शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

पुण्याचा पाणीसाठा तळाला, पावसाळा लांबल्यास भीषण परिस्थिती उद्भवणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 15:06 IST

शहराची वाढती लोकसंख्या आणि ग्रामीण भागात पाणी वहनाची जुनी पद्धती यामुळे पुण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यंदा उन्हाळ्याच्या मध्यावर जेमतेम पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असून पाऊस लांबला तर भीषण परिस्थिती उद्भवू शकते. 

ठळक मुद्देपुण्याचा पाणीसाठा घटला, पानशेत आणि खडकवासला धरणांचा आधार  टेमघरमध्ये  शून्य तर वरसगावमध्ये अवघे एक टक्के पाणी 

पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांचा पाणीसाठा वेगाने खालावत आहे. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत पाणीसाठा जपून वापरण्याची वेळ पुणेकरांवर येणार आहे. वाढते तापमान आणि त्यामुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून त्याचा परिणाम पुण्याच्या पाणीपुरवठ्यावर होऊ शकतो. उन्हाळ्याच्या मध्यावर जेमतेम पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असून पाऊस लांबला तर भीषण परिस्थिती उद्भवू शकते. 

 

    महिन्याला सुमारे सव्वा ते दीड टीएमसीच्या दरम्यान पाणी पुणे शहराकडून खडकवासला, वरसगाव, पानशेत, टेमघर धरणातून वापरले जाते. या खडकवासला धरण साखळी नावाने ओळखल्या जाणाऱ्या धरणातून पुणे शहराला पाईपलाईनने पाणीपुरवठा केला जातो.  यातील  टेमघरची क्षमता  ३.७१ टीएमसी, पानशेतची क्षमता १०.६५ टीएमसी, वरसगावची क्षमता  १२.८२ टीएमसी,खडकवासला धरणाची क्षमता १. ९७ टीएमसी आहे. सध्या या धरणांमध्ये पाणी कमी होत असून खडकवासला वगळता बाकी धरणांनी तळ गाठला आहे. टेमघर धरणात एकूण क्षमतेच्या शून्य टक्के पाणी आहे. या धरणाची दुरुस्ती करण्याच्या कारणामुळे या धरणातील पाणी लवकर संपवण्यात आले आहे. पानशेत धरणात एकूण क्षमतेच्या ६० टक्के पाणी शिल्लक आहे. तर वरसगाव धरणात अवघे १ टक्के पाणी शिल्लक असून सर्वात लहान खडकवासलाधरणात ९० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

 

याशिवाय सध्या उन्हाळी आवर्तन सुरु आहे. साधारण १५ जुलैपर्यँत पाण्याचे नियोजनकरण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असतो. यंदा पाणीसाठा असला तरी ग्रामीण भाग आणि शहर यांचे वाटप बघता जेमतेम काठावर पुरेल एवढे पाणी शिल्लक आहे. पावसाळा लांबल्यास जिल्ह्यासह ४० लाख पुणेकरांना तहानलेले राहावे लागू शकते. वाढती उष्णता आणि पाणी वाहत असताना होणारे बाष्पीभवन आणि जिरण्याची प्रक्रिया यामुळे पाणी कमी होते. जिल्ह्यात कालव्यावाटे पाणी पोचवत असल्याने बरेचसे पाणी जिरून जाते. दुसरीकडे पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शहराच्या पाण्याने वापराची मर्यादा ओलांडली आहे. या सर्व बाबींचा विचार करून पाण्याचे नियोजन झाले नाही तर पुढच्या काही वर्षात भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.  

 

 

 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीDamधरण