शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"पुणे - नाशिक रेल्वे मार्गासाठी आम्ही कवडीमोलात जमिनी देणार नाही", शेतकऱ्यांचा रेल्वे अधिकाऱ्यांना दम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 17:37 IST

जमिनी देण्यास शेतकरी तयार मात्र तुम्ही जमिनीला काय भाव देणार? असाही प्रश्न

ठळक मुद्देशेतकऱ्यांची समस्या, मागणी व भावना वरिष्ठापर्यत पोहचून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले

राजगुरुनगर: पुणे -नाशिक रेल्वेसाठीशेतकरी जमिनी देण्यास तयार आहे. मात्र कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून देणार नाही. जमिनीला काय भाव देणार असे विचारल्यावर अधिकारी उत्तर देत नाहीत. पोलिस बळाचा वापर करू नका, शेतकऱ्यांचा नाद करु नका. आमच्या मागण्या मान्य करा, तरच मोजणी करा असा सज्जड दम शेतकऱ्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिला.

होलेवाडी मांजरेवाडी या परिसरातुन देशातील पहिली पुणे -नाशिक हाय स्पीड रेल्वे जाणार आहे. यासाठी भुसंपादनाचे काम सुरू झाले आहे. रेल्वे अधिकारी व खेड महसुल विभाग शेतकऱ्यांच्या तालुक्यातील रेल्वे बाधित शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन शेतकऱ्यांना रेल्वे भुसंपादनाची प्रक्रीया समाजावून सांगत होते. शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वे प्रकल्पासाठी घेणार आहे. मात्र जमिनीला काय भाव देणार, रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजुला रेड झोन असल्यामुळे शेतकरी भुमीहिन होणार आहे. त्यांचा योग्य तो मोबदला काय देणार असे प्रश्न रेल्वे अधिकाऱ्यांना बैठकीदरम्यान विचारत होते. मात्र शेतकऱ्यांना यांचे उत्तर रेल्वे अधिकाऱ्याकडून मिळाले नाही.  

रेल्वे मार्ग २५ मीटरचा होणार आहे. तसेच रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजुने ३० मीटर अंतरादरम्यान रेडझोन पडणार आहे. रेड झोनमध्ये यापुढे शेतकऱ्याला कुठलाही उदयोग धंदा, घर बांधता येणार नाही. त्या जमिनीची किंमत शुन्य होणार आहे. त्याबदल्यात मिळणारा मोबदला तुंटपुजा आहे. त्यामुळे रेडझोनसाठी लागणारी जमीन रेल्वेने घ्यावी. व गेल्या तीन चार वर्षातील खरेदी विक्रीचे व्यवहार व खुल्या बाजारातील व्यवहार त्यांच्या पाच पट शेतजमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा हि मागणी मान्य करून रेल्वे मार्गात येणाऱ्या विहिरी, फळझाडे, पाईपलाईन यांचाही योग्य मोबदला द्यावा. तो किती देणार हे अगोदर सांगून मग मोजणी करा. पोलिस बळाचा वापर करून शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नका.या परिसरातील सेझ प्रकल्प, राजगुरूनगर शहराबाहेरील पुणे -नाशिक बाह्यवळण यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन करून प्रशासनाला वठणीवर आणले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा नाद करू नका असा सज्जड दम शेतकऱ्यांनी रेल्वे आधिकाऱ्यांना दिला.

शेतकऱ्यांवर अन्याय केला जाणार नाही  

शेतकऱ्यांची समस्या, मागणी व भावना वरिष्ठापर्यत पोहचून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, तोपर्यत या परिसराची मोजणी केली जाणार नाही.असे यावेळी पुणे महारेल्वेचे जनरल मॅनेजर अधिकारी सुनील हवालदार यांनी शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ होले, अनुप टाकळकर, सुशिल मांजरे आणि  शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडrailwayरेल्वेGovernmentसरकारFarmerशेतकरी