शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पालखीकाळातच सासवडवर पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 15:48 IST

संतशिरोमणी ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळा आषाढी वारीनिमित्त २८ जूनला दोन दिवसांचा मुक्काम सासवडला आहे.

ठळक मुद्देयावर्षी पुरंदर तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने तीव्र पाणीटंचाई तहसील कार्यालयात बैठक सासवड परिसरातील १५ विहिरी अधिग्रहित करून त्यावर टँकर भरण्याची व्यवस्था

सासवड : संत शिरोमणी ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याचा आषाढी वारीनिमित्त २८ जूनला दोन दिवसांचा मुक्काम सासवडला आहे. २५ जून रोजी पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. दि. २८ जून ते १ जुलै या कालावधीत पालखी सोहळा पुरंदर तालुक्यात असेल. यासंबंधीच्या पूर्वतयारीची प्रशासनाची बैठक नुकतीच पुरंदर तहसील कार्यालयात पार पडली.पालखी सोहळा कालावधीत सर्व विभागांनी योग्य व्यवस्थापन करावे, यासाठी तहसिलदार अतुल म्हेत्रे यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या. या बैठकीस सासवड, जेजुरी नगरपालिका, वाल्हे ग्रामपंचायत, ग्रामीण रुग्णालय आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, भारतीय दूरसंचार निगम, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा विभाग, केंद्रीय महामार्ग (९६५), रेल्वे विभाग, पशुसंवर्धन विभाग आदी विभागांतील प्रमुख अधिकारी यांची पालखी सोहळा नियोजनाबाबत बैठक झाली.यावर्षी पुरंदर तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे सोहळाकाळात पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. सध्या सासवड शहराला दोन दिवसाआड वीर योजनेतून पाणीपुरवठा होतोे. गराडे व घोरवडी येथील पाणी सासवडला बंद झाले आहे. घोरवडी धरणात असणारा अल्प पाणीसाठा टंचाईसाठी राखून ठेवण्यात आला होता. तोही अल्प असल्यामुळे सासवड परिसरातील १५ विहिरी अधिग्रहित करून त्यावर टँकर भरण्याची व्यवस्था सासवड नगर परिषदेने केली आहे. परंतु, पालखी सोहळ्याच्या दोन दिवसांच्या कालावधीत किमान दीड हजार टँकर भरण्याची व्यवस्था करणे पाणीटंचाईमुळे सासवड नगर परिषदेस शक्य नाही. वीर योजनेचे पाणी या काळात सलग तीन दिवस सर्व भागास एक तास देणेसुद्धा शक्य होणार नसल्याने या काळात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवणार असल्याचे सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी बैठकीत सांगितले.वाल्हे येथे सोहळा काळात रेल्वे गेट बंद असते. अनेक रेल्वेगाड्या या मार्गवरून जात-येत असतात; त्यामुळे या ठिकाणी पालखीकाळात गाड्यांची संख्या या कालावधीसाठी कमी करता येईल का, याविषयी रेल्वे प्रशासनासह तातडीने बैठक घेऊन एकूणच पुरंदर तालुक्यात पालखी सोहळा कालावधीत वारकºयांना जास्तीत जास्त कशा सुविधा पुरविल्या जातील, यावर पुरंदर प्रशासन भर देणार असल्याचे तहसीलदार अतुल म्हेत्रे यांनी या वेळी बैठकीत सांगितले..............सासवडमधील पालखी सोहळा काळातील समस्यांवर मात करण्यासाठी सासवड नगरपरिषदेने सोहळा काळात घोरवडी जलाशयातील पाणी सासवडच्या शेटेमळ्यापर्यंत तीन दिवस सोडण्याची मागणी तहसीलदार अतुल म्हेत्रे यांच्याकडे केली. शेटे मळा या ठिकाणी टँकर भरण्याची व्यवस्था करून या समस्येतून मार्ग काढला जाईल .- विनोद जळक, मुख्याधिकारी ........................पुरंदर तालुका आरोग्य विभागाच्या वतीने १०८ व आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिका, पुरेसा औषधसाठा, ठिकठिकाणी तपासणी केंद्र व सुसज्ज पथक, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांची पालखीकाळासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती केली असल्याची माहिती पुरंदर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके यांनी दिली. जेजुरीनगरीतदेखील पालखीचा एक दिवस मुक्काम असतो. या काळात साधारण १,२०० टँकर पाण्यासाठी येतात.सध्या जेजुरीला चार दिवसाआड मांडकी डोह योजनेतून पाणीपुरवठा होत असून नाझरे धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. यात गाळाचे प्रमाण अधिक असल्याने, मांडकी योजनेवर जास्तीत जास्त ५०० ते ६०० टँकर भरले जातील. जेजुरी येथे अधिकचे टँकर भरण्यासाठी एमआयडीसी योजनेतून सुविधा केल्यास टँकर भरण्यास सोयीस्कर जाईल, असे जेजुरी नगर परिषदेच्या कर्मचाºयांनी या वेळी बैठकीत सांगितले.     

टॅग्स :Purandarपुरंदरsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी