शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो प्रकल्पात होणार पाण्याचा पुनर्वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: मेट्रोच्या सर्व स्थानकात, तसेच अन्य आस्थापनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या १०० टक्के पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: मेट्रोच्या सर्व स्थानकात, तसेच अन्य आस्थापनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या १०० टक्के पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (डीआरडीई) या संस्थेकडून घेण्यात येणार आहे.

या सामंजस्य करारावर मंगळवारी (दि. ५) महामेट्रोच्या कार्यालयात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, डीआरडीईच्या बायोडिझास्टर टेक्नॉलॉजीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. के. गोयल आणि त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित होते.

डॉ. दीक्षित म्हणाले, “महामेट्रोची पुण्यात ३१ स्थानके आहेत. त्याशिवाय अनेक आस्थापना आहेत. या सर्व ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या सर्व पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. डीआरडीईने त्यासाठी विशेष तंत्रज्ञान विकसित केले आहे. महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पात या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर झाला. त्यामुळे ते पुण्यातही वापरण्याचा निर्णय झाला. किमान ५ लाख नागरिकांकडून रोज महामेट्रोच्या स्थानकात पाणी वापरले जाईल, असा अंदाज घेऊन हा प्रकल्प उभारला जाईल.

त्यासाठी जमिनीखाली एका साठवूणक टाकीशिवाय वेगळी जागा लागणार नाही. यातून काही लाख लिटर पाण्याची रोजची बचत होणार आहे. तयार झालेले पाणी बागेसाठी झाडांना, वाहने, फरशी धुण्यासाठी वापरले जाणार आहे. ते पाणी पुन्हा प्रक्रियेसाठी उपलब्ध होईल. याच पद्धतीने पाण्याचे रिसायकलिंग होईल, असे डॉ. दीक्षित म्हणाले.

डॉ. गोयल यांनी सांगितले की, विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंच्या साह्याने हे पाणी वापरण्यायोग्य करण्यात येणार आहे. सर्व ठिकाणचे वापरलेले पाणी एका टाकीत जमा होईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. साधारण २४ तासांत ही प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर ते पाणी पुन्हा वापरता येईल. ‘डीआरडीई’चे हे तंत्रज्ञान आतापर्यंत विमानतळ, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी वापरण्यात आले आहे.

सैन्याचा तळ, सियाचीन सारख्या उंच, दुर्गम ठिकाणी जिथे पाण्याची टंचाई असते तिथेही हे तंत्रज्ञान यशस्वीपणे राबवले असल्याचे डॉ. गोयल म्हणाले. “मेट्रोची बांधकामे सध्या सुरू आहेत. ती करतानाच पाणी पुनर्वापरासाठीची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी वेगळा खर्च होणार नाही, असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.