शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांच्या घरात पाहण्याची आम्हाला सवय नाही; अजितदादांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर पटोले स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 15:08 IST

आम्ही मित्र पक्षावर कधीही अविश्वास व्यक्त केला नाही

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. तसेच शिंदे गटाच्या काही नेत्यांकडून अजितदादांना मुख्यमंत्र्यांसोबत येण्याची ऑफर दिली जात आहे. या राजकीय घडामोडीवर नाना पटोले यांनी आपले मत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीत नेमकं काय चाललं आहे? दुसऱ्यांच्या घरात पाहण्याची आम्हाला सवय नाही. त्यामुळे तिकडे काय चालल आहे याकडे आमचं लक्ष नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. 

पटोले म्हणाले, मित्र पक्षावर आम्ही कधीही अविश्वास व्यक्त केला नाही. आमची भूमिका एकच आहे जो कोणी बीजेपी विरोधात आणि संविधान वाचवण्यासाठी लढत असेल.  त्याच्यासोबत शेवटपर्यंत उभा राहणे. कोणाला कुठे जायचं, कुठल्या पक्षात जायचं. त्याचे आम्हाला काही सोयर सुतक नाही. आमचं त्याच्याकडे कुठलही लक्ष नाही. कालच्या सभेत प्रत्येक पक्षाचे दोन जण बोलणार आहेत. आधीपासूनच ठरलेले होते. त्यानुसार राष्ट्रवादीकडून दोन नावे आली होती. राष्ट्रवादीत नेमकं काय चाललं आहे? दुसऱ्यांच्या घरात पाहण्याची आम्हाला सवय नाही. त्यामुळे तिकडे काय चालल आहे याकडे आमचं लक्ष नाही. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना पुढील १५ दिवसात महाराष्ट्रातील राजकारणात दोन मोठे स्फोट होणार असल्याचे भाकीत केले होते. त्यावरून आंबेडकर यांना टोला लगावला आहे. प्रकाश आंबेडकर कधीपासून भविष्यकार झाले मला माहित नाही असं ते म्हणाले आहेत. 

केंद्रसरकार विरोधी आंदोलन

नरेंद्र मोदी जवाब दो हे आंदोलन महाराष्ट्रात घेऊन आलो आहे. सत्यपाल मलिक यांनी जे विधान केला आहे. त्याबद्दल नरेंद्र मोदींना भूमिका मांडावी लागेल. तुमची 56 इंची हिम्मत या देशाला जाणून घ्यायची आहे. अदानी बद्दल तुम्हाला उत्तर द्यावे लागेल असे त्यांनी संघितले आहे. 

 महाराष्ट्र भूषण उष्माघात दुर्घटना

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भारतरत्न मिळाला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका होती. अमित शहा ,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ यांच्यासाठी एअर कंडिशन मंडप टाकला जातो. तर सामान्य जनता एवढ्या संख्येने येणार असूनही आणि त्यांच्याच पैशाने हा कार्यक्रम होणार होता. हा शासकीय कार्यक्रम होता. तरीही जनतेसाठी मंडप का नाही टाकला असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला आहे. 

माणुसकी नसलेल हे सरकार आहे

सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता जनतेतून होत आहे. गुन्हा दाखल झाला पाहिजे. सामान्य जनतेला तडफडून मारण्याचा पाप सरकार करत आहे. या सरकारला थोडी जरी लाज असेल तर तातडीने राजीनामा द्यावा. ही मागणी काँग्रेसची असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस