शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

गावांनाही आधारसारखा नंबर मिळणार; देशभर राबविणार उपक्रम, हे आहेत फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 06:05 IST

जमाबंदी आयुक्तालयाचा उपक्रम; ४४ हजार ५०१ महसुली गावांतून प्रारंभ  

- नितीन चौधरीलोकमत न्यूज नेटवर्क पुणे : व्यक्तींना आधार क्रमांक, त्यानंतर जमिनीला भू-आधार क्रमांक आणि गावांनाही अशाच प्रकारचा सहा आकडी सांकेतांक किंवा कोड देण्यात  आला आहे. जमाबंदी आयुक्तालयाने राज्यातील ४४ हजार ५०१ गावांना असा सांकेतांक दिल्याने ही गावे आता महसुली गावे म्हणून  राजपत्रात  समाविष्ट झाली आहेत. हा उपक्रम पूर्ण देशभर राबविला जाणार आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका कोड तसेच मतदारसंघ आणि जनगणनानिहाय कोड देण्याचे कामही सुरू केले आहे. या सांकेतांकामुळे गावाची नेमकी ओळख सांगता येणार आहे. त्यामुळे गावांच्या नावांवरून होणारे घोळ, तसेच  अपात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या लाभाला आळा बसणार आहे.

देशभर राबविणार उपक्रमnगावाची निर्धारित सीमा, त्याचा नकाशा, जमिनींसाठी सर्व्हे क्रमांक असल्यावर गॅझेटमध्ये प्रसिद्धी केल्यानंतर एखादे गाव महसुली असल्याचे जाहीर करण्यात येते. देशभरात सुमारे ९ ते साडेनऊ लाख गावे असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. nही संख्या अचूक नोंदविण्यासाठी हा उपक्रम देशपातळीवर सुरू करण्यात आला आहे. ही माहिती मतदारसंघ आणि जनगणनानिहाय होणार आहे. केंद्र सरकारच्या पंचायती राज व भूस्त्रात विभागाने सर्व राज्यांना याबाबत निर्देश दिले आहेत.

सरकार दरबारी अचूक ओळखमहाराष्ट्रात यापूर्वीच हे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार राज्यात ४४ हजार ५०१ महसुली गावांना आता एक सांकेतांक देण्यात आला असून, तो प्रत्येक सात-बारा उताऱ्याच्या डाव्या बाजूला सहा आकड्यांत असणार आहे. यालाच स्थानिक प्रशासन निर्देशिका (लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरी) सांकेतांक (कोड) संबोधले जाणार आहे. यानंतर गावपातळीवर अर्थात ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगरपालिका, महापालिका स्तरावर आणखी एक सांकेतांक दिला जाईल. तिसरा स्तर हा मतदारसंघनिहाय सांकेतांक असेल. त्यानंतर जनगणनानिहाय सांकेतांक असेल. अशा चार सांकेतांकांनुसार गावाची परफेक्ट ओळख सांगता येणार आहे. ही ओळख सरकार दरबारी अचूक असेल. 

नावांचा घोळ संपणारपिंपरी नावाची अनेक गावे राज्यात आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेरमधील पिंपरी की पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील पिंपरी असा प्रश्न सरकार स्तरावर अनेकदा पडतो. काही तालुक्यांत तर अशी दोन-तीन गावे आढळतात. पूर्वीच्या पद्धतीनुसार त्यांना खुर्द, बुद्रुक असे संबोधले जात होते. मात्र, आता गावाच्या सांकेतांकानुसार त्या नावाचे एकच गाव असेल. त्यामुळे गावांच्या नावातील घोळ संपणार आहे.

हा होईल फायदाnमतदारसंघनिहाय सांकेतांक दिल्यानंतर त्या मतदारसंघात किती महसुली गावे येतात, त्यांची सीमा काय आहे, याची निश्चिती होणार आहे.nजनगणनानिहाय सांकेतांक दिल्याने त्या मतदारसंघात किंवा गावात कोणता लोकसमूह राहत आहे, त्याची नेमकी संख्या किती आहे, हे कळणार आहे.

गावांना सांकेतांक अर्थात एलजीडी कोड देण्याचे काम हे महसुलातील पायाभरणीचे काम असेल. अतिशय क्लिष्ट असलेल्या या कामासाठी खूप वेळ लागला. यामुळे अनेक बाबी सुकर होऊन कामात सुसूत्रता येणार आहे.- सरिता नरके, राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प, पुणे