग्स :PuneपुणेVinayak Meteविनायक मेटेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rathodसंजय राठोडPooja Chavanपूजा चव्हाण