शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

पुण्यात पाणी गळतीला मीटरचा ‘ब्रेक’; जून २०२३ पर्यंत घराघरात बसणार पाणी मीटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 10:01 IST

दोन झोनमध्ये गळती ४० वरून १६ टक्क्यांवर

पुणे : महापालिकेने खडकवासला धरणातून पाणी उचलल्यावर घराघरापर्यंत पोहोचेपर्यंत त्यात ३५ ते ४० टक्के गळती होते. ही गळती थांबविण्यासाठी महापालिकेने प्रत्येक नळजोडला मीटर बसवत ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे. या अंतर्गत दोन झोनमध्ये मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. येथे पाणी गळतीचे प्रमाण ४० वरून १६ टक्क्यांवर आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत प्रत्येक नळजोडला मीटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे मीटर बसविण्यासाठी शहरात १३२ झोन तयार केले आहेत. त्यापैकी दोन झोनमध्ये मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. यात तंत्रज्ञानाचा वापर करून समान पाणी वाटप करणे, पाण्याचे ऑडिट करणे, अनधिकृत नळ जोड, दुबार नळजोड शोधणे हे पाणी मीटर बसविल्यावर सहज शक्य होणार आहे. प्रती व्यक्ती दररोज दीडशे लिटर पाणी मिळालेच पाहिजे हा यामागील उद्देश आहे.

महापालिकेने २४ बाय ७ समान पाणीपुरवठा योजनेचे काम २०१८ ला हाती घेतले. कोरोना आपत्तीच्या काळात हे काम थंडावले होते; परंतु गेल्या काही महिन्यात या कामाने जोर धरला असून, जुन्या जलवाहिन्यांच्या जागी ४०० कि.मी.च्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मिळकत कर विभागाकडील शहरातील मिळकतीच्या नोंदीनुसार ३ लाख १८ हजार ८४७ पाणी मीटर बसविण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत मीटर बसविण्याचे ३५ टक्के काम पूर्ण झाले असून, जून २०२३ पर्यंत ते पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

एएमआर मीटर्सचे फायदे

- शहरात २००१ पर्यंत प्रत्येक नळजोडला पाणी मीटर होते. हे मीटर मेकॅनिकल मीटर्स असल्याने त्याचे तोटे खूप होते. सदर मीटर हवेमुळेही फिरत असल्याने पाणी वापर झाला नाही तरी पूर्वी बिलिंग होत होते. तसेच पाण्याचा दाबही कमी होत होता. महापालिकेने आता साडेसात हजार रुपये किमतीचा एएमआर मीटर घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे इलेक्ट्रिक फुल बोअर मीटर असल्याने पाणी वहनामध्ये कोणताही अडथळा येणार नसून, पाण्याच्या दाबावरही कोणताही परिणाम होणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

- या मीटरचे आयुष्यमान हे १० वर्षांचे असून, हे सर्व मीटर महापालिकेच्या मुख्य सर्व्हरला जीपीआरएस प्रणालीने जोडले जाणार आहेत. यामुळे थेंबा-थेंबाचा हिशोब ठेवणे शक्य होणार असल्याचेही पावसकर यांनी सांगितले.

असे होणार मोजमाप

- खडकवासला धरणातून समजा दहा हजार लिटर पाणी घेतले तर ते पाणी जलवाहिनीतून महापालिकेच्या टाक्यांमध्ये किती प्रमाणात येते, तेथून पुढे प्रत्यक्ष नळजोडद्वारे घरात किती जाते. याची सर्व नोंद पंधरा मिनिटाला महापालिकेला मिळणार आहे.

- यात ऑटोमॅटिक वॉल सुरू करणे, कोणत्या भागात कमी पाणी गेले, कोठे जास्त पाणी गेले याची नोंद लागलीच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला होणार आहे. यामुळे पाण्याचे समान वाटप करण्यावर नियंत्रण ठेवता येणार असून, अतिरिक्त पाणी अथवा वाया जाणारे पाणी रोखता येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिकाkhadakwasala-acखडकवासला