शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

दुसऱ्यांच्या घरात पाहण्याची आम्हाला सवय नाही; अजितदादांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर पटोले स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 15:08 IST

आम्ही मित्र पक्षावर कधीही अविश्वास व्यक्त केला नाही

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. तसेच शिंदे गटाच्या काही नेत्यांकडून अजितदादांना मुख्यमंत्र्यांसोबत येण्याची ऑफर दिली जात आहे. या राजकीय घडामोडीवर नाना पटोले यांनी आपले मत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीत नेमकं काय चाललं आहे? दुसऱ्यांच्या घरात पाहण्याची आम्हाला सवय नाही. त्यामुळे तिकडे काय चालल आहे याकडे आमचं लक्ष नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. 

पटोले म्हणाले, मित्र पक्षावर आम्ही कधीही अविश्वास व्यक्त केला नाही. आमची भूमिका एकच आहे जो कोणी बीजेपी विरोधात आणि संविधान वाचवण्यासाठी लढत असेल.  त्याच्यासोबत शेवटपर्यंत उभा राहणे. कोणाला कुठे जायचं, कुठल्या पक्षात जायचं. त्याचे आम्हाला काही सोयर सुतक नाही. आमचं त्याच्याकडे कुठलही लक्ष नाही. कालच्या सभेत प्रत्येक पक्षाचे दोन जण बोलणार आहेत. आधीपासूनच ठरलेले होते. त्यानुसार राष्ट्रवादीकडून दोन नावे आली होती. राष्ट्रवादीत नेमकं काय चाललं आहे? दुसऱ्यांच्या घरात पाहण्याची आम्हाला सवय नाही. त्यामुळे तिकडे काय चालल आहे याकडे आमचं लक्ष नाही. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना पुढील १५ दिवसात महाराष्ट्रातील राजकारणात दोन मोठे स्फोट होणार असल्याचे भाकीत केले होते. त्यावरून आंबेडकर यांना टोला लगावला आहे. प्रकाश आंबेडकर कधीपासून भविष्यकार झाले मला माहित नाही असं ते म्हणाले आहेत. 

केंद्रसरकार विरोधी आंदोलन

नरेंद्र मोदी जवाब दो हे आंदोलन महाराष्ट्रात घेऊन आलो आहे. सत्यपाल मलिक यांनी जे विधान केला आहे. त्याबद्दल नरेंद्र मोदींना भूमिका मांडावी लागेल. तुमची 56 इंची हिम्मत या देशाला जाणून घ्यायची आहे. अदानी बद्दल तुम्हाला उत्तर द्यावे लागेल असे त्यांनी संघितले आहे. 

 महाराष्ट्र भूषण उष्माघात दुर्घटना

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भारतरत्न मिळाला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका होती. अमित शहा ,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ यांच्यासाठी एअर कंडिशन मंडप टाकला जातो. तर सामान्य जनता एवढ्या संख्येने येणार असूनही आणि त्यांच्याच पैशाने हा कार्यक्रम होणार होता. हा शासकीय कार्यक्रम होता. तरीही जनतेसाठी मंडप का नाही टाकला असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला आहे. 

माणुसकी नसलेल हे सरकार आहे

सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता जनतेतून होत आहे. गुन्हा दाखल झाला पाहिजे. सामान्य जनतेला तडफडून मारण्याचा पाप सरकार करत आहे. या सरकारला थोडी जरी लाज असेल तर तातडीने राजीनामा द्यावा. ही मागणी काँग्रेसची असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस