शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगरला होणारा पाणीपुरवठा पिण्यास अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर : संपूर्ण राजगुरुनगरला पाणी पुरवणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्यातील पाण्याचे नमुने गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राजगुरुनगर : संपूर्ण राजगुरुनगरला पाणी पुरवणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्यातील पाण्याचे नमुने गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवेच्या आरोग्य प्रयोगशाळेने तपासण्यासाठी घेतले होते. हा अहवाल नगरपरिषदेला प्राप्त झाला असून, हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल या संस्थेने दिला आहे. यामुळे राजगुरुनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाणी पिण्यास योग्य नसल्याने पैसे मोजून शुद्ध पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवेच्या आरोग्य प्रयोगशाळेतर्फे ६ एप्रिलला राजगुरुनगर शहरातील विविध अशा वीस विभागांमधून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. बहुतांश ठिकाणच्या नमुन्यासाठी घेतलेल्या पाण्यातील संभाव्य सूक्ष्मजंतूंची टक्केवारीपैकी कोलिफॉर्म्सचे प्रमाण सर्व भागांमधील नमुन्यात १६ टक्केपेक्षा जास्त असल्याचे आढळले. त्याचप्रमाणे थर्मोटॉलरंट कोलिफॉर्म्सचे प्रमाण अरिहंत रेसिडेन्सी, सुलोचना हाईट्स या दोन ठिकाणी ३ टक्केइतके आहे.. नेहरू चौक, वाडा रोड, समतानगर या तीन ठिकाणी ६ टक्के तर केदारेश्वर पाण्याची टाकी या ठिकाणी ९ टक्के असल्याचे आढळून आले आहे. इतर ठिकाणी ते प्रमाण शून्य टक्के आहे. तसेच ई. कोलायचे प्रमाण वाडा रोड पाण्याची टाकी येथे ६ टक्के, तर केदारेश्वर पाण्याची टाकी या ठिकाणी ९ टक्के असल्याचे आढळून आले आहे. इतर ठिकाणी ते प्रमाण शून्य टक्के आहे. तरी या पिण्यास अयोग्य असणाऱ्या पाण्यावर योग्य प्रमाणात क्लोरीनची प्रक्रिया केल्यानंतर व सूक्ष्मजीवीय पुनर्तपासणीनंतर पिण्यास योग्य असल्याची खात्री झाल्यानंतरच ते पाणी पिण्यासाठी नागरिकांना वापरता येईल, असे या अहवालात नमूद केले आहे.

चौकट

राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्याच्या पाण्यावर शेवाळ व दुर्गंधीयुक्त पाणी झाले आहे. जलपर्णीही वाढू लागल्याने पाणी पिण्यास अयोग्य झाले होऊन शहरातील सांडपाणी भीमा नदीत सोडले जाते. तसेच ओढ्यानाल्यांना सोडलेले पाणी नदीत येऊन मिसळत आहे. त्यामुळे काही वर्षांपासून सिद्धेश्वर बंधाऱ्यातल्या नदीच्या पाण्यात जलपर्णी वाढते. तसेच गेली काही वर्षे शेवाळ्यासारख्या पाणवनस्पतीचा तवंगही येत आहे. मात्र पाणी वाहते राहत असल्याने, केदारेश्वर बंधाऱ्यात या दोन्ही वनस्पती राहत नाही. मात्र सध्या केदारेश्वर बंधाऱ्यात पाण्याखाली 'हायाड्रिला' नावाच्या पाणवनस्पतीचा थर साचला आहे.

फोटो ओळ: भीमा नदीत जलपर्णी वाढून शेवाळ साचले आहे. त्यामुळे नदीचे पाणी पिण्यास अयोग्य ठरत आहे.