शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर साचलेले पाणी; अपूर्ण काम, वारकऱ्यांना सहन करावा लागतोय नाहक त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 15:59 IST

रस्त्यावर व पुलावर साचलेले पाणी, रस्त्यावर लावलेले शौचालये, रस्त्यांचे अपूर्ण काम याचा नाहक त्रास वारकऱ्यांना यांना सहन करावा लागला

निमगाव केतकी : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने वारकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागला. निमगाव केतकी येथून रविवारी सकाळी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर कडे मार्गस्थ झाला. यावेळी निमगाव केतकी ते इरिगेशन बंगला या एक किलोमीटर अंतरातील रस्त्यावर व पुलावर साचलेले पाणी, रस्त्यावर लावलेले शौचालये, रस्त्यांचे अपूर्ण काम याचा नाहक त्रास वारकऱ्यांना यांना सहन करावा लागला. 

अंथुर्णे येथील मुक्काम या वर्षी रद्द झाल्याने पालखीला शनिवारी सणसर येथून निमगाव केतकी येथे येण्यास रात्रीचे साडेआठ वाजले. सवंदडीच्या पुढे पालखी मार्गाचे काम बंद असल्याने जुन्या रस्त्याला साईड पट्ट्या मोठ्या प्रमाणात खचल्याने व या साईड पट्ट्या मुरुमाने न भरल्यामुळे व रात्री अंधारात न दिसल्याने अनेक वारकरी या ठिकाणी घसरून पडले. रविवारी सकाळी पालखी सोहळा इंदापूर कडे जाताना गावाच्या बाहेर असलेल्या ओढ्यावरील म्हेत्रे पुलावर टँकर मधून सांडलेले पाणी मोठ्या प्रमाणात साठलेले होते. पुलावरील साठलेले पाणी काढून देणे गरजेचे असताना ते न काढल्यामुळे वारकऱ्यांना याचा त्रास झाला.      त्या पुढे केतकेश्वर विद्यालयाच्या शेजारील उड्डाणपूल अपूर्ण अवस्थेत आहे. तिथे सुरुवातीलाच दोन्ही बाजूला पाणी साठल्यामुळे याचाही वारकऱ्यांना व वाहनचालकांना त्रास झाला. उड्डाणपूल सुरू न झाल्यामुळे सर्विस रस्त्याचा वापर करावा लागतो. सर्विस रस्त्यावर दोन्ही बाजूला प्रमाणापेक्षा मोठे गतिरोधक बसवलेले आहेत त्यावरती पांढरे पट्टे देखील ओढलेले नाहीत. त्याचाही त्रास वारकऱ्यांना झाला व दररोज वाहनचालकांना तर सोसावा च लागतो. सकाळी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन चांगले केले होते.

 

टॅग्स :PuneपुणेSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Rainपाऊसweatherहवामान अंदाजSocialसामाजिक