शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

पाणीटंचाई : ८ गावे, ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणी; डोक्यावरचा हंडा उतरेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 02:58 IST

जुन्नर तालुक्यात ५ धरणे असतानाही प्रत्येक वर्षी आदिवासी पट्ट्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो़ या वर्षी ८ गावे आणि ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ आदिवासी पट्ट्यातील विंधनविहिरींची पातळी नीचांकी झालेली आहे़

नारायणगाव - जुन्नर तालुक्यात ५ धरणे असतानाही प्रत्येक वर्षी आदिवासी पट्ट्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो़ या वर्षी ८ गावे आणि ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ आदिवासी पट्ट्यातील विंधनविहिरींची पातळी नीचांकी झालेली आहे़ ज्या भागात पाणी नाही, त्या भागात महिलांना कित्येक किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावे लागते. दर वर्षी हा प्रश्न निर्माण होत असल्याने आदिवासी भागातील पाणीप्रश्न कधी संपुष्टात येणार व महिलांच्या डोक्यावरील हांडा कधी खाली येणार, अशी अपेक्षा आदिवासी बांधव करीत आहेत.जुन्नर तालुक्यातील ६५ गावे आदिवासी भागात आहेत़ पश्चिम पट्ट्यात असलेल्या या गावांमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे़ माणिकडोह व पिंपळगाव जोगा धरण ही आदिवासी पट्ट्यालगत येतात; परंतु आदिवासी पट्टा उंच भागात असल्याने या धरणांमधून पाणी नेणे मुश्कील आहे़ या भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आदिवासी भागात जलसंधारण योजना, केटीवेअर, पावसाचे पाणी बोअरवेल घेऊन त्याच भागात सोडणे आवश्यक आहे. अनेक वर्षांपासून आदिवासी पट्ट्यामध्ये उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो़ या वर्षी तालुक्यातील आणे, नळावणे, शिंदेवाडी, जवळवंडी, अजनावळ, आलमे, गावठाण, पिंपळगाव जोगा, आळू, डिंगोरे, घोडमाळ या गावांसह आजूबाजूच्या ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ या भागात दररोज ४ टँकर, तर कोपरे मांडवे या भागात ३ टॅक्टरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या गावांव्यतिरिक्त सुकाळ वेढे, हातवीज, आंबे या आदिवासी गावांत; तर गुळुंचवाडी गावासाठी टँकरची मागणी प्रस्तावित आहे, अशी माहिती पंचायत समितीचे यांत्रिकी विभागप्रमुख आत्माराम कसबे यांनी दिली़पाणीपुरवठा योजनांची चौकशी करावीआदिवासी भागातील जवळपास ६० टक्के पाणीपुरवठा योजना बंद अवस्थेत आहेत. काही पाणीपुरवठा योजना ठेकेदारांनी पूर्णच केलेल्या नाहीत. मात्र, त्याची बिले अधिकाऱ्यांशी संगनमत करून काढून घेण्यात आलेली आहेत. काही पाणीपुरवठा योजना देखभालीअभावी बंद पडलेल्या आहेत़ पंचायत समितीच्या आढावा बैठकीत सर्वांत जास्त पश्न पाणीप्रश्नासंदर्भात उपस्थित करण्यात आले होते़लोकांच्या रोशाला सामोर जाऊ शकत नसल्याने अनेक अधिकारी या बैठकांना दांड्या मारत आहेत़ आदिवासी भागात झालेल्या सर्व पाणीपुरवठा योजनांची चौकशी करावी, गैरप्रकार झाला असेल तर संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी महासंघ जुन्नरचे अध्यक्ष तुकाराम रावते यांनी केली आहे़टँँकरची पाहावी लागते वाटजुन्या काळातील विहिरींना पावसाळ्यात पाणी असते; मात्र उन्हाळ्यात एप्रिल, मेच्या दरम्यान विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी आटल्याने महिलांना लांब त्या ठिकाणी जाऊन पाणी आणावे लागते. तसेच, या भागातील महिलांना दररोज पाण्याच्या टँकरची वाट पाहावी लागते़ सध्याच्या परिस्थितीमध्ये आदिवासी पट्ट्यातील बहुतांश गावांमध्ये पाण्याची बिकट अवस्था निर्माण झालेली आहे़ या भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार की नाही, अशी खंत आदिवासी बांधव करीत आहेत़

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईPuneपुणे