शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

पुण्यात पाणी गळतीला मीटरचा ‘ब्रेक’; जून २०२३ पर्यंत घराघरात बसणार पाणी मीटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 10:01 IST

दोन झोनमध्ये गळती ४० वरून १६ टक्क्यांवर

पुणे : महापालिकेने खडकवासला धरणातून पाणी उचलल्यावर घराघरापर्यंत पोहोचेपर्यंत त्यात ३५ ते ४० टक्के गळती होते. ही गळती थांबविण्यासाठी महापालिकेने प्रत्येक नळजोडला मीटर बसवत ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे. या अंतर्गत दोन झोनमध्ये मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. येथे पाणी गळतीचे प्रमाण ४० वरून १६ टक्क्यांवर आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत प्रत्येक नळजोडला मीटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे मीटर बसविण्यासाठी शहरात १३२ झोन तयार केले आहेत. त्यापैकी दोन झोनमध्ये मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. यात तंत्रज्ञानाचा वापर करून समान पाणी वाटप करणे, पाण्याचे ऑडिट करणे, अनधिकृत नळ जोड, दुबार नळजोड शोधणे हे पाणी मीटर बसविल्यावर सहज शक्य होणार आहे. प्रती व्यक्ती दररोज दीडशे लिटर पाणी मिळालेच पाहिजे हा यामागील उद्देश आहे.

महापालिकेने २४ बाय ७ समान पाणीपुरवठा योजनेचे काम २०१८ ला हाती घेतले. कोरोना आपत्तीच्या काळात हे काम थंडावले होते; परंतु गेल्या काही महिन्यात या कामाने जोर धरला असून, जुन्या जलवाहिन्यांच्या जागी ४०० कि.मी.च्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मिळकत कर विभागाकडील शहरातील मिळकतीच्या नोंदीनुसार ३ लाख १८ हजार ८४७ पाणी मीटर बसविण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत मीटर बसविण्याचे ३५ टक्के काम पूर्ण झाले असून, जून २०२३ पर्यंत ते पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

एएमआर मीटर्सचे फायदे

- शहरात २००१ पर्यंत प्रत्येक नळजोडला पाणी मीटर होते. हे मीटर मेकॅनिकल मीटर्स असल्याने त्याचे तोटे खूप होते. सदर मीटर हवेमुळेही फिरत असल्याने पाणी वापर झाला नाही तरी पूर्वी बिलिंग होत होते. तसेच पाण्याचा दाबही कमी होत होता. महापालिकेने आता साडेसात हजार रुपये किमतीचा एएमआर मीटर घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे इलेक्ट्रिक फुल बोअर मीटर असल्याने पाणी वहनामध्ये कोणताही अडथळा येणार नसून, पाण्याच्या दाबावरही कोणताही परिणाम होणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

- या मीटरचे आयुष्यमान हे १० वर्षांचे असून, हे सर्व मीटर महापालिकेच्या मुख्य सर्व्हरला जीपीआरएस प्रणालीने जोडले जाणार आहेत. यामुळे थेंबा-थेंबाचा हिशोब ठेवणे शक्य होणार असल्याचेही पावसकर यांनी सांगितले.

असे होणार मोजमाप

- खडकवासला धरणातून समजा दहा हजार लिटर पाणी घेतले तर ते पाणी जलवाहिनीतून महापालिकेच्या टाक्यांमध्ये किती प्रमाणात येते, तेथून पुढे प्रत्यक्ष नळजोडद्वारे घरात किती जाते. याची सर्व नोंद पंधरा मिनिटाला महापालिकेला मिळणार आहे.

- यात ऑटोमॅटिक वॉल सुरू करणे, कोणत्या भागात कमी पाणी गेले, कोठे जास्त पाणी गेले याची नोंद लागलीच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला होणार आहे. यामुळे पाण्याचे समान वाटप करण्यावर नियंत्रण ठेवता येणार असून, अतिरिक्त पाणी अथवा वाया जाणारे पाणी रोखता येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिकाkhadakwasala-acखडकवासला