शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

विश्रांतवाडीत जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया; नागरिकांनी व्यक्त केला संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 8:43 PM

पुणे शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्याच्या बाबतीत महापालिका व जलसंपदा विभागात वाद सुरू आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. ..

पुणे (विश्रांतवाडी) : येथील विमानतळ रस्त्यावर कस्तुरबा सोसायटीसमोर दुरुस्तीसाठी खोललेल्या जलवाहिनीतून हजारो-लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचा्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले.     पुणे शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्याच्या बाबतीत महापालिका व जलसंपदा विभागात वाद सुरू आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. अशातच ऐन उन्हाळच्या तोंडावर दुरुस्तीच्या नावाखाली पालिकेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया घालवले जात आहे. यामुळे एकप्रकारे पालिकेकडून पुन्हा एकदा भोंगळ कारभाराचे उदाहरण समोर आले आहे. राष्ट्रवादीचे विनोद पवार म्हणाले, की विश्रांतवाडीत विमानतळ रस्ता परिसरात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याबाबत आपण पालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे या जलवाहिनीत अडकलेला कचरा काढण्यासाठी ही जलवाहिनी खोलण्यात आली. जलवाहिनी खोलण्यापूर्वी पाणीपुरवठा बंद करण्याची विनंती आपण अधिकाऱ्यांना केली होती. मात्र तसे न झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. या गळतीबाबत अधिकाऱ्यांकडे चौकशी असता, त्यांच्याकडून उलटसुलट उत्तरे देण्यात आली. तसेच जलवाहिनी दुरुस्त करणारे कर्मचारी अनुभवी नव्हते, त्यामुळे हा प्रकार घडला.   पालिकेचे शाखा अभियंता बुद्धप्रकाश वाघमारे म्हणाले, सकाळी साडेसातपासून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी पाणीपुरवठा बंद होता. मात्र दुपारपर्यंत नियोजित वेळेत दुरुस्ती पूर्ण झाली नाही. पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी नागरिक चौकशी करू लागल्याने दुपारी तीननंतर पाणीपुरवठा सुरू करावा लागल्याने पाण्याची गळती झाली. ही गळती रात्रीपर्यंत थांबवण्यात येईल.

टॅग्स :Vishrantwadiविश्रांतवाडीWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका