शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाणीटंचाई : ८ गावे, ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणी; डोक्यावरचा हंडा उतरेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 02:58 IST

जुन्नर तालुक्यात ५ धरणे असतानाही प्रत्येक वर्षी आदिवासी पट्ट्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो़ या वर्षी ८ गावे आणि ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ आदिवासी पट्ट्यातील विंधनविहिरींची पातळी नीचांकी झालेली आहे़

नारायणगाव - जुन्नर तालुक्यात ५ धरणे असतानाही प्रत्येक वर्षी आदिवासी पट्ट्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो़ या वर्षी ८ गावे आणि ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ आदिवासी पट्ट्यातील विंधनविहिरींची पातळी नीचांकी झालेली आहे़ ज्या भागात पाणी नाही, त्या भागात महिलांना कित्येक किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावे लागते. दर वर्षी हा प्रश्न निर्माण होत असल्याने आदिवासी भागातील पाणीप्रश्न कधी संपुष्टात येणार व महिलांच्या डोक्यावरील हांडा कधी खाली येणार, अशी अपेक्षा आदिवासी बांधव करीत आहेत.जुन्नर तालुक्यातील ६५ गावे आदिवासी भागात आहेत़ पश्चिम पट्ट्यात असलेल्या या गावांमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे़ माणिकडोह व पिंपळगाव जोगा धरण ही आदिवासी पट्ट्यालगत येतात; परंतु आदिवासी पट्टा उंच भागात असल्याने या धरणांमधून पाणी नेणे मुश्कील आहे़ या भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आदिवासी भागात जलसंधारण योजना, केटीवेअर, पावसाचे पाणी बोअरवेल घेऊन त्याच भागात सोडणे आवश्यक आहे. अनेक वर्षांपासून आदिवासी पट्ट्यामध्ये उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो़ या वर्षी तालुक्यातील आणे, नळावणे, शिंदेवाडी, जवळवंडी, अजनावळ, आलमे, गावठाण, पिंपळगाव जोगा, आळू, डिंगोरे, घोडमाळ या गावांसह आजूबाजूच्या ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ या भागात दररोज ४ टँकर, तर कोपरे मांडवे या भागात ३ टॅक्टरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या गावांव्यतिरिक्त सुकाळ वेढे, हातवीज, आंबे या आदिवासी गावांत; तर गुळुंचवाडी गावासाठी टँकरची मागणी प्रस्तावित आहे, अशी माहिती पंचायत समितीचे यांत्रिकी विभागप्रमुख आत्माराम कसबे यांनी दिली़पाणीपुरवठा योजनांची चौकशी करावीआदिवासी भागातील जवळपास ६० टक्के पाणीपुरवठा योजना बंद अवस्थेत आहेत. काही पाणीपुरवठा योजना ठेकेदारांनी पूर्णच केलेल्या नाहीत. मात्र, त्याची बिले अधिकाऱ्यांशी संगनमत करून काढून घेण्यात आलेली आहेत. काही पाणीपुरवठा योजना देखभालीअभावी बंद पडलेल्या आहेत़ पंचायत समितीच्या आढावा बैठकीत सर्वांत जास्त पश्न पाणीप्रश्नासंदर्भात उपस्थित करण्यात आले होते़लोकांच्या रोशाला सामोर जाऊ शकत नसल्याने अनेक अधिकारी या बैठकांना दांड्या मारत आहेत़ आदिवासी भागात झालेल्या सर्व पाणीपुरवठा योजनांची चौकशी करावी, गैरप्रकार झाला असेल तर संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी महासंघ जुन्नरचे अध्यक्ष तुकाराम रावते यांनी केली आहे़टँँकरची पाहावी लागते वाटजुन्या काळातील विहिरींना पावसाळ्यात पाणी असते; मात्र उन्हाळ्यात एप्रिल, मेच्या दरम्यान विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी आटल्याने महिलांना लांब त्या ठिकाणी जाऊन पाणी आणावे लागते. तसेच, या भागातील महिलांना दररोज पाण्याच्या टँकरची वाट पाहावी लागते़ सध्याच्या परिस्थितीमध्ये आदिवासी पट्ट्यातील बहुतांश गावांमध्ये पाण्याची बिकट अवस्था निर्माण झालेली आहे़ या भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार की नाही, अशी खंत आदिवासी बांधव करीत आहेत़

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईPuneपुणे