शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

भोर तालुक्यात पाणीटंचाई; ७ गावे, ३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 16:48 IST

उन्हाळ्याची वाढलेली तीव्रता व पिण्याच्या पाण्याचे अटलेले स्रोत यामुळे दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत आहे

भोर : भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून, पंचायत समितीकडून ७ गावे, ३ वाड्यांना ७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तीन गावांना टँकर मंजूर आहेत. दोन गावांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. मागील वर्षी दोन टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. यावर्षी आत्ताच ७ टँकर सुरू झाले असून, यात वाढ होणार आहे.

मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट निर्माण झाली असून, पारा ४० च्या पुढे पोहोचला आहे. त्यामुळे जलस्राोत आटू लागले आहेत. विहिरी कोरड्या पडत असल्यामुळे भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मागील १५ दिवसांपासून ७ गावे ३ वाड्यांना ७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. वीस गाव खोऱ्यातील वरोडी खुर्द, वरोडी, डायमुख, तर वेळवंड भागातील जयतपाडची हुंबे वस्ती यांना टँकर मंजूर झाले आहेत. मात्र टँकर अद्याप सुरू न झाल्याने जयतपाडला ग्रामपंचायतीने खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. तर पहर बुद्रुकच्या वरची धानवली आणी खालची धानवली यांच्यासाठी टँकर मागणीचा प्रस्ताव दिला आहे. कुडली खुर्द येथील विहिरीचे पाणी कमी झाले असून, पाणी खराब झाले आहे. त्यामुळे शिरवली हि. मा. ग्रामपंचायतीने शिरवली हि.मा. व कुडली खुर्द गावांना टँकर सुरू करावे म्हणून भोर पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केला आहे. टंँकर मंजूर होईपर्यंत ग्रामपंचायतीने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असल्याचे सरपंच नामदेव पोळ यांनी सांगितले.

भोर पंचायत समितीकडून नीरा-देवघर धरण भागातील रिंगरोडवरील पहर बुद्रुकची कचरे वस्ती, उंब्राटकर वस्ती, भोर-महाड रस्त्यावरील वारवंड, उंबार्डे, शिळींब, राजिवडी, नानावळे, शिंदे वस्ती येथे दररोज एक खेप याप्रमाणे पाणीपुरवठा सुरू आहे. तर महामार्गावरील ससेवाडी (२), शिंदेवाडी (४), करंदी खे. बा. (३) मोरवाडीचे पाचलिगे येथे एक, याप्रमाणे ७ टँकरने दररोज पिण्याचा पाणी पुरवठा सुरू आहे.

मागील वर्षी दोन टँकरनेच पाणीपुरवठा सुरू होता. यावर्षी मागणी वाढत चालली आहे. भाटघर धरणातील कमी झालेला पाणीसाठा नीरा- देवघर धरणातून खाली सोडलेले पाणी, उन्हाळ्याची वाढलेली तीव्रता व पिण्याच्या पाण्याचे अटलेले स्रोत यामुळे दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत आहे. भोर पंचायत समितीकडून ७ गावे ३ वाड्यांना ७ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, तीन गावांना टँकर मंजूर करण्यात आले आहे. लवकरच त्यांनाही टँकरने पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असे भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी सांगितले. भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना रानावनात पाणी शोधावे लागत आहे. अनेक ठिकाणी खराब झालेले पाणी प्यावे लागत आहे. यामुळे साथीचे आजार उद्भवू शकतात, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसTemperatureतापमानWaterपाणीSocialसामाजिक