शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

पाणीटंचाई : ८ गावे, ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणी; डोक्यावरचा हंडा उतरेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 02:58 IST

जुन्नर तालुक्यात ५ धरणे असतानाही प्रत्येक वर्षी आदिवासी पट्ट्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो़ या वर्षी ८ गावे आणि ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ आदिवासी पट्ट्यातील विंधनविहिरींची पातळी नीचांकी झालेली आहे़

नारायणगाव - जुन्नर तालुक्यात ५ धरणे असतानाही प्रत्येक वर्षी आदिवासी पट्ट्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो़ या वर्षी ८ गावे आणि ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ आदिवासी पट्ट्यातील विंधनविहिरींची पातळी नीचांकी झालेली आहे़ ज्या भागात पाणी नाही, त्या भागात महिलांना कित्येक किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावे लागते. दर वर्षी हा प्रश्न निर्माण होत असल्याने आदिवासी भागातील पाणीप्रश्न कधी संपुष्टात येणार व महिलांच्या डोक्यावरील हांडा कधी खाली येणार, अशी अपेक्षा आदिवासी बांधव करीत आहेत.जुन्नर तालुक्यातील ६५ गावे आदिवासी भागात आहेत़ पश्चिम पट्ट्यात असलेल्या या गावांमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे़ माणिकडोह व पिंपळगाव जोगा धरण ही आदिवासी पट्ट्यालगत येतात; परंतु आदिवासी पट्टा उंच भागात असल्याने या धरणांमधून पाणी नेणे मुश्कील आहे़ या भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आदिवासी भागात जलसंधारण योजना, केटीवेअर, पावसाचे पाणी बोअरवेल घेऊन त्याच भागात सोडणे आवश्यक आहे. अनेक वर्षांपासून आदिवासी पट्ट्यामध्ये उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो़ या वर्षी तालुक्यातील आणे, नळावणे, शिंदेवाडी, जवळवंडी, अजनावळ, आलमे, गावठाण, पिंपळगाव जोगा, आळू, डिंगोरे, घोडमाळ या गावांसह आजूबाजूच्या ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ या भागात दररोज ४ टँकर, तर कोपरे मांडवे या भागात ३ टॅक्टरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या गावांव्यतिरिक्त सुकाळ वेढे, हातवीज, आंबे या आदिवासी गावांत; तर गुळुंचवाडी गावासाठी टँकरची मागणी प्रस्तावित आहे, अशी माहिती पंचायत समितीचे यांत्रिकी विभागप्रमुख आत्माराम कसबे यांनी दिली़पाणीपुरवठा योजनांची चौकशी करावीआदिवासी भागातील जवळपास ६० टक्के पाणीपुरवठा योजना बंद अवस्थेत आहेत. काही पाणीपुरवठा योजना ठेकेदारांनी पूर्णच केलेल्या नाहीत. मात्र, त्याची बिले अधिकाऱ्यांशी संगनमत करून काढून घेण्यात आलेली आहेत. काही पाणीपुरवठा योजना देखभालीअभावी बंद पडलेल्या आहेत़ पंचायत समितीच्या आढावा बैठकीत सर्वांत जास्त पश्न पाणीप्रश्नासंदर्भात उपस्थित करण्यात आले होते़लोकांच्या रोशाला सामोर जाऊ शकत नसल्याने अनेक अधिकारी या बैठकांना दांड्या मारत आहेत़ आदिवासी भागात झालेल्या सर्व पाणीपुरवठा योजनांची चौकशी करावी, गैरप्रकार झाला असेल तर संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी महासंघ जुन्नरचे अध्यक्ष तुकाराम रावते यांनी केली आहे़टँँकरची पाहावी लागते वाटजुन्या काळातील विहिरींना पावसाळ्यात पाणी असते; मात्र उन्हाळ्यात एप्रिल, मेच्या दरम्यान विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी आटल्याने महिलांना लांब त्या ठिकाणी जाऊन पाणी आणावे लागते. तसेच, या भागातील महिलांना दररोज पाण्याच्या टँकरची वाट पाहावी लागते़ सध्याच्या परिस्थितीमध्ये आदिवासी पट्ट्यातील बहुतांश गावांमध्ये पाण्याची बिकट अवस्था निर्माण झालेली आहे़ या भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार की नाही, अशी खंत आदिवासी बांधव करीत आहेत़

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईPuneपुणे