शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

एका दिवसात महिनाभराचा पाणीसाठा जमा : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 14:20 IST

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणीलोट क्षेत्रातदमदार पाऊस होत आहे.

ठळक मुद्देपाणी कपातीची टांगती तलवार अखेर दूर होण्याची शक्यता निर्माणशहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकलपातील सर्व चारही धरणे शंभर टक्के भरली

पुणे: पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणीलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे गेल्या २४ तासात शहराला एक महिना पुरेल ऐवढा म्हणजे सुमारे १.५० टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.  दुष्काळ परिस्थितीमुळे पुणेकरांवर गेल्या सहा-सात महिन्यांपासून  पाणी कपातीची टांगती तलवार अखेर दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.    गतवर्षी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला होता. यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकलपातील सर्व चारही धरणे शंभर टक्के भरली होती. परंतु त्यानंतर झालेली कालवा फुटी प्रकरण, जिल्ह्यात पडलेला प्रचंड दुष्काळ व पाटबंधारे  विभागाचा नियोजन शुन्य कारभार यामुळे ऑक्टोबर-नोंव्हेंबर पासूनच पुणेकरांवर पाणी कपात लादण्यात आली. नोव्हेबर महिन्यांपासून पुणेकरांना एकवेळच पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्यातही धरणांचा पाणी साठा झपाट्याने कमी होत असून, पुणेकरांना दिवसाआड पाणी पुरवठा सुरु करा, असा तगादा पाटबंधारे विभागाने लावला होता. परंतु तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाणी कपात न करण्याची ठोस भूमिका घेतली. यामुळे पुणेकरांवरील पाणी पात टळली होती. परंतु संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने पाणी पुरवठ्यासाठी चिंत्तेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र २८ जून पासून पुणे शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात झाली.    खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला प्रकल्पात २८ जून रोजी केवळ २.२० टीएमसी म्हणजे ७.५२ टक्केच पाणी साठा शिल्लक होता. त्यानंतर गेल्या दहा दिवसांत या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्या झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे दहा दिवसांत पाणीसाठा २.२० टीएमसीवरून थेट ६.२५ टीएमसी झाला आहे. यामुळे पाणी टंचाईचे संकट निर्माण झालेल्या पुणेकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. आज अखेर खडकवासला प्रकल्पात एकूण ६.२५ टीएमसी म्हणजे २१.४१ टक्के पाणी साठा जमा झाला आहे. पुणे शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी महिन्याला सरासरी सव्वा टीएमसी पाणी साठा लागतो. यामुळे सध्या पुढील चार-पाच महिन्यांच्या किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर झाला आहे. -----------------------एक दिवसांत दीड टीएमसी पाणी जमाशनिवार (दि.६) पासूनच खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरु आहे. यामध्ये टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वांधिक म्हणजे ६४ मि.मी, वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २१ मि.मी तर पानशेत धरणामध्ये सुमारे ३० मि.मी पावसाची नोंद झाली. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ९ मि.मी नोंद झाली. या पावसामुळे धरणांमधील पाण्याच्या येवा झपाट्याने वाढत आहे. शनिवारी सकाळी चारही धरणांमध्ये एकूण ४.७५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता. एका दिवसात यामध्ये १.५० टीएमसीने वाढ होऊन रविवारी सायंकाळ पर्यंत हा पाणी साठा ६.२५ पर्यंत गेल्याची अधिकृत माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.-----------------------खडकवासला प्रकल्पातील धरणांतील पाणी साठ्याची माहिती (टीएमसीमध्ये)प्रकल्प           प्रकल्पीय साठा    सद्यस्थिती    टक्केवारी        पाऊसखडकवासला        १.९७                  ०.८८        ४४.५५        ९ मिमीपानशेत            १०.६५                  ३.०४        २८.५१        ३० मिमीवरसगाव            १२.८२                 २.१५        १६.७७        २१ मिमीटेमघर              ३.७१                    ०.१८        ४.९८        ६४ मिमीएकूण                 २९.१५                ६.२५        २१.४७

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसDamधरणwater shortageपाणीटंचाईPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका