शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

भामा आसखेड धरणालगतच्या अनधिकृत रिसॉर्टमध्ये वाल्मिक कराडने केला मुक्काम; आव्हाडांनी केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 15:33 IST

ते अनधिकृत रिसॉर्ट कोणते ? आणि खरंच वाल्मिकी कराड राहिला होता का ? या प्रश्नाच्या चर्चेला जाऊ लागला आहे.

चाकण : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराड सध्या अटकेत आहे.परंतु कराड हा पोलिसांत हजर होण्यापूर्वी खेड तालुक्यातील एका अनधिकृत रिसॉर्टवर चार दिवस मुक्कामाला राहिला होता. असे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई येथे केल्याने ते अनधिकृत रिसॉर्ट कोणते ? आणि खरंच वाल्मिकी कराड राहिला होता का ?  या प्रश्नाच्या चर्चेला जाऊ लागला आहे.भामा- आसखेड धरणाजवळील पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील हे अनधिकृत रिसॉर्ट अनेक कारणामुळे चर्चेत आहे.मागील काही वर्षांपूर्वी याच रिसॉर्ट रेव्ह पार्टी सुरू असताना पोलिसांनी छापा टाकला होता. यामध्ये अनेक मातब्बर लोक पोलिसांच्या हाती लागले होते.त्यावेळी या रिसॉर्ट कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु हे रिसॉर्ट पुन्हा नव्याने बांधणी करून उभे राहिले आहे. याच अनधिकृत रिसॉर्टवर मागील तीन महिन्यांपूर्वी खेड महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जंगी रंगीत संगीत पार्टी केली होती.त्याचे व्हिडीओ प्रसार माध्यमांवर काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शेअर केले होते.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेतेआमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई येथे प्रासर माध्यमांशी बोलताना सांगितले की, खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणालगतच्या एका अनधिकृत रिसॉर्टवर वाल्मिक कराड चार दिवस मुक्कामी राहिला होता.तो चांगला मटण - बिटन खात होता. तेथील जलतरण तलावात मस्त पैकी पोहत होता.रिसॉर्टचा मालक ही त्याच्या सेवेला हजर होता.असे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा ते रिसॉर्ट आणि आकाचा खेड तालुक्यातील बोका कोण आहे ? अशी चर्चा रंगू लागली आहे.भामा आसखेड धरण क्षेत्रात अनधिकृत बांधकामे आणि भराव टाकल्याने याचा धरणावर अतिरिक्त दाब निर्माण होऊन संरचनेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.याशिवाय अनधिकृत बांधकामांमधून बाहेर पडणारे सांडपाणी थेट धरणाच्या जलाशयात मिसळले जात आहे, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचा स्रोत दूषित होत आहे.धरणाच्या सुरक्षित क्षेत्रात अनधिकृत हेलिपॅड, बोटिंग सेवा, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक उपक्रम चालवले जात आहेत.  या सर्वांसाठी कोणतीही शासकीय परवानगी घेतलेली नाही.याची माहिती मिळावी अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी संबंधित विभागांच्या सचिवांकडे मागितली आहे.

सांडपाणी धरणात -भामा आसखेड धरणातील पाणी पिण्यासाठी पुणे - पिंपरी चिंचवडसह खेड तालुक्यातील बहुतांश गावांना जात आहे.मात्र धरणालगतच्या फार्म हाऊस आणि रिसॉर्टचे सांडपाणी धरणात सोडले जात असल्याने पाणी प्रदूषण होत आहे.या अनधिकृत रिसॉर्ट उभे करतना कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही.अश्या अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई करण्याची गरज असताना.अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते आहे.  - अभिमन्यू शेलार,सामाजिक कार्यकर्ते  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरण