शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांच्या घरात पाहण्याची आम्हाला सवय नाही; अजितदादांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर पटोले स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 15:08 IST

आम्ही मित्र पक्षावर कधीही अविश्वास व्यक्त केला नाही

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. तसेच शिंदे गटाच्या काही नेत्यांकडून अजितदादांना मुख्यमंत्र्यांसोबत येण्याची ऑफर दिली जात आहे. या राजकीय घडामोडीवर नाना पटोले यांनी आपले मत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीत नेमकं काय चाललं आहे? दुसऱ्यांच्या घरात पाहण्याची आम्हाला सवय नाही. त्यामुळे तिकडे काय चालल आहे याकडे आमचं लक्ष नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. 

पटोले म्हणाले, मित्र पक्षावर आम्ही कधीही अविश्वास व्यक्त केला नाही. आमची भूमिका एकच आहे जो कोणी बीजेपी विरोधात आणि संविधान वाचवण्यासाठी लढत असेल.  त्याच्यासोबत शेवटपर्यंत उभा राहणे. कोणाला कुठे जायचं, कुठल्या पक्षात जायचं. त्याचे आम्हाला काही सोयर सुतक नाही. आमचं त्याच्याकडे कुठलही लक्ष नाही. कालच्या सभेत प्रत्येक पक्षाचे दोन जण बोलणार आहेत. आधीपासूनच ठरलेले होते. त्यानुसार राष्ट्रवादीकडून दोन नावे आली होती. राष्ट्रवादीत नेमकं काय चाललं आहे? दुसऱ्यांच्या घरात पाहण्याची आम्हाला सवय नाही. त्यामुळे तिकडे काय चालल आहे याकडे आमचं लक्ष नाही. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना पुढील १५ दिवसात महाराष्ट्रातील राजकारणात दोन मोठे स्फोट होणार असल्याचे भाकीत केले होते. त्यावरून आंबेडकर यांना टोला लगावला आहे. प्रकाश आंबेडकर कधीपासून भविष्यकार झाले मला माहित नाही असं ते म्हणाले आहेत. 

केंद्रसरकार विरोधी आंदोलन

नरेंद्र मोदी जवाब दो हे आंदोलन महाराष्ट्रात घेऊन आलो आहे. सत्यपाल मलिक यांनी जे विधान केला आहे. त्याबद्दल नरेंद्र मोदींना भूमिका मांडावी लागेल. तुमची 56 इंची हिम्मत या देशाला जाणून घ्यायची आहे. अदानी बद्दल तुम्हाला उत्तर द्यावे लागेल असे त्यांनी संघितले आहे. 

 महाराष्ट्र भूषण उष्माघात दुर्घटना

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भारतरत्न मिळाला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका होती. अमित शहा ,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ यांच्यासाठी एअर कंडिशन मंडप टाकला जातो. तर सामान्य जनता एवढ्या संख्येने येणार असूनही आणि त्यांच्याच पैशाने हा कार्यक्रम होणार होता. हा शासकीय कार्यक्रम होता. तरीही जनतेसाठी मंडप का नाही टाकला असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला आहे. 

माणुसकी नसलेल हे सरकार आहे

सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता जनतेतून होत आहे. गुन्हा दाखल झाला पाहिजे. सामान्य जनतेला तडफडून मारण्याचा पाप सरकार करत आहे. या सरकारला थोडी जरी लाज असेल तर तातडीने राजीनामा द्यावा. ही मागणी काँग्रेसची असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस