शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

भोर तालुक्यात पाणीटंचाई; ७ गावे, ३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 16:48 IST

उन्हाळ्याची वाढलेली तीव्रता व पिण्याच्या पाण्याचे अटलेले स्रोत यामुळे दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत आहे

भोर : भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून, पंचायत समितीकडून ७ गावे, ३ वाड्यांना ७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तीन गावांना टँकर मंजूर आहेत. दोन गावांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. मागील वर्षी दोन टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. यावर्षी आत्ताच ७ टँकर सुरू झाले असून, यात वाढ होणार आहे.

मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट निर्माण झाली असून, पारा ४० च्या पुढे पोहोचला आहे. त्यामुळे जलस्राोत आटू लागले आहेत. विहिरी कोरड्या पडत असल्यामुळे भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मागील १५ दिवसांपासून ७ गावे ३ वाड्यांना ७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. वीस गाव खोऱ्यातील वरोडी खुर्द, वरोडी, डायमुख, तर वेळवंड भागातील जयतपाडची हुंबे वस्ती यांना टँकर मंजूर झाले आहेत. मात्र टँकर अद्याप सुरू न झाल्याने जयतपाडला ग्रामपंचायतीने खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. तर पहर बुद्रुकच्या वरची धानवली आणी खालची धानवली यांच्यासाठी टँकर मागणीचा प्रस्ताव दिला आहे. कुडली खुर्द येथील विहिरीचे पाणी कमी झाले असून, पाणी खराब झाले आहे. त्यामुळे शिरवली हि. मा. ग्रामपंचायतीने शिरवली हि.मा. व कुडली खुर्द गावांना टँकर सुरू करावे म्हणून भोर पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केला आहे. टंँकर मंजूर होईपर्यंत ग्रामपंचायतीने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असल्याचे सरपंच नामदेव पोळ यांनी सांगितले.

भोर पंचायत समितीकडून नीरा-देवघर धरण भागातील रिंगरोडवरील पहर बुद्रुकची कचरे वस्ती, उंब्राटकर वस्ती, भोर-महाड रस्त्यावरील वारवंड, उंबार्डे, शिळींब, राजिवडी, नानावळे, शिंदे वस्ती येथे दररोज एक खेप याप्रमाणे पाणीपुरवठा सुरू आहे. तर महामार्गावरील ससेवाडी (२), शिंदेवाडी (४), करंदी खे. बा. (३) मोरवाडीचे पाचलिगे येथे एक, याप्रमाणे ७ टँकरने दररोज पिण्याचा पाणी पुरवठा सुरू आहे.

मागील वर्षी दोन टँकरनेच पाणीपुरवठा सुरू होता. यावर्षी मागणी वाढत चालली आहे. भाटघर धरणातील कमी झालेला पाणीसाठा नीरा- देवघर धरणातून खाली सोडलेले पाणी, उन्हाळ्याची वाढलेली तीव्रता व पिण्याच्या पाण्याचे अटलेले स्रोत यामुळे दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत आहे. भोर पंचायत समितीकडून ७ गावे ३ वाड्यांना ७ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, तीन गावांना टँकर मंजूर करण्यात आले आहे. लवकरच त्यांनाही टँकरने पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असे भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी सांगितले. भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना रानावनात पाणी शोधावे लागत आहे. अनेक ठिकाणी खराब झालेले पाणी प्यावे लागत आहे. यामुळे साथीचे आजार उद्भवू शकतात, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसTemperatureतापमानWaterपाणीSocialसामाजिक