शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

पाण्याची लय टंचाई, पहाटे २ वाजता उठावं लागतंय, पुढं कसं होणार? वारकऱ्यांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 10:39 IST

यंदा पाण्याची लय वंगाळ परिस्थिती हाय, यापूर्वी कधीच असं झालं नव्हतं

पुणे: खांद्यावर पताका, हातात चिपळ्या, टाळ, वीणा, डोक्याला उभा गंध लावलेले वारकरी, टाळ-मृदंगाच्या तालावर नर्तन करीत ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा जयघोष करणारे वैष्णव, डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांनी केलेल्या विठुनामाच्या गजराने अवघी पुण्यनगरी दुमदुमली. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात उत्साहात आगमन झाले. यावेळी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेले वारकरी आजिनाथ किसन अभंग (वय ६०) यांनी भावना व्यक्त करत पाण्याची लय टंचाई असून पुढं कसं  होणार असा सवाल उपस्थित केला आहे.  

अभंग म्हणाले, यंदा पाण्याची लय वंगाळ परिस्थिती हाय. यापूर्वी कधीच असं झालं नव्हतं. पहाटे २ वाजता उठून बसलो व्हतो. ३ वाजता पाणी येणार म्हणून. लय अडचण होतीय बाबा. कसं होणार पुढं काय माहीत?’ पावसाने यंदा ओढ दिल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. 

वारीतदेखील पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्याविषयी वारकऱ्यांची गप्पा मारल्या. तेव्हा यंदा जरा अवघडच परिस्थिती निर्माण होईल, अशाच प्रतिक्रिया सर्वांनी दिल्या. गेल्या तेरा वर्षांपासून आजिनाथ अभंग वारी करत आहेत. ते इंदापूर तालुक्यातील झगडेवाडीतील. ते वारीत गंध लावण्याचे काम करतात. त्यांना ५ एकर शेती आहे. त्यांच्याकडे १३ जर्सी गायी आहेत. त्यावरच त्यांचे घर चालते. ते म्हणाले, ‘मी माझ्या मंडळीसोबत (पत्नी) वारीला यायचो; पण आता मंडळींचे पाय खूप दुखत आहेत. त्यामुळे तिला यायला जमत नाही.’

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022FarmerशेतकरीRainपाऊस