शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

पुण्याचा पाणीसाठा तळाला, पावसाळा लांबल्यास भीषण परिस्थिती उद्भवणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 15:06 IST

शहराची वाढती लोकसंख्या आणि ग्रामीण भागात पाणी वहनाची जुनी पद्धती यामुळे पुण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यंदा उन्हाळ्याच्या मध्यावर जेमतेम पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असून पाऊस लांबला तर भीषण परिस्थिती उद्भवू शकते. 

ठळक मुद्देपुण्याचा पाणीसाठा घटला, पानशेत आणि खडकवासला धरणांचा आधार  टेमघरमध्ये  शून्य तर वरसगावमध्ये अवघे एक टक्के पाणी 

पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांचा पाणीसाठा वेगाने खालावत आहे. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत पाणीसाठा जपून वापरण्याची वेळ पुणेकरांवर येणार आहे. वाढते तापमान आणि त्यामुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून त्याचा परिणाम पुण्याच्या पाणीपुरवठ्यावर होऊ शकतो. उन्हाळ्याच्या मध्यावर जेमतेम पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असून पाऊस लांबला तर भीषण परिस्थिती उद्भवू शकते. 

 

    महिन्याला सुमारे सव्वा ते दीड टीएमसीच्या दरम्यान पाणी पुणे शहराकडून खडकवासला, वरसगाव, पानशेत, टेमघर धरणातून वापरले जाते. या खडकवासला धरण साखळी नावाने ओळखल्या जाणाऱ्या धरणातून पुणे शहराला पाईपलाईनने पाणीपुरवठा केला जातो.  यातील  टेमघरची क्षमता  ३.७१ टीएमसी, पानशेतची क्षमता १०.६५ टीएमसी, वरसगावची क्षमता  १२.८२ टीएमसी,खडकवासला धरणाची क्षमता १. ९७ टीएमसी आहे. सध्या या धरणांमध्ये पाणी कमी होत असून खडकवासला वगळता बाकी धरणांनी तळ गाठला आहे. टेमघर धरणात एकूण क्षमतेच्या शून्य टक्के पाणी आहे. या धरणाची दुरुस्ती करण्याच्या कारणामुळे या धरणातील पाणी लवकर संपवण्यात आले आहे. पानशेत धरणात एकूण क्षमतेच्या ६० टक्के पाणी शिल्लक आहे. तर वरसगाव धरणात अवघे १ टक्के पाणी शिल्लक असून सर्वात लहान खडकवासलाधरणात ९० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

 

याशिवाय सध्या उन्हाळी आवर्तन सुरु आहे. साधारण १५ जुलैपर्यँत पाण्याचे नियोजनकरण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असतो. यंदा पाणीसाठा असला तरी ग्रामीण भाग आणि शहर यांचे वाटप बघता जेमतेम काठावर पुरेल एवढे पाणी शिल्लक आहे. पावसाळा लांबल्यास जिल्ह्यासह ४० लाख पुणेकरांना तहानलेले राहावे लागू शकते. वाढती उष्णता आणि पाणी वाहत असताना होणारे बाष्पीभवन आणि जिरण्याची प्रक्रिया यामुळे पाणी कमी होते. जिल्ह्यात कालव्यावाटे पाणी पोचवत असल्याने बरेचसे पाणी जिरून जाते. दुसरीकडे पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शहराच्या पाण्याने वापराची मर्यादा ओलांडली आहे. या सर्व बाबींचा विचार करून पाण्याचे नियोजन झाले नाही तर पुढच्या काही वर्षात भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.  

 

 

 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीDamधरण