शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

माती संवर्धनासाठी जागतिक धोरण हवे; सद्गुरू यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 05:41 IST

‘मातीच्या संवर्धनासाठी सध्या जागतिक स्तरावर धोरणाची गरज आहे. राज्याच्या व देशांच्या सीमांवरील वाद ही केवळ एक मानवी समस्या आहे. आपण सोयीसाठी एक रेषा आखतो आणि तीच योग्य आहे, असे समजतो.

पुणे :

‘मातीच्या संवर्धनासाठी सध्या जागतिक स्तरावर धोरणाची गरज आहे. राज्याच्या व देशांच्या सीमांवरील वाद ही केवळ एक मानवी समस्या आहे. आपण सोयीसाठी एक रेषा आखतो आणि तीच योग्य आहे, असे समजतो. पृथ्वी एक केक आहे आणि त्या केकचा एक तुकडा घेऊन आपली जबाबदारी संपली, असे समजत असाल तर ते योग्य नाही. सूक्ष्मजीवांचे जीवन ही एक जागतिक प्रक्रिया आहे. त्यामुळे माती वाचवा (सेव्ह सॉईल) ही चळवळ सध्याचे धोरण बदलण्याचा एक जागतिक प्रयत्न आहे,’ असे प्रतिपादन सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी केले. 

जगातील २६ देशांचा दौरा करून आलेल्या सद्गुरूंनी माती संवर्धनाचा जागर करण्यासाठी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर पुणेकरांशी संवाद साधला. यावेळी ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, ग्राविटास फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, गोयल गंगा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गोयल, सूर्यदत्ता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, टॉपवर्थ ग्रुपचे अध्यक्ष अभय लोढा, यूपीएल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय श्रॉफ उपस्थित होते.

सद्गुरू म्हणाले, ‘माती आपल्या भौतिक अस्तित्वाचा स्त्रोत आहे. मातीत अब्जावधी सूक्ष्मजीव असतात. त्यांचे जीवन एक जटील प्रक्रिया आहे. ती वाढत गेल्यानंतर एक जीवन तयार होते. त्यामुळे मानवाच्या जीवनाचे मूळही त्यातच आहे. अब्जावधी वर्षांपूर्वी कवक, अल्गी यांनी सूर्यप्रकाशापासून अन्न कसे तयार होते, ते शोधून काढले. त्यालाच आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो. त्यावेळी वातावरणात केवळ एक टक्का ऑक्सिजन होता. आता तो २१ टक्के आहे. हे केवळ प्रकाश संश्लेषणामुळे झाले. मात्र, गेल्या हजार वर्षांत पृथ्वीवरील ८५ टक्के प्रकाश संश्लेषण नष्ट झाले आहे.’ माती ही आपली माता; पण आपण मातीला साधन (रिसोर्स) मानायला लागलो आहोत, अशी खंत व्यक्त करत ते म्हणाले, अनेक देशांनी मातीला एक निष्क्रिय वस्तू गृहित धरले आहे. आपल्या देशातही हीच परिस्थिती आहे. 

जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज- सध्या देशात व जगभर असहिष्णूता व द्वेषाचे वातावरण आहे. त्यावर तुम्ही काय उपाय सुचवाल, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘देशांमधील तसेच समाजातील तणावाबाबत बोलायचे झाल्यास सध्याचे वातावरण गेल्या हजार वर्षांपेक्षा चांगले आहे. इतिहास तपासा. - तेव्हाच्या तुलनेत आपण आता शांततेत व सौहार्दाने जगत आहोत. सध्याचा तणाव फक्त टीव्हीच्या स्टुडिओमध्ये दिसतो. तुम्ही जर पुण्याच्या रस्त्यांवरून फिरलात तर तुम्हाला हा तणाव दिसणार नाही. - देशातही तीच स्थिती आहे. काही विघ्नसंतोषी लोकांना अवास्तव महत्त्व दिले जाते. हे चुकीचे आहे. मीडियाने सकारात्मक गोष्टींची गंभीरपणे दखल घेण्याची गरज आहे. जुन्हा जखमांवरील खपल्या काढत बसू नये.’

सद्गुरूचा तरुणांसारखा उत्साह थक्क करणारा आहे. जनजीवनात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. राष्ट्रप्रेम आणि विश्वप्रेमातून त्यांनी अनोखे चैतन्य निर्माण केले आहे. लहान मुले, मोठी माणसे असोत, राजकारणी असोत की कलाकार, प्रत्येक संवेदनशील माणसाला त्यांनी सामावून घेतले आहे. झोपलेल्या समाजाला, व्यवस्थेला सद्गुरुंनी जागे केले आहे. आपल्या देशात सद्गुरुंची कमतरता नाही. मात्र, खऱ्या अर्थाने सद्गुरू होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. सद्गुरुंनी कायम कृतीला महत्त्व दिले आहे. संपूर्ण विश्व प्रकाशमान करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. सद्गुरुंच्या ‘माती वाचवा’च्या चळवळीत आता ‘लोकमत’ परिवारही सहभागी झाला आहे. कोरोना काळात रक्तदानाच्या माध्यमातून ‘लोकमत’ने राज्यभरात मोठी चळवळ उभी केली. त्याचप्रमाणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि माती वाचविणे यासाठी ‘लोकमत’तर्फे यापुढेही नक्कीच पुढाकार घेतला जाईल.- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत.

टॅग्स :Puneपुणे