Vidhan Sabha 2019 : गनिमी काव्याने कोंडला पुण्यातील ‘आव्वाज’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 11:57 IST2019-10-02T07:00:00+5:302019-10-02T11:57:25+5:30
कसब्यातील बंडखोरी कायम : शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह

Vidhan Sabha 2019 : गनिमी काव्याने कोंडला पुण्यातील ‘आव्वाज’
पुणे : सातत्याने मागणी करूनही, दबाव टाकूनही भारतीय जनता पार्टीने पुण्यात शिवसेनेला ठेंगाच दाखवला आहे. त्यावरून शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपाबद्दल तर राग आहेच, पण त्यापैकी काहींची भावना तर ‘कुºहाडीचा दांडाच गोतास काळ ठरला’ अशी आहे. खुद्द नेतृत्वच पुण्याला काही मिळावे यासाठी आग्रही नसल्याने यापुढे पुण्यात शिवसेनेचे काम करायचे म्हणजे करायचे तरी काय असा प्रश्न शिवसेनेचे कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.
कोथरूड, शिवसेना, पूर्वीचा हडपसर व आताचा कॅन्टोन्मेट हे शिवसेनेचे एकेकाळचे किल्ले होते. कोथरूड हा त्यातला बालेकिल्ला. शशिकांत सुतार यांनी निगुतीने बांधलेला. आता किल्ले तर भाजपाच्या ताब्यात गेलेच आहेत व कोथरूडवर तर भाजपाने कब्जाच केला आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढून पुण्यात शिवसेनेचे झाले तेवढे नुकसान कुठेच झालेले नाही. आठपैकी एकही मतदारसंघ त्यांच्याकडे राहिला नाही. तरीही पर्वती, कॅन्टोन्मेट, शिवाजीनगर इथे दुसºया क्रमाकांवर होते. यावेळीही युती होणार नाही असे पाच वर्षातील सरकारमधील वाटचालीवरून लक्षात घेऊन अनेकांनी तयारी केली होती.
लोकसभेला युती झाली व त्यांचा मनोरे ढासळण्यास सुरूवात झाली. तरीही युतीमध्ये शिवसेनेचे हक्काचे किमान दोन मतदारसंघ तरी वाट्याला येतील अशी शिवसैनिकांची अपेक्षा होती. त्यासाठीच स्थानिक पदाधिकाºयांकडून पक्ष नेतृत्वाला साकडे घालण्याबरोबरच भाजपाच्या स्थानिक नेत्यांचाही मनधरणी सुरू होती, मात्र त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. आठपैकी एकही मतदारसंघ भाजपाने शिवसेनेला सोडलेला नाही. त्यामुळे आता शिवसैनिक म्हणवून घ्यायचे व भाजपाच्या प्रचाराला लागायचे अशीच वेळ पुण्यातील शिवसैनिकांवर आली आहे.
विधानसभेत कोणी नसेल तर त्याचा परिणाम महापालिकेवरही होतो. मागील विधानसभेत पराभव झाल्यानंतर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ १० तर भाजपाचे स्पष्ट बहुमतासह ९८ इतके आहे. तिथेही शिवसेनेची कायम मानहानी केली जाते. युती होऊनही त्यांना सत्तेत सामावून घेण्यात आलेले नाही. पक्ष नेतृत्वाला याची कल्पना दिली होती, मात्र त्यांनी ‘विधानसभा विसरा, आता महापालिकेच्या तयारीला लागा’ असा सल्ला दिला असल्याची माहिती शिवसेनेतील सुत्रांनी दिली. पक्षाच्या नेत्यांनाच पुण्यासारख्या महत्वाच्या शहराची पर्वा नसेल तर आम्ही तरी काय करणार असा हताश सूर शिवसेनेचे कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.
असे होणार हे माहिती होते
भाजपाकडून हेच होणार हे माहिती होते. त्यामुळेच स्वत:च विधानसभेची उमेदवारी जाहीर केली व प्रचारही सुरू केला आहे. सुरूवातीपासून शिवसेनेत आहे व अखेरपर्यंत शिवसेनेतच राहणार आहे. पक्षाला पुण्यात राजकीय अस्तित्व नाही ही बाब सहन न झाल्यामुळेच हे पाऊल उचलले आहे. कारवाईबाबत अजूनतरी काहीही कळवण्यात आलेले नाही, मात्र पुण्यातील सगळे शिवसैनिक कसबा विधानसभा मतदारसंघात एकवटून विजय मिळवून देतील याची खात्री आहे.
- विशाल धनवडे, नगरसेवक